बीड विनयभंग प्रकरण: आरोपी विजय पवारवर आणखी गंभीर आरोप; एसआयटी चौकशीचे आदेश

बीड : बीड जिल्ह्यातील अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणाने आता आणखी गंभीर वळण घेतले आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी विजय पवार याच्यावर आणखी एका पीडितेच्या पालकांनी गंभीर आरोप केले आहेत. दोन वर्षांपूर्वीही विजय पवारने आपल्या मुलीचा छळ केल्याचे या पालकांचे म्हणणे आहे. या वाढत्या आरोप-प्रत्यारोपांनंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची एसआयटी (Special Investigation Team) चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

विजय पवारवर "बॅड टच" आणि छळाचे आरोप

नवीन आरोपानुसार, विजय पवार हा आपल्या मुलीला केबिनमध्ये बोलावून 'बॅड टच' करायचा, असा दावा पीडितेच्या पालकांनी केला आहे. विजय पवार संचालक असलेल्या एका शाळेत दोन वर्षांपूर्वी अशाच प्रकारे एका विद्यार्थिनीला शाळेत झालेल्या वादामुळे त्रास दिला गेला होता. त्यावेळीही मुलीला शाळेबाहेर उभे करणे किंवा केबिनमध्ये बोलावून छेडछाड करणे असे प्रकार घडले होते. या पालकांनी गेल्या दोन वर्षांपासून यावर कारवाईसाठी पाठपुरावा केला होता, परंतु अद्याप कोणतीही कारवाई झाली नव्हती. आता पोलीस अधीक्षकांनी केलेल्या आवाहनानंतर हे पालक समोर आले असून त्यांनी आपली तक्रार दाखल केली आहे. आता पोलीस अधीक्षक या तक्रारीची चौकशी करणार आहेत.

नेमके काय आहे प्रकरण?

बीडमधील नामांकित उमाकिरण शैक्षणिक संकुलातील एका खासगी क्लासेसमध्ये जुलै २०२४ ते २५ मे २०२५ या कालावधीत एका अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग झाल्याची तक्रार २६ जून २०२५ रोजी शिवाजीनगर पोलिसांत दाखल झाली होती. याच दिवशी पोक्सो कायद्यांतर्गत (POCSO Act) गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणात आरोपी प्रशांत खाटोकर आणि विजय पवार हे दोघे फरार झाले होते. २८ जून रोजी स्थानिक गुन्हे शाखेने विजय पवारला लिंबागणेश परिसरातून, तर प्रशांत खाटोकरला चौसाळा बायपासवरून ताब्यात घेतले. २९ जून रोजी या दोघांनाही बीड जिल्हा न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

धनंजय मुंडेंनी केले गंभीर आरोप
या प्रकरणानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा आमदार धनंजय मुंडे यांनी पीडित कुटुंबाची भेट घेतली. त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन त्यांनी स्थानिक आमदार संदीप क्षीरसागर यांच्यावर गंभीर आरोप केले. गुन्हा दाखल झाला त्या दिवशी रात्री ११ वाजता संदीप क्षीरसागर आरोपींसोबत होते आणि आरोपींना त्यांचे पाठबळ आहे, असे मुंडे यांनी म्हटले. संदीप क्षीरसागर आणि आरोपींचे संबंध समोर यावेत यासाठी सखोल चौकशीची मागणीही त्यांनी केली आहे.
Comments
Add Comment

Nitesh Rane : मोरा मच्छीमारांना नुकसानभरपाई द्या; मंत्री नितेश राणे यांचे निर्देश

मुंबई : जे. एन. पी. ए. मार्फत(JNPA) मार्फत चौथ्या बंदराच्या भरावाच्या कामामुळे मोरा गावातील मच्छीमारांचे झालेले

लग्न जमेना म्हणून तरुणाची भन्नाट कल्पना, थेट बॅनरवर पठ्ठ्याने लिहिलं असं काही की तुम्हांलाही ऐकून धक्का बसेल

पुणे : लग्न जमत नाही म्हणून अनेक तरुण सध्या नैराश्यात दिसत आहे. मुलीच्या तसेच वडिलांच्या एकंदरीतच

भोंदू अशोक खरातच्या अडचणीत वाढ, कुटुंबियांचीही वाढणार अडचण; कोट्यवधीच्या प्रॉपर्टीवर..., हालचालींना वेग

नाशिक : संपूर्ण देशालाच हादरवून सोडणाऱ्या भोंदू अशोक खरातच्या (Ashok Kharat) अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे.

Santosh Deshmukh : 'त्यांच्यावर कुटुंबीयांचा दबाव'..., मस्साजोगच्या सरपंचपदाच्या उमेदवाराचा खळबळजनक आरोप

संपूर्ण राज्याला हादरवून सोडणाऱ्या सरपंच संतोष देशमुख ( Santosh Deshmukh ) यांच्या मस्साजोग या गावात राजकीय वातावरण रंगले

Pune Water Supply : पुण्याच्या पाणीकपातीवर प्रशासनाने घेतला हा महत्वाचा निर्णय

पुणे : सूर्याचा प्रकोप हा वाढत जातोय, तापमानाचा पारा इतका वाढलाय की थेट तापमान ४०- ४५ अंशापर्यत जाऊन पोहोचलाय,

Free Registration For Agricultural Land : राज्य सरकारचा मोठा निर्णय; शेतजमिनीच्या वाटणीवरील नोंदणी फी रद्द

मुंबई : राज्यातील शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेला मोठा दिलासा देत राज्य सरकारने शेतजमिनीच्या वाटणीपत्रावर