तृतीय पंथीयांनाही एसटीत ५० टक्के सवलत

मुंबई : महिलांना एसटीच्या प्रवासात ५० टक्के सवलत दिल्यानंतर आता राज्यातील तृतीय पंथीयांनाही एसटीच्या प्रवासात ५० टक्के सवलत मिळणार आहे. तृतीय पंथीयांना एसटीत प्रवासात सवलत देण्यासाठी एसटी महामंडळाच्या बैठकीत प्रस्ताव मंजूर करण्यात येईल. त्यानंतर महिलांसह तृतीय पंथीयांनाही एसटीत ५० टक्के सवलतीत प्रवास करता येईल, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.


परिवहन विभागाच्या या निर्णयामुळे २०११ च्या जनगणनेनुसार राज्यातील चार लाख तृतीय पंथीयांना दिलासा मिळणार आहे. कर्नाटकात महिलांसाठी असणारे मोफत बस प्रवास सेवा योजना यामध्ये तृतीयपंथी घटकांचा समावेश आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळामार्फत राज्यातील महिलांना एसटी बस प्रवासात महिलांसाठी ५० टक्के सवलत देण्यात आली आहे. ही बाब अत्यंत स्वागतार्ह आहे.


राज्यातील तृतीयपंथी घटकही आर्थिकदृष्ट्या कमकुवत असून समाजातील मुख्य प्रवाहाशी जोडले जाण्यासाठी आणि स्वावलंबी जीवन जगण्यासाठी प्रयत्नशील आहे. तृतीय पंथीयांनाही ५० टक्के सवलत देण्यात यावी, अशी मागणी परिवहन मंत्र्यांकडे केल्याचे तृतीयपंथी मंडळ उपाध्यक्ष सान्वी जेठवाणी यांनी सांगितले.

Comments
Add Comment

शतप्रतिशत भाजपसाठी रणनीती; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजपची राज्यस्तरीय संचालन समिती जाहीर

महत्वाच्या पदांवर अनुभवी नेतृत्व; विविध समाजघटकांसाठी स्वतंत्र संपर्क प्रमुख केशव उपाध्ये, नवनाथ बन यांच्यावर

Jalna Crime : 'तेच घडलं ज्याची भीती होती!' सख्या दीर-भावजयच्या 'लफड्याची' गावभर चर्चा; अनैतिक संबंधात अडथळा ठरलेल्या पतीचा निर्घृण खून, बदनापूर परिसरात खळबळ

जालना : अनैतिक प्रेमसंबंधात (Illegal Relationship) अडथळा ठरणाऱ्या सख्ख्या भावाचा दुसऱ्या भावानेच काटा काढल्याची एक धक्कादायक

Chhatrapati Sambhaji Nagar : गाझा मदतीच्या नावाखाली देशाच्या सुरक्षेशी खेळ? QRने गोळा केलेले लाखो रुपये थेट परदेशात; एटीएसकडून एकाला अटक, काय घडतंय नेमकं?

छत्रपती संभाजी नगर : गाझा-पॅलेस्टाईन येथे सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर, नागरिकांच्या मदतीच्या

स्थानिक निवडणुकांतून ‘पिपाणी’ वगळली

केंद्रीय निवडणूक आयोगाचा शरद पवारांना दिलासा मुंबई  : शरद पवारांना केंद्रीय निवडणूक आयोगाने गुरुवारी मोठा

एक कोटी लाडक्या बहिणींकडून केवायसी पूर्ण

मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांना ई केवायसी प्रक्रिया १८ नोव्हेंबरपर्यंत

मुलं आणि शिक्षकांच्या मनाचा ठाव घेईल हे बालदिनाचे प्रभावी भाषण

दरवर्षी १४ नोव्हेंबर हा दिवस भारतभर “बालदिन” म्हणून मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. हा दिवस आपल्या देशाचे