भारतीय सैन्याला मिळणार १.०३ लाख कोटी रुपयांची जमिनीवरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रे आणि वाहने

नवी दिल्ली : भारताच्या संरक्षण अधिग्रहण परिषदेने १.०३ लाख कोटी रुपयांची शस्त्रे आणि लष्करी उपकरणे खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू करण्यास मंजुरी दिली आहे. यात भूदल, नौदल आणि हवाई दलासाठी आर्मर्ड रिकव्हरी व्हेईकल्स, इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर सिस्टीम, जमिनीवरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रे यांचा समावेश आहे.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संरक्षण अधिग्रहण परिषदेने १० संरक्षण साहित्य खरेदीच्या प्रस्तावांना मंजुरी दिली. देशांतर्गत संरक्षण उत्पादनाला प्रोत्साहन देणे आणि भारतीय सैन्य दलांना कोणत्याही आव्हानाला सामोरे जाण्यासाठी कायम सुसज्ज ठेवणे या उद्देशाने ही खरेदी होणार आहे. या खरेदीमुळे शत्रूचा वेगाने आणि प्रभावीरित्या प्रतिकार करण्याची भारतीय सैन्याची क्षमता आणखी वाढणार आहे. भारताचे हवाई संरक्षण आणखी मजबूत होणार आहे. संरक्षण साहित्य निर्मिती ते सैन्याला होणारा पुरवठा यासाठीच्या साखळीचे व्यवस्थापन आणखी प्रभावीरित्या होणार आहे.

सैन्यासाठी खरेदी केल्या जाणार असलेल्या संरक्षण साहित्यात पाणसुरुंग शोधून निकामी करणारे जहाज, अत्याधुनिक शस्त्रे, पाण्याखाली प्रभावी काम करणाऱ्या यांत्रिक बोटी, उंचावर शस्त्र ठेवून वेगाने गोळीबार करण्यासाठी आवश्यक साहित्य अशा अनेक आधुनिक संरक्षण साहित्यांचाही समावेश आहे. यामुळे नौदलाच्या जहाजांचे तसेच व्यावसायिक जहाजांचे रक्षण करण्यास मदत होणार आहे.
Comments
Add Comment

Devendra Fadnavis at Davos : महाराष्ट्राची दावोसमध्ये ऐतिहासिक भरारी; 'थर्ड मुंबई' प्रकल्पासाठी ११ जागतिक कंपन्यांसोबत सामंजस्य करार

दावोस : जागतिक आर्थिक परिषदेत (WEF 2026) महाराष्ट्र सरकारने राज्याच्या औद्योगिक विकासाच्या दृष्टीने एक मैलाचा दगड

भारत - यूएई करारांवर शिक्कामोर्तब

नवी दिल्ली : संयुक्त अरब अमिरातीचे (यूएई) राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बिन जायद अल नाहयान यांचा भारताचा अल्पकालीन

शबरीमाला सोने चोरी प्रकरणात 'ईडी’कारवाई

तीन राज्यांमध्ये २१ ठिकाणी छापेमारी नवी दिल्ली : केरळमधील पवित्र सबरीमाला अय्यप्पा मंदिराशी संबंधित सोने चोरी

‘राष्ट्रगीता’वरून तामिळनाडूत हाय व्होल्टेज ड्रामा

राज्यपालांचा सभागृहातून सभात्याग नवी दिल्ली : तामिळनाडूचे राज्यपाल आर. एन. रवी आणि मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन

युएईच्या अध्यक्षांच्या तीन तासांच्या भारत दौऱ्यात अनेक महत्त्वाच्या करारांवर स्वाक्षऱ्या

नवी दिल्ली : यूएईचे राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांच्या दिल्ली दौऱ्याने भारत-यूएई संबंधांना

नदी पुनरुज्जीवनासाठी महाराष्ट्राचे मोठे पाऊल

देशातील पहिल्या राज्य नदी पुनरुज्जीवन प्राधिकरणाचे मंत्री पंकजा मुंडे यांनी केले सादरीकरण नवी दिल्ली :