अमरावतीत भर रस्त्यात पोलिस अधिकाऱ्याची हत्या

पहिलं कारने उडवलं, नंतर सपासप वार करून हल्लेखोर पसार


अमरावती: अमरावतीमध्ये सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाची हत्या करण्यात आली आहे. एका चारचाकी कारने दुचाकीस्वार पोलीस अधिकाऱ्याला उडवले. त्यानंतर त्यांच्या पोटावर, छातीवर धारदार शस्त्राने वार करून हल्लेखोर पसार झाले. मात्र काही तासांतच पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली. अब्दुल कलाम अब्दुल कादर असं हत्या करण्यात आलेल्या अधिकाऱ्याचं नाव आहे.

अमरावती पोलीस आयुक्तालय अंतर्गत वलगाव पोलीस स्टेशनला सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अब्दुल कलाम अब्दुल कादर कार्यरत होते. हल्ल्यानंतर त्यांना नजीकच्या बेस्ट हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या हत्येमागचे नेमकं कारण अद्याप समोर आलं नाही. एका पोलिस अधिकाऱ्याचीच अशा पद्धतीने हत्या करण्यात आल्यामुळे सर्वसामान्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

अमरावती पोलीस आयुक्त घटनास्थळी दाखल 


पोलिस अधिकाऱ्यावर झालेल्या हल्ल्याचे वृत्त समजताच घटनास्थळी अमरावती पोलीस आयुक्त अरविंद चावरिया दाखल झाले आहेत. पाच ते सहा हल्लेखोर यामध्ये असल्याची माहिती असून ते फरार झाले आहेत. फरार हल्लेखोरांना शोधण्यासाठी पोलिसांनी लगोलग दोन पथके रवाना केली असून, काही तासांतच पोलिसांनी दोन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.

दोन आरोपींना अटक


हत्या प्रकरणात दोन आरोपींना अटक करण्यात आली असून गाडगे नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. २० जून रोजी अब्दुल कलाम यांच्या भावाचा  काही लोकांशी पैशावरून वाद झाला होता, त्यावेळी अब्दुल कलाम हे मध्यस्थी करायला गेले होते. त्याचा राग धरून ही हत्या झाल्याची माहिती आहे.

 
Comments
Add Comment

मुंबईत महायुती म्हणूनच लढणार आणि सत्तेवर येणार!

देवरूख  : आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत महायुती होणार असे देशाचे गृहमंत्री अमित शहा व मुख्यमंत्री

मुंबईत अर्धवट राहिलेल्या ४२५ रस्त्यांच्या कामांना सुरुवात, १५० कामे अद्याप थांबलेलीच

मुंंबई (सचिन धानजी): मुंबई महापालिकेच्यावतीने हाती घेण्यात आलेल्या सिमेंट काँक्रिटच्या अर्धवट कामांना आता

Rain Update : 'मोंथा' चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात पुन्हा पाऊस, हवामान खात्याचा अलर्ट

मुंबई: भारतीय हवामान विभागाने दिलेल्या ताज्या माहितीनुसार, 'मोंथा' (Montha)

फॅमिली पेन्शनसाठी केंद्र सरकारकडून नवीन नियम जारी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था): सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारकाच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबाला मिळणाऱ्या

‘आंदोलन कायम ठेऊन मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार’- बच्चू कडू

मुंबईला जाऊन मुख्यमंत्री फडणवीसांशी चर्चा करणार नागपूर : कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी बच्चू कडू यांच्या

जागतिक तणावाच्या काळात भारत जगासाठी दीपस्तंभाची भूमिका बजावेल!

मुंबईत पंतप्रधान मोदींचे जागतिक सीईओ फोरममध्ये प्रतिपादन मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (बुधवारी)