मुंबई-गोवा महामार्ग: १८ वर्षांची प्रतीक्षा, खड्डेमय प्रवास अन् अपघातांचा धोका कायम!

मुंबई : मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेली १८ वर्षांपासून रखडलेले असतानाच, या पावसाळ्यातही प्रवाशांचे हाल कायम राहणार असल्याचे चित्र आहे. वडखळ-पेण मार्गावरील उड्डाणपुलांवर पाणी साचण्याबरोबरच त्यांना तडे गेल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.


गेल्या अठरा वर्षांपासून रखडलेल्या या महामार्गावर अनेक ठिकाणी रस्त्याला आणि उड्डाणपुलांना तडे गेले आहेत. पोलादपूरजवळील चांढवे, महाडजवळील नांगलवाडी, विसावा हॉटेल, नातेखिंड, वहूर, वीर रेल्वे स्टेशन, लोणारे खांब, पेण आदी ठिकाणच्या उड्डाणपुलांवर सध्या मोठे खड्डे पडले आहेत. विशेष म्हणजे, वडखळ येथून अलिबागकडे येणाऱ्या सेवारस्त्यावरही मोठ्या प्रमाणावर खड्डे आहेत.


पेणपासून सुरू होणाऱ्या उड्डाणपुलांवर पावसाच्या पाण्याचा निचरा होण्याची योग्य व्यवस्था नसल्याने आणि सदोष आखणीमुळे थोड्या पावसातही पाणी साचते. यामुळे वाहनचालकांना रस्त्याचा अंदाज येत नाही आणि खड्डे चुकवताना रात्रीच्या वेळी अपघातांचे प्रमाण वाढले आहे. कोट्यवधी रुपये खर्चूनही महामार्गाची ही दुरवस्था कायम असल्याने, या खर्चावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत असून, प्रशासनाने यावर तात्काळ लक्ष देण्याची मागणी जोर धरत आहे.

Comments
Add Comment

जयंत पाटील, तटकरे आणि प्रफुल्ल पटेल मुख्यमंत्र्यांच्या भेटीला वर्षावर

मुंबई : राज्याच्या राजकीय वर्तुळातून एक अनपेक्षित बातमी समोर आली असून, शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील हे

'होय मीच माझ्या पत्नीचा खून केलाय'....; सायको पती मृतदेहासोबत थेट पोलीस ठाण्यात

समृध्दी महामार्गावर पत्नीची हत्या करून आरोपी पती पोहचला थेट पोलीस ठाण्यात वाशिम : समृद्धी महामार्गावर ( Samruddhi Mahamarg)

Dashavatar : दशावतार कलाकार सर्वेक्षणासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात विशेष नोंदणी मोहीम

- जिल्ह्यातील आठही तालुक्यांमध्ये पंचायत समिती आणि तहसील कार्यालयात विशेष कक्ष मुंबई : महाराष्ट्राच्या समृद्ध

Sunetra Pawar : सुनेत्रा पवार यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड घटनेनुसारच!

- प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे; सच्चिदानंद सिंह यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करणार मुंबई : राष्ट्रवादी

Farmer Loan Waiver : ऐतिहासिक कर्जमाफीबद्दल 15 जुलैला मुख्यमंत्री फडणवीसांचा शेतकऱ्यांकडून जाहीर सत्कार

मुंबई : राज्यातील 56 लाख शेतकऱ्यांना लाभ देणारी 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना' लागू

Vadhvan Port News : पॅरिसच्या धर्तीवर वाढवण बंदराजवळ उभारणार आंतरराष्ट्रीय कृषी बाजार

- मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय; राज्यातील शेतमाल निर्यातीला मोठी चालना मिळणार मुंबई : पालघर जिल्ह्यात विकसित होत