तेलंगणातील रसायनाच्या कारखान्यात स्फोट, ३४ ठार

पटानचेरू : तेलंगणातील पटानचेरू येथे सिगाची केमिकल्स नावाच्या रसायनाच्या कारखान्यात स्फोट झाला. या स्फोटामुळे ३४ जणांचा मृत्यू झाला. ढिगाऱ्यातून आतापर्यंत ३१ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. जखमींपैकी तीन जणांनी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. यामुळे सिगाची केमिकल्समधील स्फोटामुळे ठार झालेल्यांची संख्या ३४ झाली आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षक परितोष पंकज यांनी ढिगाऱ्यातून ३१ मृतदेह काढण्यात आल्याचे आणि रुग्णालयात तीन जणांचा मृ्त्यू झाल्याचे सांगितले. घटनास्थळी मदतकार्य सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. सिगाची केमिकल्समधील दुर्घटनेची चौकशी होणार आहे.

कारखान्यात नेहमीप्रमाणे कामकाज सुरू असताना स्फोट झाला. रिअॅक्टर फुटला. स्फोटाचे नेमके कारण अद्याप समजलेले नाही. स्फोटामुळे कारखान्यात आग लागली. ही आग वेगाने पसरली. अनेकांना स्वतःला सावरण्याची, वाचवण्याची संधी मिळाली नाही.

स्फोट झाला त्यावेळी कारखान्यात १५० जण होते. ज्या ठिकाणी स्फोट झाला त्या भागात ९० जण कार्यरत होते. स्फोटाचा आवाज येताच अनेकांनी वेगाने कारखान्याबाहेर धाव घेतली. पण झपाट्याने पसरलेल्या आगीमुळे ३४ जणांना जीव गमवावा लागला.
Comments
Add Comment

Eknath shinde delhi amit shah : दिल्लीत शिंदे, मुंबईत 'खलबतं'! नाराज एकनाथ शिंदे अमित शहांच्या भेटीला; तिकडे CM फडणवीस आणि अजित पवारांची तातडीची गुप्त बैठक

मुंबई : राज्यात सत्ताधारी महायुतीत (Mahayuti) सर्व काही आलबेल नसल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. स्थानिक स्वराज्य

पीएम किसान हप्ता अडकला? जाणून घ्या कारण आणि उपाय

मुंबई : देशभरातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी

Vande Bharat Sleeper : 'स्लीपर वंदे भारत' पुढच्या महिन्यात धावणार! रेल्वे मंत्र्यांचे बुलेट ट्रेनवरही निर्णायक वक्तव्य

नवी दिल्ली : देशातील रेल्वे प्रवासाला आधुनिक गती देणारी महत्त्वपूर्ण माहिती रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव (Ashvini

बिहार विधानसभेत एनडीएच्या मंत्र्यांची आकडेवारी निश्चित, मात्र अध्यक्षपदासाठी पेच

पाटणा: बिहार विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवल्यानंतर आता एनडीएकडून सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला

आसाममध्ये चाललंय तरी काय? बोगस डॉक्टरने केले २५ वर्षांपासून हजारो रुग्णांवर उपचार!

आसाम: आसाममध्ये बोगस डॉक्टर गेल्या अडीज वर्षांपासून रुग्णांवर उपचार करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

राष्ट्रपतींच्या हस्ते सहाव्या राष्ट्रीय जल पुरस्कारांचे वितरण

महाराष्ट्राला सर्वोत्कृष्ट राज्याचा पुरस्कार, नवी मुंबई मनपासह नाशिकच्या कानिफनाथ जलवापर संस्थेचाही