महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या जनगणनेनुसार लोकसंख्याच्या दृष्टीने अनुसूचित जाती, जमाती, आणि ओबीसींचे आरक्षण जाहीर करण्यात आले असून त्यात महिलांना सरपंच पदासाठी नेतृत्व करण्याची संधी मिळणार आहे. येत्या चार महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थाचे निवडणूक होण्याची चर्चा आहे. जिल्हा परिषद, नगरपंचायत, आणि परिषदांच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता असल्याने जिल्ह्यात ग्रामीण भागातील ७५५ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण जाहीर करण्यात आले. त्यामुळे राजकीय रणधुमाळीला वेग येणार आहे.  ग्रामीण भागातील सरपंच पदासाठी अनुसूचित जातीतील १२७ सरपंच पद आरक्षित आहे.


त्यात महिलांसाठी ३८९ सरपंचपदासाठी जागा आहेत. व अनुसूचित जमातीसाठी ९९ सरपंच पदे आरक्षित असून यात  ५१ महिलांचा समावेश असणार आहे. ओबीसी प्रवर्गातील २०४ सरपंच असून यात १०६ महिलांचा समावेश आहे. ३२५ सरपंच पद हे खुल्या प्रवर्गासाठी असून यात १६५ पदे हे महिलांसाठी राखीव आहे.या आरक्षण प्रक्रियेमुळे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्ग, सर्वसाधारण व विशेषतः महिलांना नेतृत्वाची संधी मिळेल. महिलांसाठी एकूण सरपंच पदांपैकी किमान ५० टक्के आरक्षण लागू करण्यात आले आहे.


२०२५ - २०३० वर्षांकरीता हे आरक्षण असणार आहे. यात ५० टक्के महिला सरपंचांच्या आरक्षणाचाही समावेश आहे. ग्रामविकास व जलसंधारण विभाग आणि महाराष्ट्र शासन यांच्या अधिसूचनेनुसार ग्रामपंचायतींतील सरपंच पदांचे तालुकानिहाय व प्रवर्गनिहाय आरक्षण निश्चित करण्यात आले आहे. हा निर्णय मुंबई ग्रामपंचायत (सरपंच, उपसरपंच निवडणूक) नियम, १९६४ मधील नियम ३(अ), ३(ब) आणि ४ अनुसार घेण्यात आला आहे. यानुसार, जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांनी अधिसूचना जारी केली आहे.


Comments
Add Comment

Padma Awards 2026: पद्म पुरस्कारांनी गौरवला महाराष्ट्र; विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववानांचा सन्मान

महाराष्ट्रातील मान्यवरांचा राष्ट्रीय स्तरावर गौरव; पद्म पुरस्कार प्रदान नवी दिल्ली, दि. २४ : देशातील सर्वोच्च

Ashadhi Wari : आषाढी वारीत भाविकांच्या सुविधांना प्राधान्य; कोणतीही गैरसोय होऊ देणार नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

• वारकऱ्यांच्या सेवेसाठी शासन सज्ज • आषाढी वारीसाठी सर्व विभागांकडून सुविधांची व्यापक तयारी • डिस्कव्हरी व

Child mortality : बालमृत्यू रोखण्यासाठी महाराष्ट्राचा 'मास्टर प्लॅन'; आरोग्य, आदिवासी आणि महिला-बालविकास विभाग एकत्र येणार!

आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची विधान परिषदेत घोषणा मुंबई : महाराष्ट्रातील बालमृत्यूचे प्रमाण आणखी कमी

Agriculture Minister Dattatray Bharne : पेरणीची घाई करू नका!

 कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांचे आवाहन; खरीप पूर्वतयारीसाठी प्रत्येक ग्रामपंचायतीत सुविधा केंद्र

Wedding Invitations : बालविवाहाच्या कुप्रथेला आळा घालण्यासाठी सरकारची मोठी पावले: लग्नपत्रिकेवर जन्मतारीख छापणे होणार अनिवार्य

मुंबई : राज्यातील बालविवाहाची (Child Marriage) प्रथा पूर्णपणे बंद करण्यासाठी आणि अल्पवयीन मुलींचे लग्न लावून देणाऱ्या

Vilas Ghule Murder Case: विलास घुले खून प्रकरणात पोलिसांची धडक कारवाई, सर्व ९ आरोपी ताब्यात

बीड : बीड (Beed) जिल्ह्यातील केज (Kej) तालुक्यातील टाकळी फाटा येथील हॉटेल चालक विलास घुले यांच्या हत्या (Murder) प्रकरणात