वारीतलं रिंगण : चैतन्य फुलवणारा सोहळा!

इंदापूर : आषाढी वारी म्हणजे केवळ एक धार्मिक यात्रा नाही, ती आहे विश्वासाची, भक्तीची आणि नित्य उत्साहाची चालतीबोलती गाथा. याच वारीतील एक अनमोल क्षण म्हणजे पालखी सोहळ्यातील अश्वांचे रिंगण! पालखी सोहळ्यात अश्वाचे रिंगण हा आकर्षणाचा अन् चैतन्य फुलवणारा सोहळा असतो. वारकरी वाटचाल करत असतात. त्याबरोबर अश्चही असतात. या अश्वांना वारकरी माऊली असेच मानतात. पळणे हा अश्वाचा स्थायिभाव असतो, त्यांना पळण्यासाठी कुठेतरी जागा करून द्यावी; हा त्यामागचा उद्देश असतो.


रिंगणामध्ये मोकळ्या ठेवलेल्या मार्गावर – तुळशी वृंदावन घेतलेल्या महिला, हातात पताका म्हणजे झेंडा घेतलेले वारकरी व विणेकरी हे स्वतंत्र रित्या पळतात. रिंगण झाल्यावर दिंड्यांचे विविध खेळ होतात. हे खेळ होताना टाळ व भजन सुरू असते. हे खेळ खेळणे आणि बघणे हा एक अवर्णनीय अनुभव असतो.



आषाढी वारीसाठी राज्याच्या कानाकोपर्‍यातून शेकडो संतांचे पालखी सोहळे पंढरपूरला येतात. या पालखी सोहळ्यातले एक महत्त्वाचं आकर्षण म्हणजे रिंगण. हे रिंगण कसं केलं जातं, याबद्दल अनेकांना कुतुहल असतं. नुकतचं इंदापुरात संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचं रिंगण पार पडले. गोल रिंगणासाठी जमीन चांगली तयारी करावी लागते. या रिंगणाच्या स्थळी सर्वात मध्यभागी एक गोल रिंगण तयार केले जाते. त्यात मध्यभागी पालखी स्थानापन्न केली जाते. त्या रिंगणाबाहेर पालखीकडे पाठ करून प्रेक्षक बसलेले असतात. त्यानंतर अश्व दौडण्यासाठी गोलाकार धावपट्टी तयार केली जाते. धावपट्टीच्या दुसर्‍या बाजूला प्रेक्षकांना बसण्याची सोय केली जाते आणि त्यामागे दिंडीकर्‍यांनी गोलाकार कडे केलेले असते.



पालखी विराजमान झाली की, आपोआप रिंगण तयारच होते. तयार झालेल्या धावपट्टीवर अश्वांना दौडण्यासाठी सोडून देण्यात येते. त्याची ही दौड अवघा आसमंत डोळ्यात प्राण आणून पाहतो. या रिंगणानंतर चोपदार प्रत्येक दिंडीला उडीच्या खेळाचे निमंत्रण देतात. सर्व दिंड्या मिळून पालखीला मध्यभागी ठेवून एका तालासुरात ज्ञानोबा तुकारामाचा जयघोष करत, विविध खेळांचे प्रदर्शन घडवतात. ज्ञानोबा तुकारामाचा जयघोष.. तुकाराम तुकाराम असा टिपेला पोहोचतो आणि उडीचा खेळ समाप्त होतो.

Comments
Add Comment

Nitesh Rane: आम्ही विरोधकांना दुर्बीण घेऊन शोधत...; नितेश राणेंचा विरोधकांवर हल्लाबोल

सिंधुदुर्ग: राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत सिमितीच्या निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. याच निवडणुकीच्या

मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर आणखी एक अपघात, वाहतुकीची कोंडीच कोंडी

पुणे : मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर खंडाळा घाटातील आडोशी बोगद्याजवळ पुण्याकडून मुंबईच्या दिशेने प्रोपिलीन वायू

आपत्कालीन परिस्थितीतील वाहतूक आराखडा तत्काळ तयार करा - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग वाहतूक कोंडीची उपमुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल मिसिंग लिंकचे कामही लवकरात लवकर

अमरावती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासाठी १२ हेक्टर जागा मंजूर

देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेवरून महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय १०० विद्यार्थी प्रवेश ⁠४३०

पुणे एक्सप्रेस वे अपघात प्रकरणी महाराष्ट्र राज्य परिवहन सेवेच्या १३९ फेऱ्या रद्द

मुंबई : पुणे–मुंबई एक्सप्रेस वेवर झालेल्या टँकर अपघातामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली असून या

एक्सप्रेवेवर प्रचंड मोठी वाहतूक कोंडी अन् २५ किलोमीटर पर्यंत रांगा; नेमकं पुण्यात घडलं काय ?

लोणावळा : मुंबई–पुणे द्रुतगती महामार्गावर मंगळवारी सायंकाळी घडलेल्या एका अपघातामुळे संपूर्ण मार्गावर