उबाठानेच केला मराठीचा घात, शिवसेनेची बॅनरबाजी

मुंबई : उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री असताना मराठी, इंग्रजी आणि हिंदी या तीन भाषा पहिलीपासून शाळेत सक्तीच्या करण्याचा निर्णयावर शिक्कामोर्तब केले होते. मुख्यमंत्री म्हणून त्यांचीच फाईलवर सही होती. शिउबाठा अर्थात उबाठानेच मराठीचा घात केला आहे. ही माहिती देणारे बॅनर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेकडून मुंबईत ठिकठिकाणी लावण्यात आले आहेत.

महाराष्ट्रातील शाळांमध्ये पहिली ते बारावीपर्यंत त्रिभाषा सक्तीचा निर्णय हा उद्धव ठाकरे यांच्याच सरकारने २७ जानेवारी २०२२ रोजी घेतला होता! डॉ. रघुनाथ माशेलकर समितीने मराठी, इंग्रजी आणि हिंदी या तीन भाषा अनिवार्य करण्याची शिफारस केली होती आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाने त्याला मंजुरी दिली होती. उद्धव सरकारच्या या निर्णयाची माहिती शिवसेनेने बॅनरद्वारे सर्वांना देण्यास सुरुवात केली आहे. संपूर्ण मुंबईत अनेक ठिकाणी 'उबाठानेच केला मराठीचा घात' असे बॅनर शिवसेनेने लावले आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने त्रिभाषा सक्तीचा निर्णय मागे घेऊन विद्यार्थी, पालक आणि शिक्षक या सर्वांनाच दिलासा दिला आहे.
Comments
Add Comment

हार्बरवर साडेचौदा तासांचा ट्रॅफिक ब्लॉक

मुंबई : कुर्ला ते टिळकनगरदरम्यान वळण मार्गिकांच्या कामासाठी शनिवारी रात्री ११.०५ ते उद्या, रविवार दुपारी १.३५

Will the ITR filing 2025 date be extended? : ITR फायलिंगसाठी तांत्रिक अडचणी! आता फक्त इतके दिवस शिल्लक, ITR डेडलाईन वाढणार का? अपडेट जाणून घ्या

मुंबई : आयकर रिटर्न (ITR) भरण्याची अंतिम मुदत आता अगदी जवळ आली आहे. करदात्यांसाठी १५ सप्टेंबर २०२५ ही शेवटची तारीख

भायखळा के पी रोडवर भीषण अपघात पार्सल चा ट्रक उलटला

मुंबई: मुंबईतील भायखळ्याच्या के. पी. रोडवर पार्सलचा ट्रक उलटून अपघात, वाहन चालकाला झोप लागल्यानं अपघात झाल्याची

मुंबईतील १२५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल पाडणार... आता पुढे काय?

स्थानिक लोकांचा जोरदार विरोध, पुनर्वसनाच्या मागणीवर भर मुंबई: मुंबईतील १२५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल

नवीन मोबाईल घेण्याचा विचार करताय का? तर हे तुमच्यासाठी आहेत चांगले ऑप्शन

ओप्पो १५ सप्टेंबरला भारतात नवीन F31 सिरीज स्मार्टफोन करणार लाँच

‘मिशन वात्सल्य योजने’चा सर्व विधवा व एकल महिलांना मिळणार लाभ - आदिती तटकरे

मुंबई : कोविड १९ या संसर्गजन्य आजारामुळे दोन्ही पालकांचे निधन होऊन अनाथ झालेल्या बालकांना तसेच विधवा महिलांना