राहुल गांधींचा 'मतदारचोरी'चा आरोप निवडणूक आयोगाने फेटाळला; 'ऑनलाइन' मतदान वगळणे शक्य नाही

नवी दिल्ली: कर्नाटकच्या आळंद मतदारसंघातून मोठ्या प्रमाणात मतदार वगळल्याचा काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा आरोप निवडणूक आयोगाने जोरदार फेटाळून लावला आहे. राहुल गांधींनी केलेला हा आरोप पूर्णपणे "चुकीचा आणि निराधार" असल्याचे आयोगाने म्हटले आहे.


निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे की, कोणत्याही नागरिकाला 'ऑनलाइन' पद्धतीने मतदार यादीतून नाव वगळण्याचा अधिकार नाही. कोणताही मतदार वगळण्यापूर्वी संबंधित व्यक्तीला सुनावणीची संधी दिली जाते, त्यानंतरच आवश्यक ती प्रक्रिया केली जाते. त्यामुळे राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपांमध्ये कोणतेही तथ्य नसल्याचे आयोगाने नमूद केले.



आळंद मतदारसंघाची वस्तुस्थिती


आळंद मतदारसंघात ६,००० हून अधिक मतदार वगळले गेल्याचा राहुल गांधींचा आरोप निवडणूक आयोगाने फेटाळला आहे. आयोगाने याआधीच्या प्रकरणांचा हवाला देत सांगितले की, २०१३ मध्येही अशा प्रकारचा प्रयत्न झाला होता. त्यावेळी झालेल्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एफआयआर दाखल करण्यात आला होता.


निवडणूक आयोगाने आळंद मतदारसंघाच्या इतिहासाची माहिती दिली. २०१८ मध्ये या मतदारसंघातून भाजपचे सुभाष गुट्टेदार विजयी झाले होते, तर २०२३ मध्ये काँग्रेसचे बी. आर. पाटील विजयी झाले होते. राहुल गांधींच्या आरोपावर आयोगाने सविस्तर स्पष्टीकरण देऊन हे आरोप पूर्णपणे निराधार असल्याचे म्हटले आहे.

Comments
Add Comment

Pharmacy Sector: 'औषधनिर्माता भरती, पदोन्नती आणि सेवा नियम २०२५' लागू

नवी दिल्ली :  देशातील लाखो औषधनिर्मात्यांसाठी (Pharmacists) एक अत्यंत आनंदाची आणि महत्त्वपूर्ण बातमी समोर आली आहे.

Kolkata building collapse : भीषण दुर्घटना! बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली

ताराताला परिसरात मोठी दुर्घटना, अनेक जण जखमी कोलकाता : पश्चिम बंगालची (West Bengal) राजधानी कोलकाता (Kolkatta) येथे बुधवारी

LOC News : भारताकडून सिंधू नदीचे पाणी रोखल्यानंतर LoC वर पाकिस्तानची मोठी सैन्यबांधणी! ३५ अँटी-ड्रोन युनिट तैनात

- AI फेन्सिंगसह युद्धसज्जतेला वेग नवी दिल्ली : भारताने सिंधू नदीचे पाणी पाकिस्तानकडे जाण्यापासून रोखल्यानंतर आणि

Jharkhand T20 League : झारखंड टी-२० लीग फायनलला गालबोट! स्टेडियमबाहेर चेंगराचेंगरी; ३५ जण जखमी

रांची : झारखंडची राजधानी रांची येथे झारखंड टी-२० लीगच्या (Jharkhand T20 League) अंतिम सामन्यादरम्यान मोठी दुर्घटना घडली.

Fire Accident :लखनऊ कोचिंग क्लास आगप्रकरणी चौघांना अटक, चार अधिकारी निलंबित

लखनऊ(Lucknow) : अलीगंज (सेक्टर-डी) येथे एका कोचिंग सेंटरला लागलेल्या भीषण आगीच्या दुर्घटनेने संपूर्ण उत्तर प्रदेश

Amit Shah : नाफेडच्या लिलाव पोर्टलचा शुभारंभ

नवी दिल्ली : केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी नॅशनल ॲग्रिकल्चरल कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ