वारीतलं रिंगण : चैतन्य फुलवणारा सोहळा!

  27

इंदापूर : आषाढी वारी म्हणजे केवळ एक धार्मिक यात्रा नाही, ती आहे विश्वासाची, भक्तीची आणि नित्य उत्साहाची चालतीबोलती गाथा. याच वारीतील एक अनमोल क्षण म्हणजे पालखी सोहळ्यातील अश्वांचे रिंगण! पालखी सोहळ्यात अश्वाचे रिंगण हा आकर्षणाचा अन् चैतन्य फुलवणारा सोहळा असतो. वारकरी वाटचाल करत असतात. त्याबरोबर अश्चही असतात. या अश्वांना वारकरी माऊली असेच मानतात. पळणे हा अश्वाचा स्थायिभाव असतो, त्यांना पळण्यासाठी कुठेतरी जागा करून द्यावी; हा त्यामागचा उद्देश असतो.


रिंगणामध्ये मोकळ्या ठेवलेल्या मार्गावर – तुळशी वृंदावन घेतलेल्या महिला, हातात पताका म्हणजे झेंडा घेतलेले वारकरी व विणेकरी हे स्वतंत्र रित्या पळतात. रिंगण झाल्यावर दिंड्यांचे विविध खेळ होतात. हे खेळ होताना टाळ व भजन सुरू असते. हे खेळ खेळणे आणि बघणे हा एक अवर्णनीय अनुभव असतो.



आषाढी वारीसाठी राज्याच्या कानाकोपर्‍यातून शेकडो संतांचे पालखी सोहळे पंढरपूरला येतात. या पालखी सोहळ्यातले एक महत्त्वाचं आकर्षण म्हणजे रिंगण. हे रिंगण कसं केलं जातं, याबद्दल अनेकांना कुतुहल असतं. नुकतचं इंदापुरात संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचं रिंगण पार पडले. गोल रिंगणासाठी जमीन चांगली तयारी करावी लागते. या रिंगणाच्या स्थळी सर्वात मध्यभागी एक गोल रिंगण तयार केले जाते. त्यात मध्यभागी पालखी स्थानापन्न केली जाते. त्या रिंगणाबाहेर पालखीकडे पाठ करून प्रेक्षक बसलेले असतात. त्यानंतर अश्व दौडण्यासाठी गोलाकार धावपट्टी तयार केली जाते. धावपट्टीच्या दुसर्‍या बाजूला प्रेक्षकांना बसण्याची सोय केली जाते आणि त्यामागे दिंडीकर्‍यांनी गोलाकार कडे केलेले असते.



पालखी विराजमान झाली की, आपोआप रिंगण तयारच होते. तयार झालेल्या धावपट्टीवर अश्वांना दौडण्यासाठी सोडून देण्यात येते. त्याची ही दौड अवघा आसमंत डोळ्यात प्राण आणून पाहतो. या रिंगणानंतर चोपदार प्रत्येक दिंडीला उडीच्या खेळाचे निमंत्रण देतात. सर्व दिंड्या मिळून पालखीला मध्यभागी ठेवून एका तालासुरात ज्ञानोबा तुकारामाचा जयघोष करत, विविध खेळांचे प्रदर्शन घडवतात. ज्ञानोबा तुकारामाचा जयघोष.. तुकाराम तुकाराम असा टिपेला पोहोचतो आणि उडीचा खेळ समाप्त होतो.

Comments
Add Comment

Monsoon Update : विदर्भात मान्सून निराशाजनक; नागपूरसह पाच जिल्हे रेड झोनमध्ये? शेतकरी चिंताग्रस्त!

नागपूर : विदर्भात यंदा मान्सूनचे अपेक्षेपेक्षा पंधरा दिवस लवकर आगमन झाल्यानंतर शेतकरी व सामान्य जनतेला

व्होट जिहादचे उत्तर हिंदूंनी एकत्रितपणे दिले : डॉ. विखे

अ.नगर : आ.संग्राम जगताप हे एक हिंदुत्वाचा विचार आहे.त्यांना समर्थन देण्यासाठी आपण सर्वजण एकत्रित आलो आहे.माझ्या

नांदगाव राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार

माजी नगरसेवक वाल्मीक टिळेकर यांचा शेकडो सर्मथकांसह शिवसेनेत प्रवेश नांदगाव : नांदगाव नगरपालिकेचे राष्ट्रवादी

पुण्यात दिसले इराणचे झेंडे आणि खामेनेईंचे पोस्टर

पुणे : इस्रायल - इराण दरम्यान युद्धबंदी झाल्याचे ट्रम्प यांनी जाहीर केले असले तरी दोन्ही देशांमध्ये तणाव कायम

आमदाराची मुलगी शासकीय आश्रम शाळेत शिकणार !

गडचिरोली : आजच्या काळात सर्व पालक आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिक्षण देण्याच्या तयारीत असतात ,

मोठी बातमी : देवा विठ्ठला काय हे! पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांना लुटून नंतर अल्पवयीन मुलीवर अत्याचार

वारकऱ्यांनाही अडवून गळ्याला कोयता दौंड : आषाढी वारी (Ashadhi Wari 2025) हा संपूर्ण महाराष्ट्राचा एक महत्त्वपूर्ण