केंद्रीय कृषीमंत्री २ दिवसांच्या जम्मू-काश्मीर दौऱ्यावर

नवी दिल्ली : केंद्रीय कृषी, शेतकरी कल्याण आणि ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान हे ३ आणि ४ जुलै रोजी जम्मू-काश्मीरच्या २ दिवसीय दौऱ्यावर जाणार आहेत. या भेटीदरम्यान ते काही उच्चस्तरीय बैठकीचे अध्यक्षपद भूषवतील तसेच शेती ग्रामीण विकास आणि शिक्षणाशी संबंधित काही महत्त्वाच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होतील.


शिवराज सिंह चौहान 3 जुलै रोजी सकाळी कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयातर्फे तसेच ग्रामीण विकास विभागाने श्रीनगरच्या सचिवालयात आयोजित केलेली वरिष्ठ अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतील. दुपारी ते कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या सल्लागार समितीने नैसर्गिक शेती तसेच राष्ट्रीय तेलबिया योजना या विषयावर आयोजित केलेल्या बैठकीस उपस्थित राहतील. त्याच दिवशी संध्याकाळी ते जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी त्यांच्या सन्मानार्थ राजभवनात आयोजित केलेल्या बैठकीला उपस्थित राहतील.


दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान कृषी विज्ञान आणि तंत्रज्ञान शेर-ए-काश्मीर विद्यापीठाच्या सहाव्या पदवीदान समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. हा समारंभ श्रीनगरमध्ये विद्यापीठाच्या शालिमार पदवीदान केंद्रामध्ये होईल. या कार्यक्रमाला जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल आणि विद्यापीठाचे कुलगुरू मनोज सिन्हा तसेच जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री आणि शेर-ए-काश्मीर विद्यापीठआचे प्र-कुलगुरू ओमर अब्दुल्ला हे सुद्धा उपस्थित राहतील.


पदवीदान समारंभात 5,250 विद्यार्थ्यांना पदवी, पदव्युत्तर पदवी तसेच पीएचडी पदव्या प्रदान करण्यात येतील. याशिवाय 150 सुवर्णपदके आणि 445 गुणवत्ता प्रमाणपत्र विशेष गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना त्यांच्या उत्कृष्ट शैक्षणिक कामगिरीसाठी प्रदान करण्यात येतील.


पदवीदान समारंभानंतर शिवराज सिंह चौहान विद्यापीठाच्या परिसरातील केशर आणि सफरचंदाच्या बागांना भेट देतील आणि उद्यान कृषी विद्या शास्त्रज्ञांबरोबर तसेच शेतकऱ्यांबरोबर संवाद साधतील. यानंतर ते खोनमोह गावातील लखपती दीदींची भेट घेतील.

Comments
Add Comment

Andhra Pradesh Accident : आंध्र प्रदेशात खासगी ट्रॅव्हलची डंपरला जोरदार धडक; १३ जणांचा होरपळून मृत्यू

आंध्र प्रदेशातील मार्कापुरम जिल्ह्यात आज पहाटेच्या सुमारास एक हृदयद्रावक घटना घडली आहे. रायवरमजवळ एका खासगी

PM Narendra Modi : जगात मोदींचीच हवा! पंतप्रधान मोदी पुन्हा एकदा बनले जगातील सर्वात लोकप्रिय नेते

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा जागतिक स्तरावर सर्वाधिक लोकप्रिय नेते म्हणून समोर आले आहेत.

खराब जेवण देणं पडलं महागात, भारतीय रेल्वेने आकारला ६० लाख रुपयांचा दंड

मुंबई: भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या सुरक्षेसाठी महत्त्वपूर्ण कारवाई केली आहे. निकृष्ट दर्जाचे अन्न

रशियाकडून ६ कोटी बॅरल तेल खरेदी, एप्रिल महिन्यात होणार पुरवठा

नवी दिल्ली : आखाती देशातील युद्धस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारताने रशियाकडून तब्बल ६ कोटी बॅरल तेलाची खरेदी केली

देशामध्ये १०० नवीन विमानतळ, २०० हेलीपॅड उभारणार, केंद्रीय मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत देशाच्या विमान वाहतूक, इमिग्रेशन आणि

देशभरात पेट्रोल-डिझेल, एलपीजीचा पुरवठा सुरळीत, सर्वपक्षीय बैठकीत सरकारची स्पष्टोक्ती

नवी दिल्ली  : पश्चिम आशियातील तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने आज सर्वपक्षीय बैठकीचे