मुंबई : मागील सरकारमध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना हिंदी भाषा सक्तीकरणाला पाठिंबा दिला होता. त्यामुळे राज्यात काही दिवसांपासून हिदी भाषावरुन राजकारण चांगलंच तापल होत. थोड्याच वेळापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन हिंदी भाषा सक्तीकरणाचा जी.आर. रद्द केल्याची घोषणा फडणवीस यांनी केली. त्यामुळे सर्वपक्षीय नेत्यांनी पाच तारखेचा मोर्चा रद्द केला. उद्धव ठाकरेंचा काळात घेण्यात आलेला निर्णयाला राज्य सरकारकडून विरोध करण्यात आल्यामुळे मराठी जनतेने देखील फडणवीस सरकारचे आभार मानले आहेत.
देवेंद्र फडणवीस यांनी आज सकाळी महत्वाची बैठक बोलावली होती. या बैठकीत हिंदी भाषा सक्तीकरणाचा जीआर रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे फडणवीस यांनी आपल्या पत्रकार परिषदेत अनेक गौप्यस्फोट करुन, हिंदी भाषेला पाठिंंबा कुणाचा होता ? हिंदी भाषेची सक्ती करण्यासाठी नेमका मुद्दा कुणी मांडला? यांसारखी माहिती जनतेसमोर पत्रकार परिषदेतून उघड केली. त्यामुळे मराठी जनतेने फडवीस सरकारचे आभार मानले आहेत.
फडणवीस यांनी आपल्या पत्रकार परिषदेतून राज ठाकरे यांनाही प्रश्न केला. हिंदी भाषा सक्तीकरणाला विरोध करण्यापूर्वी उद्धव ठाकरेंना प्रश्न विचारा, हिंदी भाषा शालेय शैक्षणिक वर्षात सामावेश करण्यासाठी मंत्रालयात निर्णय कुणी घेतला होता? त्यामुळे तुम्ही कोणत्या तोंडाने आंदोलन करता असा सवाल फडणवीस यांनी आपल्या पत्रकार परिषदेतून उपस्थित केला. त्यामुळे फडणवीस सरकारच्या पत्रकार परिषदे नंतर मराठी जनतेने सरकारला पाठिंबा दर्शवला.