पेशवेकालीन कागदपत्रांमधून उलगडला किल्ले मानगडाचा इतिहास

टेहाळणीसाठी किल्ल्याचे विशेष महत्त्व


माणगाव : दुर्गराज किल्ले रायगडाचा उपदुर्ग समजल्या जाणाऱ्या ऐतिहासिक किल्ले मानगडाच्या संदर्भातील पेशवेकालीन नोंदी सापडल्या असून यामुळे मानगडाच्या इतिहासाचे अनेक अपरिचित पैलू उलगडले आहेत .


पुणे पुराभिलेख कार्यालयातील मोडीलिपी कागदपत्रांमधून किल्ले मानगडावर वेताळ बुरुज, गडदचा बुरुज, सबजा बुरुज, फत्या बुरुज, नगारा बुरुज असे तब्बल चौदा बुरुजांची नावे सापडल्याने शिवकाळात टेहळणीसाठी मानगडाचे महत्त्व अधोरेखित झाले आहे.


पुण्यातील इतिहास अभ्यासक तसेच मोडीलिपी अभ्यासक राज ऊर्फ योगेंद्र मेमाणे यांनी शोधलेल्या इसवी सन १७८४ मधील या नोंदींनुसार मानगडावरील इमारती सदर, दिवाणघर, चिरेबंदी कोठी, मोदीखाना ( तोफखाना ), बंगला, तारांगणनजीकची दिंड , कोठी आरकसी असा उल्लेखही सापडला आहे. विशेष बाब म्हणजे मानगडावरील एका पाण्याच्या टाक्याचे नाव ‘गंगासागर’ असल्याची महत्त्वपूर्ण नोंदही आढळली आहे.


किल्ले मानगडावरील पेशवेकालीन संरक्षण व्यवस्थेमधील अधिकारी सरनोबत , सरनाईक, कारखानीस, सबनीस असे असून त्यामध्ये सरदार तुळाजीराव पासलकर, हवालदार निम्हण आणि जनार्दन गोविंद फडणीस यांची नावेसुद्धा कागदपत्रांमधून उजेडात आली आहेत.


गडावर विंझाई, भैरव आणि सबजाई या तीन देवतांची मंदिरे सन १७८४ मध्ये अस्तित्वात असल्याचेही या मोडीलिपीतील कागदपत्रांमधून उलगडले आहे. छत्रपती शिवरायांनी बांधलेल्या १११ किल्ल्यांच्या यादीत मानगडाचा उल्लेख असून नव्याने उजेडात आलेल्या या पेशवेकालीन कागदपत्रांचे महत्व इतिहास अभ्यासकांसाठी पर्वणीच आहे असे मत मानगड अभ्यासक रामजी कदम यांनी व्यक्त केले. टेहळणीसाठीचा गड म्हणून मानगडाचे विशेष महत्त्व आहे.

Comments
Add Comment

नवी मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन या दिवशी होणार पहिले उड्डाण ?

पनेवल : पंतप्रधान नरेंद्र मोदी ३० सप्टेंबर २०२५ रोजी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन करतील. यानंतर

पाली नगराध्यक्षपदी भाजपचे पराग मेहता

विजयाने पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा जल्लोष गौसखान पठाण सुधागड-पाली : अष्टविनायक तीर्थक्षेत्र असलेल्या पाली

रस्त्यावर खड्डेच खड्डे, मग पोलिसांनी असं काही केलं की...

रायगड : सणासुदीच्या पार्श्वभूमीवर पनवेलजवळील पळस्पे फाटा परिसरात होणाऱ्या वाहतूक कोंडीवर प्रभावी उपाय करत

कोकणवासीयांच्या परतीच्या प्रवासासाठी एसटी फेऱ्या बंद

खेडोपाड्यातील प्रवाशांचे प्रचंड हाल महाड : गणेशोत्सव संपताच कोकणवासीयांचा परतीचा प्रवास सुरू झाला असून,

मध्यरात्री CNG दरवाढीनंतर पंप अर्धा तास बंद, मुंबई-गोवा महामार्गावर वाहतुकीचा खोळंबा

रायगड : मध्यरात्री अचानक सीएनजी दरवाढीचा फटका बसल्याने रायगड जिल्ह्यासह मुंबई–गोवा महामार्गावरील विविध सीएनजी

पनवेलहून मुंबईकडे जाणाऱ्या जड-अवजड वाहनांना नवी मुंबईत प्रवेश बंदी

पनवेल (वार्ताहर):मनोज जरांगे पाटील यांनी मुंबई येथे पुकारलेल्या आंदोलनामुळे मुंबईकडे जाणारे सगळेच महामार्ग