गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्यास रेल्वेचे तिकीट मिळेना

रात्रभर रांगेत जागूनही झाल्या दोन मिनिटांत गाड्या फुल्ल


मुंबई (प्रतिनिधी) : गणेशोत्सवासाठी गावाकडे नाणान्य कोकण रेल्वेचे कन्फर्म तिकीट मिळावे, म्हणून चाकरमान्यांनी गेल्या चार दिवसांपासून दादर, भांडुप, विक्रोळी वाणि ठाणे रेल्वे स्टेशनवरील तिकीट खिडक्यांवर रांगा लावल्या होत्या. मात्र, शुक्रवारी सकाळी ८ वाजता कोकण रेल्वेचे बुकिंग सुरू झाले आणि अवघ्या दोन मिनिटांत कोकणात जाणाऱ्या सगळ्याच रेल्वे गाडया फुल्ल झाल्या. मात्र रांगेतील पहिल्याच प्रवाशाला कन्फर्म तिकीट मिळाले, तर दुसऱ्याला आरएसीवर समाधान मानावे लागले. इतरांच्या वाटयाला वेटिंग तिकीटही न आल्याने संताप व्यक्त होत आहे.


गणपतीला कोकणात जाण्यासाठी रेल्वेचे तिकीट आम्हाला मिळत नाही, तर नेमके कोण बुक करत आहे? असा सवाल चाकरमनी विचारत आहेत. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागामध्ये १२६ तिकीट आरक्षण खिडक्या असून, या सर्व ठिकाणी अशीच परिस्थिती आहे. त्यामुळे तिकीट विक्री बंद कराव्यात, अत्ते चाकरमान्यांचे म्हणणे आहे.


मध्य रेल्वेने सांगितल्यानुसार कोकण रेल्वेने मागणी केल्पास दिव्यावरून ५०० पेक्षा अधिक विशेष गाड्या चालविण्याची मध्य रेल्वेची तयारी आहे; परंतु कोकण रेल्वे मार्गावर पावसाळी वेळापत्रकामुळे सुरक्षेच्या करणास्तव गाड्यांची संख्या कमी आणि धिमी करण्यात येते. तसेच, वेटिंग तिकिटांचा कोटा ट्रेनच्या एकूण कोट्यापेक्षा २५ टक्के ठेवण्यात आल्या आहेत, मात्र, रांगेत कोणालाही वेटिंग तिकीट मिळत नसल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे.



प्रवाशांची रेल्वे प्रशासनावर आगपाखड


अनेक प्रवासी तिकीट मिळवण्यासाठी सलग चार दिवस रांग लावत असल्याचे त्यांनी सांगितले. ठाणे स्थानकावील आरक्षण केंद्रावर ८ तिकीट खिडक्या असून, प्रत्येक खिडकीवर किमान १० ते १२ प्रवासी रागेत उभे होते. विकीट खिडकी सकाळी ८ वाजता सुरू झाली, परंतु रांगेत असलेल्या केवळ पहिल्याच प्रवाशाला कन्फर्म तिकीट मिळाले, तर त्या मागच्या एका प्रवासाला आरएसी तिकीट मिळाले, केवळ २ मिनिटामध्ये सर्व तिकिट संपल्याने रांगेतल्या प्रवाशांचा रेल्वे प्रशासनावर रोष पाहायला मिळाला, दादर आणि भांडुप स्थानकात देखील अशीय काहीशी परिस्थिती होती.

Comments
Add Comment

Nitesh Rane : मच्छीमार बांधवांसाठी आधुनिक व सर्व सुविधांयुक्त वास्तू उभारणार – मंत्री नितेश राणे

· मरोळ मच्छी मार्केटच्या विकासकामांना गती देणार मुंबई, दि. 12: मुंबईतील मच्छीमार बांधवांसाठी महत्त्वपूर्ण

Water Metro : महाराष्ट्र सागरी मंडळाच्या अर्थसंकल्पाला मंजुरी; वॉटर मेट्रोसह विविध प्रकल्पांना मिळणार गती

मुंबई : महाराष्ट्राच्या सागरी क्षेत्रातील पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र सागरी मंडळाने अनेक

Chandrashekhar Bawankule : राज्यात 60 ‘आदर्श दुय्यम निबंधक’ कार्यालये उभारणार; पुण्यातील कोथरूडमध्ये पहिले कार्यालय

मुंबई : राज्यातील दुय्यम निबंधक कार्यालयांचे आधुनिकीकरण करण्यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. नोंदणी

Jalgaon Crime : कंटाळा आला आहे, आता मी निघतो...; सुसाईड नोट लिहून तरुणाची आत्महत्या

Jalgaon Crime : राजस्थानमध्ये पाठविलेल्या मालाचे ७ लाख रुपये मिळत नसल्याने एका तरुण उद्योजकाने आपली जीवनयात्रा संपवली

Ayurvedic products : राज्यातील १३५ आयुर्वेदिक उत्पादकांना कारणे दाखवा नोटीस

१० उत्पादकांचे परवाने कायमस्वरूपी रद्द; अन्न व औषध प्रशासनाची कारवाई मुंबई : राज्यात हॉटेल्स आणि औषध

Kurla Landslide : कुर्ल्यातील भूस्खलनात 6 जणांचा मृत्यू; कायमस्वरूपी पुनर्वसनासाठी पाठपुरावा करणार - सचिन अहिर

मुंबई : कुर्ल्यातील चिराग नगर परिसरातील गौशिया चाळीजवळ मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या भूस्खलनाच्या