तृतीय पंथीयांनाही एसटीत ५० टक्के सवलत

  29

मुंबई : महिलांना एसटीच्या प्रवासात ५० टक्के सवलत दिल्यानंतर आता राज्यातील तृतीय पंथीयांनाही एसटीच्या प्रवासात ५० टक्के सवलत मिळणार आहे. तृतीय पंथीयांना एसटीत प्रवासात सवलत देण्यासाठी एसटी महामंडळाच्या बैठकीत प्रस्ताव मंजूर करण्यात येईल. त्यानंतर महिलांसह तृतीय पंथीयांनाही एसटीत ५० टक्के सवलतीत प्रवास करता येईल, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.


परिवहन विभागाच्या या निर्णयामुळे २०११ च्या जनगणनेनुसार राज्यातील चार लाख तृतीय पंथीयांना दिलासा मिळणार आहे. कर्नाटकात महिलांसाठी असणारे मोफत बस प्रवास सेवा योजना यामध्ये तृतीयपंथी घटकांचा समावेश आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळामार्फत राज्यातील महिलांना एसटी बस प्रवासात महिलांसाठी ५० टक्के सवलत देण्यात आली आहे. ही बाब अत्यंत स्वागतार्ह आहे.


राज्यातील तृतीयपंथी घटकही आर्थिकदृष्ट्या कमकुवत असून समाजातील मुख्य प्रवाहाशी जोडले जाण्यासाठी आणि स्वावलंबी जीवन जगण्यासाठी प्रयत्नशील आहे. तृतीय पंथीयांनाही ५० टक्के सवलत देण्यात यावी, अशी मागणी परिवहन मंत्र्यांकडे केल्याचे तृतीयपंथी मंडळ उपाध्यक्ष सान्वी जेठवाणी यांनी सांगितले.

Comments
Add Comment

अरे बापरे! पुण्यात हे चाललंय तरी काय? घरात घुसून डिलिव्हरी बॉयकडून तरुणीवर बलात्कार!

पुणे: पुणे शहरातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. कोंढवा भागातील एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये

आषाढी वारीच्या पार्श्वभुमीवर उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई: १४ लाख ५० हजारांहून अधिक मुद्देमाल जप्त!

सोलापूर: पंढरपूरची आषाढी वारी काही दिवसांवर आली असताना, राज्य उत्पादन शुल्क विभागाने सोलापूर जिल्ह्यात अवैध

साई मंदिरात करोडोंच्या श्रद्धेवर दरोडा !

शिर्डी :  जगभरातील कोट्यवधी साईभक्तांच्या श्रद्धेचा केंद्रबिंदू असलेल्या शिर्डीच्या साई मंदिरात चोरट्यांचा

साईबाबांच्या तीन दिवसीय गुरुपौर्णिमा उत्सवाला ९ जुलै पासून प्रारंभ

शिर्डी : श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था ( शिर्डी )च्या वतीने सालाबाद प्रमाणे याही वर्षी बुधवार दि.०९ जुलै

पुणे घाटमाथ्यावर रेड अलर्ट! कोकण, मराठवाड्यातही वादळी पावसाचा अंदाज; IMD ने माहिती दिली

महाराष्ट्र : दोन दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्रात पावसाने हजेरी लावली आहे. अनेक ठिकाणी पावसाचा जोर वाढला असून,

मुख्याध्यापक लंके यांच्या बदलीविरोधात आंदोलन, शाळेला कुलुप लावण्याचा पालकांचा इशारा

नगर (प्रतिनिधी) – रयत शिक्षण संस्थेच्या लक्ष्मीबाई भाऊराव पाटील प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक शिवाजी लंके यांची