'ऑपरेशन सिंदूर'नंतर भारताची गरुडझेप : आता पाकिस्तान-चीनच्या प्रत्येक हालचालीवर करडी नजर!

नवी दिल्ली: 'ऑपरेशन सिंदूर'मधील यशानंतर भारताने आता मोठी कंबर कसली आहे! शत्रू देशांच्या मनात धडकी भरेल अशी एक जबरदस्त तयारी भारतानं सुरू केली आहे. भारत एक-दोन नव्हे, तर तब्बल ५२ नवे उपग्रह अवकाशात प्रक्षेपित करणार आहे. या सर्व उपग्रहांचा वापर पूर्णपणे लष्करी कामांसाठी केला जाईल, ज्यामुळे पाकिस्तानसह चीनच्या कानाकोपऱ्यातही भारताची नजर असेल!


याशिवाय, लष्करासाठी एक खास 'स्पेस डॉक्ट्रिन' (Space Doctrine) अंतिम करण्याची प्रक्रियाही वेगाने सुरू आहे. 'ऑपरेशन सिंदूर'दरम्यान भारताने आपल्या सॅटेलाईट सिस्टीमचा वापर करून पाकिस्तानच्या विविध लष्करी तळांवर यशस्वीपणे नजर ठेवली होती, ज्यामुळे लष्कराला अचूक लक्ष्य निश्चित करण्यास मोठी मदत झाली होती.



२६ हजार कोटींचा महाप्रकल्प: ५२ उपग्रह करणार टेहळणी!


भारताचा हा महत्त्वाकांक्षी उपग्रह प्रक्षेपण कार्यक्रम अंतराळ आधारित देखरेख (Space-based Surveillance) कार्यक्रमाच्या तिसऱ्या टप्प्याचा भाग आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील सुरक्षा विषयक कॅबिनेट समितीने गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये या प्रकल्पाला मंजुरी दिली होती. यावर एकूण २६,९६८ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.


या योजनेअंतर्गत, भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रो (ISRO) २१ उपग्रह प्रक्षेपित करणार आहे, तर उर्वरित ३१ उपग्रह खासगी कंपन्यांच्या मदतीने अवकाशात पाठवले जातील. पुढील वर्षी एप्रिलमध्ये पहिले दोन उपग्रह प्रक्षेपित होतील, तर २०२९ च्या अखेरपर्यंत सर्व ५२ उपग्रह तैनात केले जातील.



चीन-पाकिस्तान आणि हिंदी महासागरावर लक्ष!


संरक्षण मंत्रालयामार्फत चालवण्यात येत असलेल्या 'डिफेन्स स्पेस एजन्सी'च्या या प्रकल्पावर वेगाने काम सुरू आहे. 'टाइम्स ऑफ इंडिया'च्या माहितीनुसार, एसबीएस-३ चा मुख्य उद्देश चीन आणि पाकिस्तानच्या अधिकाधिक भूभागांवर करडी नजर ठेवणे हा आहे. यासोबतच हिंदी महासागरातील हालचालींवरही बारीक लक्ष ठेवण्यात येणार आहे.


या सर्व उपग्रहांचे प्रक्षेपण वेळेत पूर्ण करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. सध्या तीन खासगी कंपन्यांशी यासाठी करार करण्यात आला असून, त्यांना हे काम जलदगतीने पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.



मानवरहित विमाने टेहळणी करणार!


याशिवाय, भारतीय हवाई दल तीन 'हाय अल्टिट्यूड प्लॅटफॉर्म सिस्टीम' (HAPS) विमाने तयार करत आहे. ही विमाने मानवरहित असतील आणि उपग्रहांच्या आधारे काम करतील, ज्यामुळे भारताच्या टेहळणी क्षमतेत आणखी वाढ होणार आहे. 'ऑपरेशन सिंदूर'नंतर भारताने घेतलेली ही मोठी झेप, देशाच्या सुरक्षिततेसाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.

Comments
Add Comment

Bharat Taxi App: ओला,उबरला पर्यायी भारत टॅक्सी ॲप लाँच; जाणून घ्या ॲप बद्दल

दिल्ली: केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी आज म्हणजेच गुरुवारी (५ फेब्रुवारी २०२६) भारतातील पहिले

Shiv Navratri 2026: उज्जैनमध्ये शिव नवरात्र कधी सुरू होणार, नऊ दिवसांत काय विशेष असणार, जाणून घ्या

दिल्ली: उज्जैनचे महाकालेश्वर मंदिर जगप्रसिद्ध आहे. मंदिराशी संबंधित धार्मिक श्रद्धेमुळे येथे दररोज भाविकांची

Jammu and Kashmir: लष्कराची मोठी कारवाई; टॉप कमांडरसह २ पाकिस्तानी दहशदवाद्यांचा खात्मा

जम्मू काश्मीर: जम्मू आणि काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यात भारतीय लष्कराकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत

विदेशी राजस्थान फिरण्यासाठी आले खरे, पण भारताने केली हकालपट्टी; कारण काय?

अजमेर : राजस्थानमध्ये लाखो पर्यटक फिरण्यासाठी येत असतात. विदेशी पर्यटकांना राजस्थानातील राजे राजवाड्यांची,

श्री स्वामी सत्यमित्रानंद गिरी सनातन संस्कृतीचे प्रमुख वाहक

समाधी मंदिर भावी पिढ्यासाठी प्रेरणास्थळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांस्कृतिक पुनरोत्थानाच्या कार्याला

Uttar Pradesh Rain Alert: उत्तर प्रदेशातील २५ जिल्ह्यांमध्ये गारांचा पाऊस पडणार, दिल्ली-पंजाब ते बिहार-राजस्थानपर्यंत हवामान कसे असेल?, जाणून घ्या...

दिल्ली: दिल्ली-एनसीआरमध्ये हिवाळा परतला आहे. पर्वतांवरील बर्फ वितळत आहे आणि पश्चिमी विक्षोभाचा प्रभाव असल्याने