अ‍ॅपलच्या योजनेला ब्रेक; ३०० चिनी अभियंते भारतातून माघारी

मुंबई : भारताची जागतिक उत्पादन केंद्र होण्याच्या दिशेने वाटचाल करत असलेल्या अ‍ॅपलच्या 'आयफोन १७' प्रकल्पाला मोठा झटका बसला आहे. फॉक्सकॉनच्या भारतातील युनिटमधून तब्बल ३०० हून अधिक चिनी अभियंते आणि तंत्रज्ञ अचानक माघारी गेले आहेत. यामुळे उत्पादन प्रक्रियेत अडथळा येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

अद्याप अ‍ॅपल किंवा फॉक्सकॉनकडून अधिकृत स्पष्टीकरण आलेले नसल्याने ही घटना संशयास्पद ठरते. तज्ज्ञांच्या मते, चीनकडून ही एक 'सॉफ्ट स्ट्रॅटेजिक स्ट्राईक' आहे . भारताच्या उत्पादन क्षमतेला अडथळा आणण्याचा हा प्रयत्न असू शकतो.

‘चायना प्लस वन’ धोरणामुळे भारतासारखे देश अ‍ॅपलसाठी चीनचा पर्याय ठरत आहेत. मात्र, चीनने आपले प्रशिक्षित कामगार आणि उत्पादन तंत्रज्ञान थांबवण्याची अनौपचारिक मोहीम सुरू केल्याचे सूत्रांकडून उघड झाले आहे.

फॉक्सकॉनने २०२४ मध्ये भारतातून १० अब्ज डॉलरहून अधिक किमतीचे आयफोन तयार केले होते. त्यातील बहुतांश अमेरिकेला निर्यात झाले. आयफोन १७ ही उत्पादनातील महत्त्वाची झेप असणार होती, जी उच्च दर्जाच्या प्रशिक्षित कर्मचाऱ्यांवर अवलंबून आहे.

चिनी अभियंते केवळ असेंबल करत नव्हते, तर भारतीय कर्मचाऱ्यांना 'शेन्झेन स्टँडर्ड'चे प्रशिक्षण देत, गुणवत्ता आणि कार्यक्षमता वाढवत होते. त्यांच्या अनुपस्थितीत भारतीय उत्पादन क्षमतेवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

गलवाननंतर भारताने चिनी अ‍ॅप्सवर बंदी घातली, परंतु चीनने अधिक खोलवर जाऊन उत्पादन पातळीवर आघात केला आहे. हे 'मूक युद्ध' भारताच्या इलेक्ट्रॉनिक्स निर्मितीवरच घाला ठरत आहे.

अ‍ॅपलने 2026 पर्यंत बहुतांश आयफोन भारतात तयार करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. परंतु चीनच्या या कृतीमुळे जागतिक पुरवठा साखळीत भारताची भूमिका डळमळीत होण्याचा धोका वाढला आहे.

भारताने दीर्घकालीन उपाययोजना स्वीकारण्याची वेळ आली आहे. स्थानिक प्रशिक्षण केंद्रे, कौशल्यविकास आणि तंत्रज्ञानात आत्मनिर्भरता वाढवणे हाच ‘ग्लोबल मॅन्युफॅक्चरिंग हब’ होण्याचा खरा मार्ग ठरू शकतो.
Comments
Add Comment

माजी सरन्यायाधीशांवर हल्ला करणाऱ्या वकिलाला चोप! समाज माध्यमांवर व्हिडीओ व्हायरल

नवी दिल्ली: देशाचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई सरन्यायाधीशपदावर असताना त्यांच्यावर भर सुनावणी दरम्यान बुट फेकून

भारताच्या विकासात वाढणार एआयचा वेग; मायक्रोसॉफ्टने भारतात केली तब्बल १७.५ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक!

नवी दिल्ली: जगावर सध्या एआयची भूरळ आहे. भविष्यातही असंख्य गोष्टी एआयमुळे नष्ट होणार आहेत असा अंदाजही आतापासून

अवघ्या २० मिनिटांत अब्जाधीश झाला, असं काय घडलं त्या भारतीय माणसासोबत ?

नवी दिल्ली : प्रत्येक माणसाच्या आयुष्यात आलेला आनंदाचा क्षण कधी दुःखात आणि संकटात बदलेल हे सांगता येत नाही . एका

राज्यसभेत 'वंदे मातरम'वर बोलले अमित शाह, त्यांच्या भाषणातील महत्त्वाचे १० मुद्द

  नवी दिल्ली: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी राज्यसभेत वंदे मातरमवर चर्चा सुरू केली. त्यांनी हे

वंदे मातरम् ही पवित्र प्रतिज्ञा : पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : वंदे मातरम् हे केवळ राजकीय संघर्षाचे घोषवाक्य नव्हते, तर भारत मातेला गुलामगिरीतून मुक्त करण्याची

गोवा क्लब अग्निकांडातील मुख्य आरोपींनी ठोकली परदेशात धूम!

गोवा: गोव्यातील बर्च बाय रोमियो लेन क्लब अग्निकांड प्रकरणातील मुख्य आरोपी म्हणजे क्लबचे मालक सौरभ आणि गौरव