यंदा १.५ लाख गोविंदांना मिळणार विमा संरक्षण

  85

मुंबई : यंदा गोकुळाष्टमीच्या पार्श्वभूमीवर गोविंदा उत्सव सुरक्षित आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी शासनाने राज्यातील १.५ लाख गोविंदांना विमा संरक्षण मिळावे, अशी विनंती राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केली आहे. लवकरच याबाबत शासनाकडून निर्णय जाहीर होईल अशी माहिती महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.

मंत्री सरनाईक म्हणाले की,गोविंद (दहीहंडी) उत्सव हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेतील एक महत्वाचा सण असून त्यात हजारो युवक सहभागी होतात. गोविंदा खेळताना होणाऱ्या अपघातांमध्ये अनेकांना गंभीर दुखापती होतात. या पार्श्वभूमीवर, गोविंदा पथकांतील खेळाडूंना औषधोपचार व विमा संरक्षण मिळावे यासाठी युवासेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांनी राज्य शासनाने विमा संरक्षणाच्या माध्यमातून आर्थिक मदत करावी अशी मागणी केली होती. त्या अनुषंगाने आज राज्याचे उपमुख्यमंत्री व आमच्या पक्षाचे नेते श्री एकनाथ शिंदे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना या संदर्भात लेखी निवेदन सादर केले. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी याबाबत सकारात्मक दाखवली असून लवकरच राज्यातील दीड लाख गोविंदांना विमा संरक्षण देण्याबाबत शासनाकडून निर्णय होईल अशी ग्वाही दिली आहे.

यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, प्रत्येक वर्षी गोकुळाष्टमीच्या निमित्ताने हजारो गोविंद पथक रस्त्यांवर उतरतात. यावेळी होणाऱ्या संभाव्य अपघातांमध्ये तातडीची वैद्यकीय मदत तसेच आर्थिक सहाय्य उपलब्ध व्हावे यासाठी शासन कटिबद्ध आहे. मागील वर्षीही याच स्वरूपाचा निधी गोविंदा सणाच्या पार्श्वभूमीवर देण्यात आला होता.

हा निर्णय गोविंद उत्सवाच्या सुरक्षिततेसाठी एक सकारात्मक पाऊल असून, यामुळे उत्सवात सहभागी होणाऱ्या युवकांचा आत्मविश्वास वाढणार आहे. अशी प्रतिक्रिया युवा सेनेचे कार्याध्यक्ष पुर्वेश सरनाईक यांनी दिली आहे.
Comments
Add Comment

माजी बँक अध्यक्ष 'फरार' घोषित!

मुंबई: १२२ कोटी रुपयांच्या गैरव्यवहार घोटाळ्याप्रकरणी एस्प्लेनेड न्यायालयाने 'न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह

भाजपकडून गणेश भक्तांसाठी मोफत प्रवास!

मुंबई: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी मुंबई भाजपने ३५० मोफत बसेस आणि विशेष रेल्वे सेवांची

गणेशोत्सवासाठी मेट्रोची 'वेळेत' वाढ!

मुंबई: एमएमआरडीएने (MMRDA) जाहीर केले आहे की, २७ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर २०२५ या ११ दिवसांसाठी मेट्रो मार्ग २ए आणि ७ वरील

कोकणवासियांसाठी आनंदाची बातमी , मुंबई ते मडगाव प्रवास होणार अधिक सोयीस्कर !

मुंबई : मुंबई ते मडगाव दरम्यान आतापर्यंत आठ डब्यांची ‘वंदे भारत’ चालवण्यात येत होती. मात्र, गणेश चतुर्थीच्या

अमित ठाकरे आणि आशिष शेलारांच्या भेटीत काय झाले ?

मुंबई : मनसेचे युवा नेते अमित ठाकरे यांनी शनिवारी मुंबईत मंत्री आशिष शेलार यांची भेट घेतली. मनसे प्रमुख राज ठाकरे

Maharashtra Police : पदोन्नतीचे आदेश २४ तासांत रद्द, ३६४ पोलीस निरीक्षकांना मूळ पदावर परत पाठवण्याचे आदेश, मॅटने दिला दणका

मुंबई : पदोन्नतीतील आरक्षणाला कायदेशीर मान्यता नसल्याचे निकाल मुंबई उच्च न्यायालयाने तसेच महाराष्ट्र