पुरावे दिले तर खुलासा करेन; राऊतांच्या आरोपांवर आमदार सुनील शेळकेंचे थेट आव्हान

आरोप करणे हा राऊतांचा नेहमीचा उद्योग - अमोल मिटकरी


मुंबई : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना एक पत्र पाठवले आहे. या पत्राद्वारे त्यांनी अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळके (Sunil Shelke) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. सुनील शेळकेंनी उत्खनन क्षेत्रातील हजारो कोटींची रॉयल्टी बुडवून सरकारची फसवणूक केल्याचा आरोप राऊतांनी केला आहे. तसेच शेळकेंवर कारवाई करून महाराष्ट्राची लूट थांबवावी अशी मागणी देखिल राऊतांनी या पत्राद्वारे केली आहे. या आरोपांवर आता सुनील शेळकेंनी भाष्य केलं. संजय राऊतांनी यासंबंधीचे पुरावे दिले तर मी त्यावर खुलासा करेन, असं ते म्हणाले. तर आरोप करणं हा राऊतांचा नेहमीचा उद्योग असल्याचं विधान परिषद सदस्य अमोल मिटकरी म्हणाले.


आमदार सुनील शेळके यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. राऊतांच्या आऱोपाविषयी विचारले असता ते म्हणाले की,संजय राऊत यांनी माझ्यावर कोणताही पुरावा नसताना आरोप केले आहेत. मी त्यांना सांगू इच्छितो की तुमच्याकडे माहिती असेल, काही पुरावे असतील किंवा मला यासंबंधीच्या शासकीय नोटीसा आल्या असतील, माझी चौकशी चालू असेल तर त्यांचे पुरावे सादर करावेत. जोवर ते पुरावे सादर करणार नाहीत, तोवर मी कुठलीही प्रतिक्रिया देणार नाही. कुठलाही खुलासा करणार नाही, असं शेळके म्हणाले.



सरकारला समर्थन देणारे पक्ष, त्या पक्षांचे आमदार आणि खासदार महाराष्ट्राला लुटत आहेत आणि फडणवीसांचे याकडे लक्ष नाही. आमदार सुनील शेळकेंनी हजारो कोटी रुपयांची रॉयल्टी लुटली आहे. हे खूप गंभीर प्रकरण आहे. एमआयडीसीच्या जमिनीवर बेकायदेशीरपणे खाण उद्योग सुरू करून त्यांनी सरकारची हजारो कोटी रुपयांची रॉयल्टी बुडवली आहे. मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याबद्दल सविस्तर तपशील पाठवला. त्यासोबत पुरावेही जोडले आहेत, असं राऊत म्हणाले.


ते म्हणाले, आतापर्यंत मी देवेंद्र फडणवीस यांना त्यांच्या मंत्रिमंडळातील मंत्री आणि आमदारांच्या भ्रष्टाचाराचे २१ खटले पुराव्यांसह पाठवले आहेत. मात्र, फडणवीसांनी आजपर्यंत यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही किंवा मी त्यावर कारवाई करेन, असंही सांगितलं नाही.

Comments
Add Comment

DCM Eknath Shinde : उपमुख्यमंत्री शिंदेंनी केली मिसिंग लिंकच्या कामाची पाहणी, महाराष्ट्र दिनी होणार उद्घाटन; मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील घाटाला मिळणार बायपास

मुंबई : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाला पूर्णतः ‘ऍक्सेस कंट्रोल’ बनवणाऱ्या महत्त्वाच्या ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे

HSC RESULT : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल कधी जाहीर होणार ?

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल कधी जाहीर होणार ? हा प्रश्न

MSRTC : 'आपली बस, आपली सेवा'; एसटी महामंडळाची नवी मोहीम

मुंबई : महाराष्ट्राच्या जीवनाशी नाळ जोडलेली लालपरी आता नव्या उमेदीनं, नव्या शिस्तीनं आणि नव्या संवेदनशीलतेनं

New Rule For Hotel : हॉटेलच्या मेन्युकार्डवर ‘पनीर’ किंवा ‘चीज ॲनालॉग’चा वापराचा उल्लेख बंधनकारक

मुंबई : पनीरच्या नावाखाली चीज ॲनालॉगचा वापर होत असल्याबाबतच्या तक्रारीनंतर अन्न व औषध प्रशासन विभागाच्या नवीन

Sanjay Nirupam : निरुपम यांच्या कारची हवा काढणाऱ्यांना जामीन मंजूर

मुंबई : शिवसेनेचे संजय निरुपम दहिसरमध्ये रिक्षा - टॅक्सी चालकांशी संवाद साधण्यासाठी गेले होते. त्यावेळी

Maharashtra Weather : राज्यात उष्णतेचा कहर; ६ जिल्ह्यांना उष्णतेचा, तर १० जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट

मुंबई : महाराष्ट्राचं हवामान बिघडलय आणि याचा फटका सर्वांनाच बसतो आहे. राज्यावर दुहेरी संकट आल्याचं चित्र