तृतीय पंथीयांनाही एसटीत ५० टक्के सवलत

  71

मुंबई : महिलांना एसटीच्या प्रवासात ५० टक्के सवलत दिल्यानंतर आता राज्यातील तृतीय पंथीयांनाही एसटीच्या प्रवासात ५० टक्के सवलत मिळणार आहे. तृतीय पंथीयांना एसटीत प्रवासात सवलत देण्यासाठी एसटी महामंडळाच्या बैठकीत प्रस्ताव मंजूर करण्यात येईल. त्यानंतर महिलांसह तृतीय पंथीयांनाही एसटीत ५० टक्के सवलतीत प्रवास करता येईल, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.


परिवहन विभागाच्या या निर्णयामुळे २०११ च्या जनगणनेनुसार राज्यातील चार लाख तृतीय पंथीयांना दिलासा मिळणार आहे. कर्नाटकात महिलांसाठी असणारे मोफत बस प्रवास सेवा योजना यामध्ये तृतीयपंथी घटकांचा समावेश आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळामार्फत राज्यातील महिलांना एसटी बस प्रवासात महिलांसाठी ५० टक्के सवलत देण्यात आली आहे. ही बाब अत्यंत स्वागतार्ह आहे.


राज्यातील तृतीयपंथी घटकही आर्थिकदृष्ट्या कमकुवत असून समाजातील मुख्य प्रवाहाशी जोडले जाण्यासाठी आणि स्वावलंबी जीवन जगण्यासाठी प्रयत्नशील आहे. तृतीय पंथीयांनाही ५० टक्के सवलत देण्यात यावी, अशी मागणी परिवहन मंत्र्यांकडे केल्याचे तृतीयपंथी मंडळ उपाध्यक्ष सान्वी जेठवाणी यांनी सांगितले.

Comments
Add Comment

MSBTE च्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! निकाल रोखून ठेवलेल्या, अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा देण्याची संधी - लोढा

मुंबई: महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाच्या जुलै २०२५ या सत्रातील एक वर्ष कालावधी अभ्यासक्रमाच्या निकाल

श्री तुळजाभवानी मंदिरातील तलवार चोरीच्या बातम्या खोट्या, अफवांवर विश्वास ठेवू नका!

धाराशिव : श्री तुळजाभवानी मंदिरात सध्या जतन,संवर्धन व विविध विकासकामे मोठ्या प्रमाणावर सुरू असून,या अनुषंगाने

Daund Yawat Tension: ५०० जणांविरुद्ध गुन्हा दाखल, १७ जणांना अटक, कलम १६३ लागू...

पुण्यातील जातीय हिंसाचारावर कारवाई पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यामधील यवत गावात शुक्रवारी एका सोशल मीडिया

महाराष्ट्रात ४.१७ कोटींची बेनामी मालमत्ता उघड!

मुंबई : महाराष्ट्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) यावर्षी भ्रष्ट लोकसेवक आणि खाजगी व्यक्तींविरुद्ध चार

पतीची न्यायालयीन कोठडीत रवानगी, रोहिणी खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट

पुणे : पुण्यातील खराडी परिसरातल्या रेव्ह पार्टीवर पोलिसांनी धाड टाकली. घटनास्थळावरुन अमली पदार्थ जप्त केले. या

‘महादेवी हत्तिणी’च्या ‘नांदणी’वापसीचा मार्ग मोकळा, पण कायद्याचा अडसर

कोल्हापूर : संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या महादेवी हत्तिणीला जनभावनांचा आदर करत ‘वनतारा’