वारीतलं रिंगण : चैतन्य फुलवणारा सोहळा!

इंदापूर : आषाढी वारी म्हणजे केवळ एक धार्मिक यात्रा नाही, ती आहे विश्वासाची, भक्तीची आणि नित्य उत्साहाची चालतीबोलती गाथा. याच वारीतील एक अनमोल क्षण म्हणजे पालखी सोहळ्यातील अश्वांचे रिंगण! पालखी सोहळ्यात अश्वाचे रिंगण हा आकर्षणाचा अन् चैतन्य फुलवणारा सोहळा असतो. वारकरी वाटचाल करत असतात. त्याबरोबर अश्चही असतात. या अश्वांना वारकरी माऊली असेच मानतात. पळणे हा अश्वाचा स्थायिभाव असतो, त्यांना पळण्यासाठी कुठेतरी जागा करून द्यावी; हा त्यामागचा उद्देश असतो.


रिंगणामध्ये मोकळ्या ठेवलेल्या मार्गावर – तुळशी वृंदावन घेतलेल्या महिला, हातात पताका म्हणजे झेंडा घेतलेले वारकरी व विणेकरी हे स्वतंत्र रित्या पळतात. रिंगण झाल्यावर दिंड्यांचे विविध खेळ होतात. हे खेळ होताना टाळ व भजन सुरू असते. हे खेळ खेळणे आणि बघणे हा एक अवर्णनीय अनुभव असतो.



आषाढी वारीसाठी राज्याच्या कानाकोपर्‍यातून शेकडो संतांचे पालखी सोहळे पंढरपूरला येतात. या पालखी सोहळ्यातले एक महत्त्वाचं आकर्षण म्हणजे रिंगण. हे रिंगण कसं केलं जातं, याबद्दल अनेकांना कुतुहल असतं. नुकतचं इंदापुरात संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचं रिंगण पार पडले. गोल रिंगणासाठी जमीन चांगली तयारी करावी लागते. या रिंगणाच्या स्थळी सर्वात मध्यभागी एक गोल रिंगण तयार केले जाते. त्यात मध्यभागी पालखी स्थानापन्न केली जाते. त्या रिंगणाबाहेर पालखीकडे पाठ करून प्रेक्षक बसलेले असतात. त्यानंतर अश्व दौडण्यासाठी गोलाकार धावपट्टी तयार केली जाते. धावपट्टीच्या दुसर्‍या बाजूला प्रेक्षकांना बसण्याची सोय केली जाते आणि त्यामागे दिंडीकर्‍यांनी गोलाकार कडे केलेले असते.



पालखी विराजमान झाली की, आपोआप रिंगण तयारच होते. तयार झालेल्या धावपट्टीवर अश्वांना दौडण्यासाठी सोडून देण्यात येते. त्याची ही दौड अवघा आसमंत डोळ्यात प्राण आणून पाहतो. या रिंगणानंतर चोपदार प्रत्येक दिंडीला उडीच्या खेळाचे निमंत्रण देतात. सर्व दिंड्या मिळून पालखीला मध्यभागी ठेवून एका तालासुरात ज्ञानोबा तुकारामाचा जयघोष करत, विविध खेळांचे प्रदर्शन घडवतात. ज्ञानोबा तुकारामाचा जयघोष.. तुकाराम तुकाराम असा टिपेला पोहोचतो आणि उडीचा खेळ समाप्त होतो.

Comments
Add Comment

Ashok Kharat : भोंदू खरातच्या कार्यालयात मिळाल्या महिलांच्या नावाने चेक आणि अंगठीच्या रिंगा

सिन्नर मध्ये रूपाली चाकणकरांनी घेतली कार्यकर्त्यांची बैठक नाशिक :  भोंदू बाबा अशोक खरात याच्या कार्यालयाची

Heatstroke : लातूर - उष्माघातामुळे बळींची संख्या ४ वर

लातूर :  निलंगा तालुक्यातील पानचिंचोली येथे एक हृदयद्रावक घटना घडली आहे. स्वतःच्या शेतात काम करत असताना ७५

Nashik : महापौर-उपमहापौरांकडून रस्ते व विकासकामांची पाहणी

नाशिक : नाशिक महानगरपालिका क्षेत्रातील प्रलंबित आणि सुरू असलेल्या विकासकामांचा दर्जा व वेग तपासण्यासाठी आज

मोठी बातमी! खासदार बजरंग सोनवणेंच्या कारला बीडमध्ये भीषण अपघात

बीड : बीडमधून मोठी बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार बजरंग सोनवणे यांच्या

Sharad Pawar : अजित पवारांच्या मृत्यूनंतर पवार कुटुंब पहिल्यांदाच एकत्र

पुणे : अजित पवारांच्या मृत्यूवेळी पवार कुटुंब एकत्र आपल्याला पाहायला मिळाले होते, त्यानंतर अनेक राजकीय घटना

लग्नाला जाताना कुटुंबावर काळाचा घाला, तिघांचा जागीच मृत्यू, मृतांमध्ये ३ वर्षीय चिमुकलीचा समावेश

Amravati accident : अमरावती जिल्हातील वरूड-मोर्शी महामार्गावर रस्ते अपघाताची भीषण घटना समोर आली आहे. खडका फाट्याजवळ