आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतक्त्यात हा संघ अव्वलस्थानी

  63

दुबई : आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५ - २७ च्या गुणतक्त्यात ऑस्ट्रेलिया पहिल्या आणि इंग्लंड दुसऱ्या स्थानी आहे. बांगलादेश तिसऱ्या आणि श्रीलंका चौथ्या स्थानी आहे. भारत पाचव्या आणि वेस्ट इंडिज सहाव्या स्थानावर आहे. न्यूझीलंड, पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका नव्या हंगामात अद्याप एकही कसोटी सामना खेळलेले नाहीत.

ऑस्ट्रेलिया वेस्ट इंडिज विरुद्धची पहिली कसोटी १५९ धावांनी जिंकली. इंग्लंड भारताविरुद्धची पहिली कसोटी पाच गडी राखून जिंकला. या विजयांमुळे ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड प्रत्येकी एक कसोटी सामना खेळल्यानंतर आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५ - २७ च्या गुणतक्त्यात अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर आहेत. मोठ्या विजयामुळे ऑस्ट्रेलिया पहिल्या आणि मोठ्या पराभवामुळे वेस्ट इंडिज सहाव्या स्थानी आहे.

बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यात दोन कसोटी सामने झाले. यातील एक अनिर्णित राहिला तर दुसरा कसोटी सामना श्रीलंकेने ७८ धावांनी जिंकला. पण अनिर्णित सामन्यात बांगलादेशने पहिल्या डावात सर्वबाद ४९५ धावा आणि दुसऱ्या डावात सहा बाद २८५ धावा केल्या. तर श्रीलंकेने पहिल्या डावात सर्वबाद ४८५ आणि दुसऱ्या डावात चार बाद ७२ धावा केल्या होत्या. नंतर दुसऱ्या कसोटीत श्रीलंकेने पहिल्या डावात सर्वबाद ४५८ धावा केल्या. बांगलादेशने पहिल्या डावात सर्वबाद २४७ आणि दुसऱ्या डावात सर्वबाद १३३ धावा केल्या होत्या. अनिर्णित कसोटीतील कामगिरीमुळे बांगलादेश गुणतक्त्यात तिसऱ्या स्थानी आणि श्रीलंका चौथ्या स्थानी आहे.
Comments
Add Comment

यशस्वी जायसवालने शतक ठोकत रवी शास्त्रींना टाकले मागे, टीम इंडियानेही रचला खास विक्रम!

लंडन: इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यात युवा सलामीवीर यशस्वी जायसवालने पुन्हा एकदा आपल्या फलंदाजीची

India vs England 5th Test: ओव्हल कसोटीत भारताने इंग्लंडला दिले ३७४ धावांचे लक्ष्य, सुंदरची 'सुंदर' खेळी

India vs England 5th Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी २०२५ चा शेवटचा कसोटी सामना लंडनमधील ओव्हल क्रिकेट

"आम्ही पुन्हा प्रयत्न करत आहोत" सायना नेहवाल आणि पी. कश्यपच्या नात्यात यु टर्न

नवी दिल्ली: बॅडमिंटनपटू सायना नेहवाल (Saina Nehwal) आणि पारुपल्ली कश्यप (Parupalli Kashyap) या दोघांच्या नात्यात पुन्हा एकदा गोडवा

जसप्रीत बुमराहच्या आशिया कप खेळण्यावर प्रश्नचिन्ह

नवी दिल्ली:  आशिया कप २०२५ पुढील महिन्यात खेळवला जाणार आहे आणि चाहते या स्पर्धेबद्दल खूप उत्सुक आहेत. पण

ग्रॅन्डमास्टर दिव्या देशमुखला शासनाकडून ३ कोटींचे बक्षीस, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते सत्कार

नागपूर: महाराष्ट्राच्या दिव्या देशमुखने फिडे महिला बुद्धीबळ विश्वचषकात विजेतेपद पटकावल्यामुळे, महाराष्ट्र

नाईट वॉचमन आकाशदीपने इंग्लंडची झोप उडवली

लंडन : भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील अखेरचा सामना केनिंग्टन ओव्हल