तेलंगणातील रसायनाच्या कारखान्यात स्फोट, ३४ ठार

  47

पटानचेरू : तेलंगणातील पटानचेरू येथे सिगाची केमिकल्स नावाच्या रसायनाच्या कारखान्यात स्फोट झाला. या स्फोटामुळे ३४ जणांचा मृत्यू झाला. ढिगाऱ्यातून आतापर्यंत ३१ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. जखमींपैकी तीन जणांनी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. यामुळे सिगाची केमिकल्समधील स्फोटामुळे ठार झालेल्यांची संख्या ३४ झाली आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षक परितोष पंकज यांनी ढिगाऱ्यातून ३१ मृतदेह काढण्यात आल्याचे आणि रुग्णालयात तीन जणांचा मृ्त्यू झाल्याचे सांगितले. घटनास्थळी मदतकार्य सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. सिगाची केमिकल्समधील दुर्घटनेची चौकशी होणार आहे.

कारखान्यात नेहमीप्रमाणे कामकाज सुरू असताना स्फोट झाला. रिअॅक्टर फुटला. स्फोटाचे नेमके कारण अद्याप समजलेले नाही. स्फोटामुळे कारखान्यात आग लागली. ही आग वेगाने पसरली. अनेकांना स्वतःला सावरण्याची, वाचवण्याची संधी मिळाली नाही.

स्फोट झाला त्यावेळी कारखान्यात १५० जण होते. ज्या ठिकाणी स्फोट झाला त्या भागात ९० जण कार्यरत होते. स्फोटाचा आवाज येताच अनेकांनी वेगाने कारखान्याबाहेर धाव घेतली. पण झपाट्याने पसरलेल्या आगीमुळे ३४ जणांना जीव गमवावा लागला.
Comments
Add Comment

उत्तराखंडमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस, महाराष्ट्राचे २०० पर्यटक अडकले

मुंबईतील ५० जणांचा समावेश उत्तराखंड: उत्तराखंडमध्ये ढगफुटीमुळे केदारनाथजवळ भूस्खलन झाल्याची बातमी समोर आली

शिवकाशीत फटाका कारखान्यात स्फोट, चौघांचा मृत्यू

शिवकाशी : तामिळनाडूतील शिवकाशीत फटाका कारखान्यात स्फोट झाला. या स्फोटामुळे चार मजुरांचा मृत्यू झाला आणि पाच जण

Crime News : धक्कादायक! महाराष्ट्रातील ७० वर्षीय आजीवर पहलगाममध्ये लैंगिक अत्याचार; ब्लँकेटने झाकले अन्...

जम्मू-काश्मीर : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममधील एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. पहलगाममध्ये

IMD Monsoon Alert: जुलैमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार, हवामान खात्याने व्यक्त केला अंदाज

नवी दिल्ली: भारतीय हवामान विभागाने (IMD) जुलै महिन्यासाठी दिलासादायक अंदाज वर्तवला आहे. देशवासीयांना या महिन्यात

LPG Cylinder Price Cut : LPG ग्राहकांना दिलासा! आजपासून कमी झाली किंमत; 'हे' आहेत नवे दर

व्यावसायिक सिलिंडर स्वस्त नवी दिल्ली : जुलै महिन्याच्या पहिल्याचं दिवशी (July 2025) एलपीजी ग्राहकांना दिलासा मिळाला

ऑपरेशन सिंदूरमुळे जगभरात वाढला भारतीय संरक्षण तंत्रज्ञानाचा डंका; ‘या’ देशाचा ‘आकाश’मध्ये रस

नवी दिल्ली : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने केलेल्या ऑपरेशन सिंदूरने पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू