केंद्रीय कृषीमंत्री २ दिवसांच्या जम्मू-काश्मीर दौऱ्यावर

नवी दिल्ली : केंद्रीय कृषी, शेतकरी कल्याण आणि ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान हे ३ आणि ४ जुलै रोजी जम्मू-काश्मीरच्या २ दिवसीय दौऱ्यावर जाणार आहेत. या भेटीदरम्यान ते काही उच्चस्तरीय बैठकीचे अध्यक्षपद भूषवतील तसेच शेती ग्रामीण विकास आणि शिक्षणाशी संबंधित काही महत्त्वाच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होतील.


शिवराज सिंह चौहान 3 जुलै रोजी सकाळी कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयातर्फे तसेच ग्रामीण विकास विभागाने श्रीनगरच्या सचिवालयात आयोजित केलेली वरिष्ठ अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतील. दुपारी ते कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या सल्लागार समितीने नैसर्गिक शेती तसेच राष्ट्रीय तेलबिया योजना या विषयावर आयोजित केलेल्या बैठकीस उपस्थित राहतील. त्याच दिवशी संध्याकाळी ते जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी त्यांच्या सन्मानार्थ राजभवनात आयोजित केलेल्या बैठकीला उपस्थित राहतील.


दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान कृषी विज्ञान आणि तंत्रज्ञान शेर-ए-काश्मीर विद्यापीठाच्या सहाव्या पदवीदान समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. हा समारंभ श्रीनगरमध्ये विद्यापीठाच्या शालिमार पदवीदान केंद्रामध्ये होईल. या कार्यक्रमाला जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल आणि विद्यापीठाचे कुलगुरू मनोज सिन्हा तसेच जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री आणि शेर-ए-काश्मीर विद्यापीठआचे प्र-कुलगुरू ओमर अब्दुल्ला हे सुद्धा उपस्थित राहतील.


पदवीदान समारंभात 5,250 विद्यार्थ्यांना पदवी, पदव्युत्तर पदवी तसेच पीएचडी पदव्या प्रदान करण्यात येतील. याशिवाय 150 सुवर्णपदके आणि 445 गुणवत्ता प्रमाणपत्र विशेष गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना त्यांच्या उत्कृष्ट शैक्षणिक कामगिरीसाठी प्रदान करण्यात येतील.


पदवीदान समारंभानंतर शिवराज सिंह चौहान विद्यापीठाच्या परिसरातील केशर आणि सफरचंदाच्या बागांना भेट देतील आणि उद्यान कृषी विद्या शास्त्रज्ञांबरोबर तसेच शेतकऱ्यांबरोबर संवाद साधतील. यानंतर ते खोनमोह गावातील लखपती दीदींची भेट घेतील.

Comments
Add Comment

राहुल गांधींचा 'मतदारचोरी'चा आरोप निवडणूक आयोगाने फेटाळला; 'ऑनलाइन' मतदान वगळणे शक्य नाही

नवी दिल्ली: कर्नाटकच्या आळंद मतदारसंघातून मोठ्या प्रमाणात मतदार वगळल्याचा काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा

काँग्रेस समर्थकांची नावं मतदारयादीतून गायब केली जातात, राहुल गांधींचा नवा आरोप

नवी दिल्ली : लोकसभेच्या तसेच महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीवेळी मतांची चोरी करण्यात आल्याचा आरोप राहुल

आता 'ईव्हीएम' मतपत्रिकेवर उमेदवारांचे रंगीत फोटो; बिहारमधून सुरुवात

नवी दिल्ली: निवडणुकीदरम्यान मतदारांना स्पष्टता मिळावी आणि गोंधळ कमी व्हावा या उद्देशाने 'भारतीय निवडणूक

'राहुल गांधींनी काढली घुसखोर वाचवा यात्रा'

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त राजधानी दिल्लीत झालेल्या कार्यक्रमात

लिओनेल मेस्सीने पंतप्रधान मोदींना पाठवली वाढदिवसाची 'ही' खास भेट

नवी दिल्ली: आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा देशभर ७५ वा वाढदिवस साजरा होत आहे. वेगवेगळ्या

केरळमध्ये 'ब्रेन-इटिंग अमीबा'चा हाहाकार; १८ जणांचा बळी, ही लक्षणे दिसल्यास तातडीने व्हा सावधान!

नवी दिल्ली : केरळमध्ये पुन्हा एकदा 'ब्रेन-इटिंग अमीबा' (Brain-Eating Amoeba) चा धोका वाढला असून, या वर्षी या जीवघेण्या संसर्गाचे