Maharashtra Assembly Monsoon Session 2025: "बाप तो बाप होता है" एकनाथ शिंदे यांनी लगावला नाना पटोले यांना टोला 

मुंबई: भाजपचे नेते बबनराव लोणीकर यांनी शेतकऱ्यांविषयी केलेल्या वक्तव्यामुळे काँग्रेसचे नेते नाना पटोले आक्रमक झाले. त्यांनी विधानसभा अध्यक्षांचा राजदंड उचलण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांना एका दिवसासाठी निलंबित करण्यात आलं. यादरम्यान, पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा एकेरी उल्लेख केला, ज्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाना पटोले यांना सणसणीत टोला लगावला आहे.  मोदींवर टीका करून चर्चेत राहता येतं, त्यामुळे 'बाप तो बाप होता है' असे एकनाथ शिंदें यांनी प्रतिक्रिया दिली.


महाराष्ट्र विधानसभेत आज झालेल्या पावसाळी अधिवेशनाचा दूसरा दिवस शेतकऱ्यांच्या विषयांवरून चांगलाच गाजला. लोणीकर यांनी शेतकऱ्यांचा अपमान केल्याचा आरोप करत विरोधी पक्षाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून माफी मागण्याची मागणी केली.  दरम्यान, नाना पटोले अधिक आक्रमक झाले आणि त्यांनी ओरडून सांगितले की, "शेतकऱ्यांचा बाप पंतप्रधान मोदी नसतील; ते तुमचा बाप असतील." त्यानंतर त्यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केला. सभाध्यक्षांच्या समोरील राजदंडाला त्यांनी स्पर्श करत, घोषणाबाजी सुरूच ठेवली. त्यामुळे अध्यक्षांकडून नाना पटोले यांना दिवसभरासाठी विधानसभेतून निलंबित केले गेले. तर विरोधकांनी सभात्याग केला.



काय म्हणाले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे?


पावसाळी अधिवेशनच्या दुसऱ्या दिवशी झालेल्या गोंधळाबद्दल आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया आली आहे. नाना पटोले यांच्या निळंबनाविषयी बोलताना त्यांनी त्यांच्या वर्तणूकीचा खरपूस समाचार घेतला. एकनाथ शिंदे म्हणाले की, "नाना पटोले हे विधानसभेचे अध्यक्ष राहिले आहेत. त्यांना सभागृहाचे नियम माहित आहे. पण ते असे का वागले याची माहिती नाही. त्यांनी राजदंड उचलण्याचा प्रयत्न पण केला. त्यांच्याकडून अशा कृतीची अपेक्षा नव्हती. गेल्या काही दिवसांपासून नाना पटोले हे चर्चेतून बाहेर पडले आहेत. त्यामुळे दिल्लीतील लोकांना दाखवण्यासाठी, चर्चेत राहण्यासाठी त्यांनी हे कृत्य केलं असावं. त्यांचे नेते राहुल गांधी हे परदेशात जाऊन मोदींवर टीका करतात. तसंच नाना पटोले यांनी केलं. पण बाप तो बाप होता है."  तर अध्यक्षांच्या अंगावर धावून जाणं योग्य नाही, नाना पटोलेंनी माफी मागितली पाहिजे अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली.



आम्हाला निलंबित करायचं असेल तर करा- नाना पटोले


शेतकऱ्यांचा अपमान करणाऱ्यांचा सन्मान आणि शेतकऱ्यांच्या बाजूने बोलणाऱ्याचे निलंबन अशी भूमिका राज्य सरकार घेत असल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला. ते म्हणाले की, "आज शेतकऱ्यांचा दिवस आहे, राज्यातील सर्व शेतकऱ्यांना आज मी शुभेच्छा देतो. महायुतीचं सरकार आहे, त्यांची वास्तविकता आज समोर आली. कृषिमंत्री, आमदार हे शेतकऱ्यांना भिकारी समजतात. शेतकऱ्यांना मदत दिली जात नाही. बोनस देत नाहीत. कर्जमाफी करण्याची भूमिका मांडली होती, पीकविमा बंद केला. हे सरकार शेतकरी विरोधी आहे. शेतकऱ्यांचा अपमान सहन करणार नाही. बबनराव लोणीकर यांच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत शांत बसणार नाही. रोज हा विषय मांडू, आम्हाला निलंबित करायचं असेल तर करा."

Comments
Add Comment

Mehli Mistry Exit : टाटा समूहात मोठा भूंकप! नोएल टाटांनी करून दाखवलं; रतन टाटांच्या 'या' जवळच्या व्यक्तीची ट्रस्टमधून हकालपट्टी

मुंबई : उद्योगपती रतन टाटा (Ratan Tata) यांच्या निधनानंतर टाटा समूहाच्या महत्त्वाच्या धर्मादाय संस्थांमध्ये (Charitable Trusts)

बोरिवलीत २१ वर्षीय तरुणी ‘अ‍ॅग्रीमेंट रिलेशनशिप’ मध्ये; कुटुंबाची विश्व हिंदू परिषदेकडे धाव

मुंबई : मुंबईतील बोरिवली परिसरात एका २१ वर्षीय तरुणीने लग्न न करता एका मुस्लिम तरुणासोबत ‘लिव्ह-इन रिलेशनशिप

राज्यामध्ये दरदिवशी ६१ बालकांवर अत्याचार

मुंबई : राज्यात बालकांवर होत असलेल्या अत्याचाराच्या गुन्ह्यांचा आलेख चिंताजनक पातळीवर पोहोचला आहे. राष्ट्रीय

दहावी परीक्षेच्या अर्ज भरण्याची मुदतवाढ; जाणून घ्या, आता किती दिवस मिळणार अतिरिक्त संधी

10th SSC Board Exam 2026 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये होणाऱ्या

विरार ते थेट मरीन ड्राइव्हपर्यंतचा प्रवास होणार सिग्नल-फ्री

प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार मुंबई : उत्तन-वसई-विरार सी लिंक प्रकल्पाला अखेर पर्यावरण विभागाने अंतिम मान्यता

महापालिकेच्या चार रुग्णालयांची ऑक्सिजन लेव्हल वाढणार, कोविड काळातील त्या...

मुंबई (सचिन धानजी) : मुंबई महापालिकेच्यावतीने कोविड काळात निर्माण केलेल्या कोविड सेंटरमधील ऑक्सिजन टाक्यांचा