तेलंगणातील रसायनाच्या कारखान्यात स्फोट, ३४ ठार

पटानचेरू : तेलंगणातील पटानचेरू येथे सिगाची केमिकल्स नावाच्या रसायनाच्या कारखान्यात स्फोट झाला. या स्फोटामुळे ३४ जणांचा मृत्यू झाला. ढिगाऱ्यातून आतापर्यंत ३१ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. जखमींपैकी तीन जणांनी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. यामुळे सिगाची केमिकल्समधील स्फोटामुळे ठार झालेल्यांची संख्या ३४ झाली आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षक परितोष पंकज यांनी ढिगाऱ्यातून ३१ मृतदेह काढण्यात आल्याचे आणि रुग्णालयात तीन जणांचा मृ्त्यू झाल्याचे सांगितले. घटनास्थळी मदतकार्य सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. सिगाची केमिकल्समधील दुर्घटनेची चौकशी होणार आहे.

कारखान्यात नेहमीप्रमाणे कामकाज सुरू असताना स्फोट झाला. रिअॅक्टर फुटला. स्फोटाचे नेमके कारण अद्याप समजलेले नाही. स्फोटामुळे कारखान्यात आग लागली. ही आग वेगाने पसरली. अनेकांना स्वतःला सावरण्याची, वाचवण्याची संधी मिळाली नाही.

स्फोट झाला त्यावेळी कारखान्यात १५० जण होते. ज्या ठिकाणी स्फोट झाला त्या भागात ९० जण कार्यरत होते. स्फोटाचा आवाज येताच अनेकांनी वेगाने कारखान्याबाहेर धाव घेतली. पण झपाट्याने पसरलेल्या आगीमुळे ३४ जणांना जीव गमवावा लागला.
Comments
Add Comment

राहुल गांधींचा 'मतदारचोरी'चा आरोप निवडणूक आयोगाने फेटाळला; 'ऑनलाइन' मतदान वगळणे शक्य नाही

नवी दिल्ली: कर्नाटकच्या आळंद मतदारसंघातून मोठ्या प्रमाणात मतदार वगळल्याचा काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा

काँग्रेस समर्थकांची नावं मतदारयादीतून गायब केली जातात, राहुल गांधींचा नवा आरोप

नवी दिल्ली : लोकसभेच्या तसेच महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीवेळी मतांची चोरी करण्यात आल्याचा आरोप राहुल

आता 'ईव्हीएम' मतपत्रिकेवर उमेदवारांचे रंगीत फोटो; बिहारमधून सुरुवात

नवी दिल्ली: निवडणुकीदरम्यान मतदारांना स्पष्टता मिळावी आणि गोंधळ कमी व्हावा या उद्देशाने 'भारतीय निवडणूक

'राहुल गांधींनी काढली घुसखोर वाचवा यात्रा'

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त राजधानी दिल्लीत झालेल्या कार्यक्रमात

लिओनेल मेस्सीने पंतप्रधान मोदींना पाठवली वाढदिवसाची 'ही' खास भेट

नवी दिल्ली: आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा देशभर ७५ वा वाढदिवस साजरा होत आहे. वेगवेगळ्या

केरळमध्ये 'ब्रेन-इटिंग अमीबा'चा हाहाकार; १८ जणांचा बळी, ही लक्षणे दिसल्यास तातडीने व्हा सावधान!

नवी दिल्ली : केरळमध्ये पुन्हा एकदा 'ब्रेन-इटिंग अमीबा' (Brain-Eating Amoeba) चा धोका वाढला असून, या वर्षी या जीवघेण्या संसर्गाचे