वारीतलं रिंगण : चैतन्य फुलवणारा सोहळा!

इंदापूर : आषाढी वारी म्हणजे केवळ एक धार्मिक यात्रा नाही, ती आहे विश्वासाची, भक्तीची आणि नित्य उत्साहाची चालतीबोलती गाथा. याच वारीतील एक अनमोल क्षण म्हणजे पालखी सोहळ्यातील अश्वांचे रिंगण! पालखी सोहळ्यात अश्वाचे रिंगण हा आकर्षणाचा अन् चैतन्य फुलवणारा सोहळा असतो. वारकरी वाटचाल करत असतात. त्याबरोबर अश्चही असतात. या अश्वांना वारकरी माऊली असेच मानतात. पळणे हा अश्वाचा स्थायिभाव असतो, त्यांना पळण्यासाठी कुठेतरी जागा करून द्यावी; हा त्यामागचा उद्देश असतो.


रिंगणामध्ये मोकळ्या ठेवलेल्या मार्गावर – तुळशी वृंदावन घेतलेल्या महिला, हातात पताका म्हणजे झेंडा घेतलेले वारकरी व विणेकरी हे स्वतंत्र रित्या पळतात. रिंगण झाल्यावर दिंड्यांचे विविध खेळ होतात. हे खेळ होताना टाळ व भजन सुरू असते. हे खेळ खेळणे आणि बघणे हा एक अवर्णनीय अनुभव असतो.



आषाढी वारीसाठी राज्याच्या कानाकोपर्‍यातून शेकडो संतांचे पालखी सोहळे पंढरपूरला येतात. या पालखी सोहळ्यातले एक महत्त्वाचं आकर्षण म्हणजे रिंगण. हे रिंगण कसं केलं जातं, याबद्दल अनेकांना कुतुहल असतं. नुकतचं इंदापुरात संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचं रिंगण पार पडले. गोल रिंगणासाठी जमीन चांगली तयारी करावी लागते. या रिंगणाच्या स्थळी सर्वात मध्यभागी एक गोल रिंगण तयार केले जाते. त्यात मध्यभागी पालखी स्थानापन्न केली जाते. त्या रिंगणाबाहेर पालखीकडे पाठ करून प्रेक्षक बसलेले असतात. त्यानंतर अश्व दौडण्यासाठी गोलाकार धावपट्टी तयार केली जाते. धावपट्टीच्या दुसर्‍या बाजूला प्रेक्षकांना बसण्याची सोय केली जाते आणि त्यामागे दिंडीकर्‍यांनी गोलाकार कडे केलेले असते.



पालखी विराजमान झाली की, आपोआप रिंगण तयारच होते. तयार झालेल्या धावपट्टीवर अश्वांना दौडण्यासाठी सोडून देण्यात येते. त्याची ही दौड अवघा आसमंत डोळ्यात प्राण आणून पाहतो. या रिंगणानंतर चोपदार प्रत्येक दिंडीला उडीच्या खेळाचे निमंत्रण देतात. सर्व दिंड्या मिळून पालखीला मध्यभागी ठेवून एका तालासुरात ज्ञानोबा तुकारामाचा जयघोष करत, विविध खेळांचे प्रदर्शन घडवतात. ज्ञानोबा तुकारामाचा जयघोष.. तुकाराम तुकाराम असा टिपेला पोहोचतो आणि उडीचा खेळ समाप्त होतो.

Comments
Add Comment

Four years Degree Course : आता पदवी अभ्यासक्रम चार वर्षांचा - नव शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी; पदवीस्तरावरच मिळणार संशोधनाची संधी

मुंबई : राज्यातील उच्च शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणणाऱ्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाची (२०२०) अंमलबजावणी

CM Devendra Fadnavis : “माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव” राज्यव्यापी अभियानाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

- उपमुख्यमंत्री, आरोग्य मंत्र्यासह मंत्रिमंडळाची उपस्थिती मुंबई : जागतिक आरोग्य दिनाच्या

Transfers Of IAS Officers : राज्यातील ११ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई : राज्य शासनाने मंगळवारी प्रशासकीय स्तरावर मोठे फेरबदल करत ११ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे (Transfers Of IAS Officers)

Export of fruits and vegetables : उपलब्ध निर्यात सुविधा केंद्रांचा प्रभावी वापर करून फळे व भाजीपाल्याची निर्यात वाढवावी - मंत्री जयकुमार रावल

मुंबई : राज्यात निर्यातक्षम फळे व भाजीपाला मोठ्या प्रमाणावर उत्पादित होतो. या पार्श्वभूमीवर उपलब्ध निर्यात

अवकाळीने झालेल्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना १२८ कोटी ६५ लाखांची मदत

जानेवारीपासून झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्याची कार्यवाही सुरू मुंबई : राज्यात ऑक्टोंबर ते डिसेंबर २०२५

Chipi-Mumbai Flights चिपी–मुंबई विमानसेवा जलदगतीने सुरू करा - सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांचे निर्देश

सकाळी व संध्याकाळी अशी दोनदा विमानसेवा देण्याबाबत विचार करण्याच्या ही दिल्या सूचना मुंबई : सिंधुदुर्ग जिल्हा