ENG vs IND: शुभमन गिलने द्विशतक ठोकत रचला इतिहास, कोहलीचा रेकॉर्ड मोडला

एजबेस्टन: इंग्लंडविरुद्ध एजबेस्टन कसोटीत कर्णधार शुभमन गिलचा जलवा पाहायला मिळत आहे. शुभमन गिलने भारताच्या पहिल्या डावात द्विशतक ठोकले आहे. शुभमन इंग्लंडमध्ये कसोटीत द्विशतक ठोकणारा पहिला भारतीय कर्णधार ठरला आहे. शुभमनचे कसोटी करिअरमधील हे पहिले द्विशतक आहे.


आता शुभमन परदेशी धरतीवर कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात मोठी खेळणारा भारताचा कर्णधार ठरला आहे. शुभमनने विराट कोहलीला मागे टाकले. कोहलीने जुलै २०१६मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध नॉर्थसाऊंड कसोटीत २०० धावा केल्या होत्या. शुभमन गिल आता इंग्लंडमध्ये कसोटीत सर्वात मोठी खेळणारा भारताचा कर्णधार ठरला आहे. गिलने मोहम्मद अझरुद्दीनला मागे टाकले. अझरुद्दीनने ऑगस्ट १९९० मध्ये मँचेस्टर कसोटी सामन्यात १७९ धावांची खेळी केली होती.


शुभमन गिल आता इंग्लंडमध्ये सर्वात मोठी खेळी करणारा भारताचा फलंदाज ठरला आहे. शुभमनने २२२ धावा करताच सुनील गावस्करना मागे टाकले आहे.



भारतीय कसोटी कर्णधाराच्या रूपात द्विशतक


७- विराट कोहली
१- मन्सूर अली खान पटौदी, सुनील गावस्कर, सचिन तेंडुलकर, एमएस धोनी, शुभमन गिल


 

शुभमन गिलच्या द्विशतकाच्या जोरावर भारताने इंग्लंडविरुद्ध ५०० धावांचा टप्पा पार केला आहे. जडेजाने गिलला चांगली साथ दिली. जडेजाला या सामन्यात ८७ धावा करता आल्या.
Comments
Add Comment

टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत बुमराहची १० स्थानांची झेप

मुंबई : टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने १० स्थानांची झेप घेतली आहे.

खेळाडूंच्या सुरक्षेसाठी प्रेक्षकांनाच सामना पाहण्यास बंदी!

विराट कोहली १५ वर्षांनी विजय हजारे ट्रॉफी खेळणार नवी दिल्ली : येत्या २४ डिसेंबरपासून देशातील सर्वात मोठ्या

बीसीसीआयच्या निर्णयामुळे महिला क्रिकेट खेळाडूही होणार मालामाल

देशांतर्गत क्रिकेटपटूंच्या मॅच फीमध्ये दुप्पट वाढ मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने महिला

मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्सकडे दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदाची धुरा

मुंबई : मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्स हीने भारतीय संघाला आयसीसी वनडे वर्ल्ड कप २०२५ ट्रॉफी जिंकून देण्यात प्रमुख

श्रीलंकेविरुद्धच्या टी ट्वेंटी मालिकेत भारताचा सलग दुसरा विजय

विशाखापट्टणम : भारत आणि श्रीलंका यांच्यात पाच सामन्यांची टी ट्वेंटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील सलग दोन सामने

बुधवारपासून रंगणार विजय हजारे ट्रॉफीचा थरार; बीसीसीआयच्या नियमामुळे स्टार क्रिकेटपटूही मैदानात

मुंबई : विजय हजारे क्रिकेट स्पर्धेचा थरार उद्या म्हणजेच बुधवार २४ डिसेंबरपासून सुरू होत आहे. देशांतर्गत