आषाढी वारीच्या पार्श्वभुमीवर उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई: १४ लाख ५० हजारांहून अधिक मुद्देमाल जप्त!

सोलापूर: पंढरपूरची आषाढी वारी काही दिवसांवर आली असताना, राज्य उत्पादन शुल्क विभागाने सोलापूर जिल्ह्यात अवैध दारूविक्री आणि निर्मितीवर जोरदार कारवाईचा बडगा उगारला आहे. या धडक मोहिमेत तब्बल १४ लाख ४५ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. वारकरी सांप्रदायाची शिस्त आणि पावित्र्य राखण्यासाठी ही कारवाई अत्यंत महत्त्वाची ठरत आहे.


राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील पथकांनी अवैध हातभट्टी निर्मिती केंद्रे, अवैध देशी-विदेशी मद्य विक्री, वाहतूक आणि बेकायदेशीर धाब्यांवर लक्ष केंद्रित केले होते. विभागीय उपायुक्त सागर धोमकर आणि अधीक्षक भाग्यश्री जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवण्यात आली.



नेमके काय जप्त झाले?


या कारवाईत एकूण १५ गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. यात ९५५० लिटर रसायन, २३५ लिटर हातभट्टी दारू, १९४.२२ लिटर देशी मद्य, ३०.२४ लिटर विदेशी मद्य, ७८ लिटर बिअर आणि एक चारचाकी वाहनाचा समावेश आहे. या सर्व जप्त केलेल्या मुद्देमालाची किंमत १४ लाख ४५ हजार ४०० रुपये इतकी आहे.



गेल्या एका महिन्यात २२९ गुन्हे दाखल!


केवळ आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवरच नाही, तर १ जून ते ३० जून २०२५ या कालावधीतही सोलापूर शहर आणि जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाने सातत्याने कारवाई केली आहे. या एका महिन्यात एकूण २२९ गुन्हे नोंदवून २१४ जणांवर कारवाई करण्यात आली आहे.


या मोठ्या मोहिमेत ६५,५५० लिटर रसायन, ५७९३ लिटर हातभट्टी दारू, ४९९ लिटर देशी मद्य, १२८ लिटर विदेशी मद्य, १०२.३२ लिटर बिअर, २४६७ लिटर ताडी, १२६० लिटर गोव्यातील बनावट विदेशी मद्य आणि २७ वाहने जप्त करण्यात आली आहेत. या सर्व जप्त केलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत १ कोटी ३ लाख ३७ हजार २३८ रुपये इतकी आहे.


याशिवाय, अवैध मद्यविक्री आणि मद्य पिण्यास परवानगी देणाऱ्या २७ धाब्यांवरही गुन्हे नोंदवून कारवाई करण्यात आली आहे.


अवैध मद्यविक्री, निर्मिती आणि वाहतुकीविरोधातील ही कारवाई यापुढेही सुरूच राहणार असल्याची माहिती अधीक्षक भाग्यश्री जाधव यांनी दिली आहे. तुम्हाला कुठेही अवैध मद्याची माहिती मिळाल्यास, टोल फ्री क्रमांक १८००२३३९९९९ किंवा व्हॉट्सॲप क्रमांक ८४२२००११३३ वर संपर्क साधून माहिती देऊ शकता. माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवले जाईल, असेही विभागाने स्पष्ट केले आहे.

Comments
Add Comment

Pankaj Bhoyar : "ठाकरे बंधूंच्या युतीचा मुंबईत काहीही परिणाम होणार नाही"; गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांचा जालन्यातून टोला

जालना : "आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी कोणाशीही किंवा एकमेकांशी युती केली

Navneet Rana : "हिंदूंनी किमान ३-४ मुलांना जन्म द्यावा"; लोकसंख्या वाढीच्या मुद्द्यावरून नवनीत राणांचा 'हुंकार', मौलाना कादरीला सडेतोड उत्तर

अमरावती : लोकसंख्या वाढीच्या मुद्द्यावरून अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी पुन्हा एकदा आक्रमक

Sanjay Shirsat : "तुमचा डबा रुळावरून घसरलाय, आता काठावर बसा"; मंत्री शिरसाटांचा उद्धव ठाकरेंना टोला

छत्रपती संभाजीनगर : "उद्धव ठाकरे आणि त्यांच्या गटाचा जीव केवळ मुंबईत अडकलेला आहे. नगरपालिका निवडणुकीत

Ladki Bahin Yojna : मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेच्या ४० लाख महिला अपात्रतेच्या उंबरठ्यावर?

मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक

धाराशिवमध्ये हिट अँड रन, ऊसतोड मजुरांना उडवले

धाराशिव : धाराशिवमधील कळंब लातूर रस्त्यावर हिट हिट अँड रनची घटना घडली. भरधाव वेगाने आलेल्या कारने ऊसतोड

Devendra Fadanvis : पाच वर्षांनंतरही राज्यात महायुतीच दिसणार; मुख्यमंत्री फडणवीसांना विश्वास

गोंदिया : राज्यात सध्या सुरू असलेल्या विविध राजकीय चर्चा आणि अफवांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी