आई एकविरा मंदिरात भाविकांना सात जुलैपासून ड्रेस कोड, तोकडे कपडे घालून आल्यास मंदिरात प्रवेश नाही

पिंपरी-चिंचवड : कोळी बांधवांची आराध्य दैवत असलेल्या आई एकविरा मंदिरात भाविकांना ड्रेस कोड बंधनकारक करण्यात आला आहे.  त्यासंदर्भात आई एकवीरा देवीच्या संस्थानकडून पत्रक काढण्यात आले असून त्याची अंमलबजावणी भाविकांना ७ जुलै पासून करावी असे आवाहन करण्यात आले. स्थानिक दुकानदारांना आणि भाविकांना हा नियम लागू असणार आहे. मंदिराचं पावित्र राखण्यासाठी संस्थाकडून निर्णय घेण्यात आला आहे. तसेच तोडके आणि अंग प्रदर्शन करणारे कपडे घालून आल्यास भाविकांना प्रवेश नाकारण्यात येईल अशी माहिती संस्थांकडून देण्यात आली.


तसेच परिपत्रकात उल्लेख केल्याप्रमाणे महिला, तरुणी, पुरुष, युवक यांनी कपडे परिधान करावेत. महिलांना मंदिरात प्रवेश करायचा असल्यास त्यांनी साडी, सलवार, कुर्ता, किंवा इतर भारतीय कपडे प्रधान करावेत. महिला आणि तरुणींनी पूर्ण अंग झाकलेले असावेत. तरुण युवक वर्ग आणि पुरुष यांच्यासाठी धोतर, पायजमा, कुर्ता, पॅन्ट, टी-शर्ट, शर्ट, किंवा इतर भारतीय कपडे परिधान केलेले असावेत. असा उल्लेख पत्रकात करण्यात आला आहे.


तरुण आणि तरुणींनी शॉर्टस, शॉर्ट स्कर्ट, वेस्टन कपडे, मिनी स्कर्ट, फाटलेली जीन्स, हाफ पॅन्ट किंवा अंग प्रदर्शन करणारे कपडे घालू नयेत. अशी कपडे कुणी परिधान करून आढळल्यास त्या भक्ताला मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही. ड्रेस कोड हा बंधनकारक आहे. अशी माहिती आई एकविरा देवीच्या संस्थानकडून देण्यात आली. त्यामुळे परिपत्रकानुसार भाविकांनी नियम पाळावेत असे आवाहन देखील संस्थांकडून करण्यात आले आहे.


Comments
Add Comment

Nanded Mumbai Flight : प्रतीक्षा संपली! नांदेड-मुंबई, गोवा विमानसेवेचा 'मुहूर्त' ठरला, मुंबई, गोव्याचा प्रवास तासाभरात; पहिलं उड्डाण कधी?

नांदेड : नांदेडमधील प्रवाशांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. बहुप्रतीक्षित नांदेड-मुंबई (Nanded-Mumbai) आणि नांदेड-गोवा

राज्यातील 'या' पाच समुद्रकिनाऱ्यांना मिळणार 'ब्लू फ्लॅग'? नामांकनासाठी किनाऱ्यांचे सुरक्षा ऑडीट होणार लवकरच पूर्ण

महाराष्ट्र: राज्यातील पाच समुद्रकिनाऱ्यांची आंतरराष्ट्रीय स्तरावरील 'ब्ल्यू फ्लॅग'साठी प्रायोगिक तत्त्वावर

कल्याण-डोंबिवलीला फटाक्यांच्या आतषबाजीमुळे प्रदूषणाचा विळखा

केडीएमसीतील नागरिक श्वसनाच्या आजाराने त्रस्त कल्याण (प्रतिनिधी) : नुकताच दिवाळी सण सर्वत्र मोठ्या उत्साहात

परतीच्या पावसाने भातपिके उद्ध्वस्त, बळीराजा आर्थिक अडचणीत

रायगड : रायगड जिल्ह्यात गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान केले

मुदखेडमध्ये संतप्त शेतकऱ्याचा तहसीलदारांच्या गाडीवर हल्ला: पोलिसांनी घेतले ताब्यात

नांदेड : नांदेड जिल्ह्यातील मुदखेड येथे एका संतप्त शेतकऱ्याने तहसीलदारांच्या वाहनाची काच फोडल्याची घटना घडली,

नेरळ–माथेरान मिनी ट्रेन’ पुन्हा रुळावर!

पर्यटकांसाठी ऐतिहासिक रेल्वे सेवा १ नोव्हेंबरपासून रायगड : महाराष्ट्रातील प्रसिद्ध