विठुरायाच्या दर्शनासाठी लालपरीलाच पसंती

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईतील भाविकांना आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाण्यासाठी एसटी प्रशासनाकडून विशेष व्यवस्था करण्यात आली असून, पंढरपूरसाठी १३० जादा बस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यापैकी ३० जूनपर्यंत ६२ गाडांचे आरक्षण पूर्ण झाले आहे, तर पंढरपूरहून येणाऱ्या ७८ गाड्यांचे आरक्षण पूर्ण झाले आहे, अशी माहिती एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिली.


आषाढी यात्रेनिमित्त पंढरपूरला श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी मुंबईतील नागरिकांना भाविकांना पंढरपूरला जाता यावे, यासाठी मुंबई विभागाच्या पाचही आगारांतून विशेष १३० बसेस पंढरपूरला सोडण्यासाठीचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच येतानादेखील १३० गाड्यांची व्यवस्था असणार आहे.


ग्रुप बुकिंग असेल, तर थेट गावातूनच पंढरपूरला बस सोडण्यात येणार असल्याचेही एसटी विभागाकडून सांगण्यात आले. ६ जुलैला आषाढी एकादशीनिमित्त भाविक पंढरपूरला दर्शनासाठी जातात. एसटी प्रशासनाकडून दरवर्षी जादा बसेसची सोय करण्यात येते. जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून जादा बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. राज्यातील भाविकांच्या मागणीनुसार एसटी प्रशासनाकडून आणखी बसेस वाढवण्याचे नियोजन करण्यात येणार आहे.

Comments
Add Comment

Anant Ambani : हिप्पोंना मारु नका, वनतारामध्ये पाठवा; अनंत अंबानी यांची कोलंबिया सरकारला विनंती

मुंबई : उद्योगपती अनंत अंबानी यांचे प्राणीप्रेम पुन्हा एकदा समोर आले आहे. दक्षिण अमेरिकेतील कोलंबिया देशात

Mumbai News : मुंबईत पाण्याचा निचरा करण्यासाठी ५४७ पंपांची आणि फिरते डीवॉटरिंग पंप असणाऱ्या १० वाहनांची व्यवस्था

मुंबईत यंदा पाणी साचण्याची फक्त ८० ठिकाणे मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईत पावसाळ्यात पाणी साचणाऱ्या ठिकाणांची

BMC News : 'मध्य वैतरणा प्रकल्प राबवताना तुमचे पर्यावरण प्रेम कुठे होते?'

मुंबई : मुंबई महापालिकेच्यावतीने गारगाई पाणी प्रकल्पाच्या कामाला गती देण्यासाठी स्थायी समिती व महापालिका

single-window clearance : लाईव्ह इव्हेंट्स परवानगीसाठी ‘एक खिडकी’ सुविधा

मुंबई : राज्यातील लाईव्ह मनोरंजन क्षेत्राला चालना देण्यासाठी राज्य शासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. लाईव्ह

Godavari to Narmada : असा होणार गोदा ते नर्मदा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलयात्रेचा समारोप समारंभ

मुंबई : जलव्यवस्थापन अधिक गतिमान, लोकाभिमुख आणि जनसहभागातून प्रभावी करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या

Seeds Act : राज्याचा स्वतंत्र बियाणे कायदा करणार

मुंबई : शेतकऱ्यांना स्वतःचे बियाणे साठवणे, वापरणे, देवाणघेवाण करणे आणि (ब्रँडेड नाव न वापरता) विक्री करण्यास