भारतीय सैन्याला मिळणार १.०३ लाख कोटी रुपयांची जमिनीवरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रे आणि वाहने

नवी दिल्ली : भारताच्या संरक्षण अधिग्रहण परिषदेने १.०३ लाख कोटी रुपयांची शस्त्रे आणि लष्करी उपकरणे खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू करण्यास मंजुरी दिली आहे. यात भूदल, नौदल आणि हवाई दलासाठी आर्मर्ड रिकव्हरी व्हेईकल्स, इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर सिस्टीम, जमिनीवरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रे यांचा समावेश आहे.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संरक्षण अधिग्रहण परिषदेने १० संरक्षण साहित्य खरेदीच्या प्रस्तावांना मंजुरी दिली. देशांतर्गत संरक्षण उत्पादनाला प्रोत्साहन देणे आणि भारतीय सैन्य दलांना कोणत्याही आव्हानाला सामोरे जाण्यासाठी कायम सुसज्ज ठेवणे या उद्देशाने ही खरेदी होणार आहे. या खरेदीमुळे शत्रूचा वेगाने आणि प्रभावीरित्या प्रतिकार करण्याची भारतीय सैन्याची क्षमता आणखी वाढणार आहे. भारताचे हवाई संरक्षण आणखी मजबूत होणार आहे. संरक्षण साहित्य निर्मिती ते सैन्याला होणारा पुरवठा यासाठीच्या साखळीचे व्यवस्थापन आणखी प्रभावीरित्या होणार आहे.

सैन्यासाठी खरेदी केल्या जाणार असलेल्या संरक्षण साहित्यात पाणसुरुंग शोधून निकामी करणारे जहाज, अत्याधुनिक शस्त्रे, पाण्याखाली प्रभावी काम करणाऱ्या यांत्रिक बोटी, उंचावर शस्त्र ठेवून वेगाने गोळीबार करण्यासाठी आवश्यक साहित्य अशा अनेक आधुनिक संरक्षण साहित्यांचाही समावेश आहे. यामुळे नौदलाच्या जहाजांचे तसेच व्यावसायिक जहाजांचे रक्षण करण्यास मदत होणार आहे.
Comments
Add Comment

उड्डाणं रद्द, तिकीटदर वाढले; हवाई प्रवासातील गोंधळावर सरकारची मोठी कारवाई

नवी दिल्ली : इंडिगोच्या तांत्रिक आणि व्यवस्थापकीय अडचणींमुळे मागील काही दिवसांपासून देशात मोठे विमान प्रवास

प्रवाशांना विमान रद्दीकरणाची पूर्ण परतफेड मिळणार! इंडिगोचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून इंडिगो विमान कंपनीला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. चेक-इन प्रणालीत

सिगारेट, पान मसाला महागणार!

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नुकतेच लोकसभेत 'आरोग्य सुरक्षेपासून राष्ट्रीय सुरक्षा

इंडिगोचा सावळा गोंधळ, नागपूरहून पुण्यासाठी निघालेले प्रवासी हैदराबादला पोहोचले

नागपूर : इंडिगो विमानांच्या बिघडण्याचे, अपघात होण्याचे आणि क्रू मेम्बर्सच्या सावळ्या गोंधळाचे सत्र हे अजूनही

मोदी पुतिन बैठकीतले महत्त्वाचे मुद्दे आणि भारत आणि रशिया दरम्यानच्या करारांची यादी जाणून घ्या एका क्लिकवर...

नवी दिल्ली : भारत आणि रशिया यांच्यातील धोरणात्मक मैत्रीला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या आणि दिल्लीत होत असलेल्या २३

जहाज उद्योग, वाहतूक, आरोग्य, संरक्षण, आर्थिक क्षेत्रात भारत आणि रशिया दरम्यान करार, मोदी - पुतिन चर्चेतील पाच महत्त्वाचे मुद्दे

नवी दिल्ली : रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन मोठ्या शिष्टमंडळासह भारत दौऱ्यावर आले आहेत. या दौऱ्यात रशिया आणि भारत