'ऑपरेशन सिंदूर'नंतर भारताची गरुडझेप : आता पाकिस्तान-चीनच्या प्रत्येक हालचालीवर करडी नजर!

नवी दिल्ली: 'ऑपरेशन सिंदूर'मधील यशानंतर भारताने आता मोठी कंबर कसली आहे! शत्रू देशांच्या मनात धडकी भरेल अशी एक जबरदस्त तयारी भारतानं सुरू केली आहे. भारत एक-दोन नव्हे, तर तब्बल ५२ नवे उपग्रह अवकाशात प्रक्षेपित करणार आहे. या सर्व उपग्रहांचा वापर पूर्णपणे लष्करी कामांसाठी केला जाईल, ज्यामुळे पाकिस्तानसह चीनच्या कानाकोपऱ्यातही भारताची नजर असेल!


याशिवाय, लष्करासाठी एक खास 'स्पेस डॉक्ट्रिन' (Space Doctrine) अंतिम करण्याची प्रक्रियाही वेगाने सुरू आहे. 'ऑपरेशन सिंदूर'दरम्यान भारताने आपल्या सॅटेलाईट सिस्टीमचा वापर करून पाकिस्तानच्या विविध लष्करी तळांवर यशस्वीपणे नजर ठेवली होती, ज्यामुळे लष्कराला अचूक लक्ष्य निश्चित करण्यास मोठी मदत झाली होती.



२६ हजार कोटींचा महाप्रकल्प: ५२ उपग्रह करणार टेहळणी!


भारताचा हा महत्त्वाकांक्षी उपग्रह प्रक्षेपण कार्यक्रम अंतराळ आधारित देखरेख (Space-based Surveillance) कार्यक्रमाच्या तिसऱ्या टप्प्याचा भाग आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील सुरक्षा विषयक कॅबिनेट समितीने गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये या प्रकल्पाला मंजुरी दिली होती. यावर एकूण २६,९६८ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.


या योजनेअंतर्गत, भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रो (ISRO) २१ उपग्रह प्रक्षेपित करणार आहे, तर उर्वरित ३१ उपग्रह खासगी कंपन्यांच्या मदतीने अवकाशात पाठवले जातील. पुढील वर्षी एप्रिलमध्ये पहिले दोन उपग्रह प्रक्षेपित होतील, तर २०२९ च्या अखेरपर्यंत सर्व ५२ उपग्रह तैनात केले जातील.



चीन-पाकिस्तान आणि हिंदी महासागरावर लक्ष!


संरक्षण मंत्रालयामार्फत चालवण्यात येत असलेल्या 'डिफेन्स स्पेस एजन्सी'च्या या प्रकल्पावर वेगाने काम सुरू आहे. 'टाइम्स ऑफ इंडिया'च्या माहितीनुसार, एसबीएस-३ चा मुख्य उद्देश चीन आणि पाकिस्तानच्या अधिकाधिक भूभागांवर करडी नजर ठेवणे हा आहे. यासोबतच हिंदी महासागरातील हालचालींवरही बारीक लक्ष ठेवण्यात येणार आहे.


या सर्व उपग्रहांचे प्रक्षेपण वेळेत पूर्ण करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. सध्या तीन खासगी कंपन्यांशी यासाठी करार करण्यात आला असून, त्यांना हे काम जलदगतीने पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.



मानवरहित विमाने टेहळणी करणार!


याशिवाय, भारतीय हवाई दल तीन 'हाय अल्टिट्यूड प्लॅटफॉर्म सिस्टीम' (HAPS) विमाने तयार करत आहे. ही विमाने मानवरहित असतील आणि उपग्रहांच्या आधारे काम करतील, ज्यामुळे भारताच्या टेहळणी क्षमतेत आणखी वाढ होणार आहे. 'ऑपरेशन सिंदूर'नंतर भारताने घेतलेली ही मोठी झेप, देशाच्या सुरक्षिततेसाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.

Comments
Add Comment

दिल्ली विमानतळावरुन एकाच फॉर्च्युनरमधून मोदी आणि पुतिन रवाना

नवी दिल्ली : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन गुरुवारी संध्याकाळी दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले. नवी

Rasgulla Fight Cancels Bihar Wedding : रसगुल्ल्यामुळे झाला कुस्ती हल्ला! लग्नात दिसेल ते फेकून मारलं; नवरदेव-नवरीची गाठ पडण्याआधीच पाहुण्यांमध्ये 'डब्ल्यू डब्ल्यू इ'!

बिहार : लग्न समारंभ हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक अत्यंत आनंदाचा आणि संस्मरणीय क्षण असतो. हा क्षण खास

भाडेकरूंना दिलासा! घरभाड्याबाबत नवा निर्णय लवकरच होणार लागू, केंद्र सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

नवी दिल्ली: वाढत्या महागाईमुळे घरांच्या किमतीमध्ये सुद्धा लक्षणीय वाढ झाली असल्याने देशातील लाखो लोक

Doctor Death News : युवा डॉक्टरांचे स्वप्न भंगले; भरधाव कारची ट्रकला धडक, वेगामुळे झालेल्या अपघातात चौघांचा दुर्दैवी अंत

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातील अमरोहा जिल्ह्यामध्ये बुधवारी (३ डिसेंबर २०२५) रोजी एक हृदय पिळवटून टाकणारी आणि

८७ बेकायदेशीर 'लोन ॲप'वर कारवाई : केंद्र सरकारची लोकसभेत माहिती

नवी दिल्ली : डिजिटल फसवणुकीचे वाढते प्रमाण आणि अवैध ऑनलाइन कर्ज व्यवहारांच्या माध्यमातून नागरिकांची आर्थिक लूट

आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टी बांधकामात मशि‍दीचा अडथळा

कोलकाता: सर्वाधिक व्यस्त विमानतळांपैकी एक असणाऱ्या कोलकात्यातील नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळ