भारतीय सैन्याला मिळणार १.०३ लाख कोटी रुपयांची जमिनीवरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रे आणि वाहने

नवी दिल्ली : भारताच्या संरक्षण अधिग्रहण परिषदेने १.०३ लाख कोटी रुपयांची शस्त्रे आणि लष्करी उपकरणे खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू करण्यास मंजुरी दिली आहे. यात भूदल, नौदल आणि हवाई दलासाठी आर्मर्ड रिकव्हरी व्हेईकल्स, इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर सिस्टीम, जमिनीवरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रे यांचा समावेश आहे.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संरक्षण अधिग्रहण परिषदेने १० संरक्षण साहित्य खरेदीच्या प्रस्तावांना मंजुरी दिली. देशांतर्गत संरक्षण उत्पादनाला प्रोत्साहन देणे आणि भारतीय सैन्य दलांना कोणत्याही आव्हानाला सामोरे जाण्यासाठी कायम सुसज्ज ठेवणे या उद्देशाने ही खरेदी होणार आहे. या खरेदीमुळे शत्रूचा वेगाने आणि प्रभावीरित्या प्रतिकार करण्याची भारतीय सैन्याची क्षमता आणखी वाढणार आहे. भारताचे हवाई संरक्षण आणखी मजबूत होणार आहे. संरक्षण साहित्य निर्मिती ते सैन्याला होणारा पुरवठा यासाठीच्या साखळीचे व्यवस्थापन आणखी प्रभावीरित्या होणार आहे.

सैन्यासाठी खरेदी केल्या जाणार असलेल्या संरक्षण साहित्यात पाणसुरुंग शोधून निकामी करणारे जहाज, अत्याधुनिक शस्त्रे, पाण्याखाली प्रभावी काम करणाऱ्या यांत्रिक बोटी, उंचावर शस्त्र ठेवून वेगाने गोळीबार करण्यासाठी आवश्यक साहित्य अशा अनेक आधुनिक संरक्षण साहित्यांचाही समावेश आहे. यामुळे नौदलाच्या जहाजांचे तसेच व्यावसायिक जहाजांचे रक्षण करण्यास मदत होणार आहे.
Comments
Add Comment

जयपूर SMS हॉस्पिटलच्या ICU मध्ये भीषण आग, ६ रुग्णांचा मृत्यू

जयपूर: राजस्थानची राजधानी जयपूर येथील सवाई मानसिंह (SMS) हॉस्पिटलच्या ट्रॉमा सेंटरच्या न्यूरो आयसीयू (ICU)

दार्जिलिंगमध्ये भूस्खलनाने हाहाकार; २३ जणांचा मृत्यू, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी उत्तर बंगालच्या दौऱ्यावर

दार्जिलिंग: पश्चिम बंगालच्या दार्जिलिंग जिल्ह्यातील डोंगराळ प्रदेशात मुसळधार पावसामुळे झालेल्या भीषण

प्रतिकूल हवामानामुळे वैष्णोदेवी यात्रा ७ ऑक्टोबरपर्यंत स्थगित

जम्मू :  जम्मू आणि काश्मीरमधील तीव्र हवामानाच्या इशाऱ्यामुळे, वैष्णोदेवी यात्रा ५ ते ७ ऑक्टोबर दरम्यान स्थगित

दार्जिलिंगमध्ये मुसळधार पावसाचा कहर; भूस्खलनात १७ जणांचा मृत्यू, सिक्कीमशी संपर्क तुटला

उत्तराखंड : दार्जिलिंगमध्ये झालेल्या अतिमुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणावर भूस्खलन झाले असून, आतापर्यंत १७

‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; मच्छीमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना

मुंबई : ईशान्य अरबी समुद्रात निर्माण झालेल्या ‘शक्ती’ (Shakti) या चक्रीवादळाची तीव्रता वाढत असून, पुढील काही दिवसांत

फास्टॅगशिवाय रोखीने पैसे भरणाऱ्यांना १५ नोव्हेंबरपासून लागणार दुप्पट टोल

नवी दिल्ली : केंद्र सरकारने टोल प्लाझाच्या नियमांमध्ये महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. वैध फास्टॅग असलेल्या वाहन