तृतीय पंथीयांनाही एसटीत ५० टक्के सवलत

मुंबई : महिलांना एसटीच्या प्रवासात ५० टक्के सवलत दिल्यानंतर आता राज्यातील तृतीय पंथीयांनाही एसटीच्या प्रवासात ५० टक्के सवलत मिळणार आहे. तृतीय पंथीयांना एसटीत प्रवासात सवलत देण्यासाठी एसटी महामंडळाच्या बैठकीत प्रस्ताव मंजूर करण्यात येईल. त्यानंतर महिलांसह तृतीय पंथीयांनाही एसटीत ५० टक्के सवलतीत प्रवास करता येईल, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.


परिवहन विभागाच्या या निर्णयामुळे २०११ च्या जनगणनेनुसार राज्यातील चार लाख तृतीय पंथीयांना दिलासा मिळणार आहे. कर्नाटकात महिलांसाठी असणारे मोफत बस प्रवास सेवा योजना यामध्ये तृतीयपंथी घटकांचा समावेश आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळामार्फत राज्यातील महिलांना एसटी बस प्रवासात महिलांसाठी ५० टक्के सवलत देण्यात आली आहे. ही बाब अत्यंत स्वागतार्ह आहे.


राज्यातील तृतीयपंथी घटकही आर्थिकदृष्ट्या कमकुवत असून समाजातील मुख्य प्रवाहाशी जोडले जाण्यासाठी आणि स्वावलंबी जीवन जगण्यासाठी प्रयत्नशील आहे. तृतीय पंथीयांनाही ५० टक्के सवलत देण्यात यावी, अशी मागणी परिवहन मंत्र्यांकडे केल्याचे तृतीयपंथी मंडळ उपाध्यक्ष सान्वी जेठवाणी यांनी सांगितले.

Comments
Add Comment

दोन वाहनांच्या धडकेत जिवगल मैत्रिणींचा नाहक बळी

सोलापूर: सोलापुरातील मोहोळ तालुक्यात दोन वाहनांच्या धडकेमुळे झालेल्या अपघातावर हळहळ व्यक्त होत आहे. कारण या

Khopoli News : मुलाला शाळेत सोडलं अन्...; नवनिर्वाचित नगरसेविकेच्या पतीवर दिवसाढवळ्या सपासप वार

खोपोली : रायगड जिल्ह्यातील प्रमुख औद्योगिक केंद्र असलेल्या खोपोली शहरात आज सकाळच्या सुमारास रक्ताचा थरार

आधी निवडणुकीचा गुलाल, मग मुलाला खांदा; नवनिर्वाचित नगरसेवकावर कोसळला दु:खाचा डोंगर

 बीड: निवडणुकीच्या विजयी गुलालात बापाला खांद्यावर घेऊन नाचला आणि मग बापानेच मुलाला खांदा दिल्याची धक्कादायक

ताडोबातल्या तारा वाघिणीचा पाटणमध्ये मुक्त संचार, नागरिकामध्ये भीतीचं वातावरण

पाटण : सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात एक वाघीण मुक्त संचार करताना आढळली. ही तारा नावाची वाघीण ताडोबा

नागपुरात सकाळी गोळीबाराचा थरार; प्राध्यापकासह तिघे जण जखमी

नागपूर : नागपुरात बुधवारी पहाटेच्या सुमारास गोळीबाराच्या घटनेने खळबळ उडाली आहे. नागपूर जिल्ह्यातील हिंगणा

भीमाशंकरला जाण्याचे नियोजन करत असाल तर थांबा; विकासकामांच्या पार्श्वभूमीवर मंदिर राहणार तीन महिने बंद

पुणे: ज्योतिर्लिंग म्हणजे भारतीयांसाठी फार जवळचा विषय. मात्र तुम्ही जर बारा ज्योतिर्लिंगांचे किंवा भीमाशंकरला