गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्यास रेल्वेचे तिकीट मिळेना

रात्रभर रांगेत जागूनही झाल्या दोन मिनिटांत गाड्या फुल्ल


मुंबई (प्रतिनिधी) : गणेशोत्सवासाठी गावाकडे नाणान्य कोकण रेल्वेचे कन्फर्म तिकीट मिळावे, म्हणून चाकरमान्यांनी गेल्या चार दिवसांपासून दादर, भांडुप, विक्रोळी वाणि ठाणे रेल्वे स्टेशनवरील तिकीट खिडक्यांवर रांगा लावल्या होत्या. मात्र, शुक्रवारी सकाळी ८ वाजता कोकण रेल्वेचे बुकिंग सुरू झाले आणि अवघ्या दोन मिनिटांत कोकणात जाणाऱ्या सगळ्याच रेल्वे गाडया फुल्ल झाल्या. मात्र रांगेतील पहिल्याच प्रवाशाला कन्फर्म तिकीट मिळाले, तर दुसऱ्याला आरएसीवर समाधान मानावे लागले. इतरांच्या वाटयाला वेटिंग तिकीटही न आल्याने संताप व्यक्त होत आहे.


गणपतीला कोकणात जाण्यासाठी रेल्वेचे तिकीट आम्हाला मिळत नाही, तर नेमके कोण बुक करत आहे? असा सवाल चाकरमनी विचारत आहेत. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागामध्ये १२६ तिकीट आरक्षण खिडक्या असून, या सर्व ठिकाणी अशीच परिस्थिती आहे. त्यामुळे तिकीट विक्री बंद कराव्यात, अत्ते चाकरमान्यांचे म्हणणे आहे.


मध्य रेल्वेने सांगितल्यानुसार कोकण रेल्वेने मागणी केल्पास दिव्यावरून ५०० पेक्षा अधिक विशेष गाड्या चालविण्याची मध्य रेल्वेची तयारी आहे; परंतु कोकण रेल्वे मार्गावर पावसाळी वेळापत्रकामुळे सुरक्षेच्या करणास्तव गाड्यांची संख्या कमी आणि धिमी करण्यात येते. तसेच, वेटिंग तिकिटांचा कोटा ट्रेनच्या एकूण कोट्यापेक्षा २५ टक्के ठेवण्यात आल्या आहेत, मात्र, रांगेत कोणालाही वेटिंग तिकीट मिळत नसल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे.



प्रवाशांची रेल्वे प्रशासनावर आगपाखड


अनेक प्रवासी तिकीट मिळवण्यासाठी सलग चार दिवस रांग लावत असल्याचे त्यांनी सांगितले. ठाणे स्थानकावील आरक्षण केंद्रावर ८ तिकीट खिडक्या असून, प्रत्येक खिडकीवर किमान १० ते १२ प्रवासी रागेत उभे होते. विकीट खिडकी सकाळी ८ वाजता सुरू झाली, परंतु रांगेत असलेल्या केवळ पहिल्याच प्रवाशाला कन्फर्म तिकीट मिळाले, तर त्या मागच्या एका प्रवासाला आरएसी तिकीट मिळाले, केवळ २ मिनिटामध्ये सर्व तिकिट संपल्याने रांगेतल्या प्रवाशांचा रेल्वे प्रशासनावर रोष पाहायला मिळाला, दादर आणि भांडुप स्थानकात देखील अशीय काहीशी परिस्थिती होती.

Comments
Add Comment

मुंबईतील १९८५ ते २०२५ पर्यंतच्या आरक्षित वास्तूंचा शोध घ्या, कागदपत्रे तपासा; महापौरांचे प्रशासनाला आदेश

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : सार्वजनिक सुविधा, समाज कल्याण केंद्र, निवासी आरक्षण असलेल्या महानगरपालिकेच्या वास्तू,

अतिरिक्त आयुक्त डॉ अश्विनी जोशी है तो सब मुनकीन है

लक्ष्यापेक्षा २७० कोटी रुपयांची मालमत्ता कराची अधिकची वसुली मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेच्या

Mumbai : ना सोसाट्याचा वारा सुटला, ना पाऊस पडला पण झाडाची फांदी तुटून एकाचा मृत्यू झाला

मुंबई : महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये नागरिक असह्य उकाड्याने हैराण आहेत, त्याचवेळी राज्याच्या काही

RTE अंतर्गत आले दोन लाख ८८ हजार अर्ज

मुंबई : शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशासाठी राज्यातील दोन लाख ८८ हजारांहून

Rejuvenation of rivers : राज्यातील नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी स्वतंत्र प्राधिकरणाची स्थापना

मुंबई : राज्यातील नद्यांचे वाढते प्रदूषण रोखण्यासाठी आणि नद्यांना पुनर्वैभव प्राप्त करून देण्यासाठी राज्य

आर्थिक वर्षाच्या अखेरीस मंत्रालयात 'जीआर'चा पाऊस

चार दिवसांत ९५१ निर्णयांचा धडाका; सुट्ट्यांच्या दिवशीही प्रशासन 'ऑन ड्युटी' मुंबई : आर्थिक वर्षाच्या अखेरीस