महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या जनगणनेनुसार लोकसंख्याच्या दृष्टीने अनुसूचित जाती, जमाती, आणि ओबीसींचे आरक्षण जाहीर करण्यात आले असून त्यात महिलांना सरपंच पदासाठी नेतृत्व करण्याची संधी मिळणार आहे. येत्या चार महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थाचे निवडणूक होण्याची चर्चा आहे. जिल्हा परिषद, नगरपंचायत, आणि परिषदांच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता असल्याने जिल्ह्यात ग्रामीण भागातील ७५५ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण जाहीर करण्यात आले. त्यामुळे राजकीय रणधुमाळीला वेग येणार आहे.  ग्रामीण भागातील सरपंच पदासाठी अनुसूचित जातीतील १२७ सरपंच पद आरक्षित आहे.


त्यात महिलांसाठी ३८९ सरपंचपदासाठी जागा आहेत. व अनुसूचित जमातीसाठी ९९ सरपंच पदे आरक्षित असून यात  ५१ महिलांचा समावेश असणार आहे. ओबीसी प्रवर्गातील २०४ सरपंच असून यात १०६ महिलांचा समावेश आहे. ३२५ सरपंच पद हे खुल्या प्रवर्गासाठी असून यात १६५ पदे हे महिलांसाठी राखीव आहे.या आरक्षण प्रक्रियेमुळे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्ग, सर्वसाधारण व विशेषतः महिलांना नेतृत्वाची संधी मिळेल. महिलांसाठी एकूण सरपंच पदांपैकी किमान ५० टक्के आरक्षण लागू करण्यात आले आहे.


२०२५ - २०३० वर्षांकरीता हे आरक्षण असणार आहे. यात ५० टक्के महिला सरपंचांच्या आरक्षणाचाही समावेश आहे. ग्रामविकास व जलसंधारण विभाग आणि महाराष्ट्र शासन यांच्या अधिसूचनेनुसार ग्रामपंचायतींतील सरपंच पदांचे तालुकानिहाय व प्रवर्गनिहाय आरक्षण निश्चित करण्यात आले आहे. हा निर्णय मुंबई ग्रामपंचायत (सरपंच, उपसरपंच निवडणूक) नियम, १९६४ मधील नियम ३(अ), ३(ब) आणि ४ अनुसार घेण्यात आला आहे. यानुसार, जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांनी अधिसूचना जारी केली आहे.


Comments
Add Comment

Pune Accidental News : पुण्यात धक्कादायक घटना; खेळताना घसरगुंडी अंगावर पडली अन् चिमुकलीचा....

पुणे : बागेतली घसरगुंडी नेहमीच मुलांची आवडती असते, पण याच घसरगुंडीचा खेळ कोणाच्या जीवावर बेतला तर? पुण्यात एक

मोठी बातमी ! आम आदमी पक्ष फुटला, राघव चढ्ढा यांच्यासह 'या' सात खासदारांनी केजरीवालांची साथ सोडली

देशाच्या राजकारणात मोठा भूकंप झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून आम आदमी पक्षामध्ये खलबतं पहायला मिळत होती.

Accident News : भंडाऱ्यात कुटुंबावर शोककळा; लग्नावरून परताना काळाची झडप

भंडारा : लग्नाचे मुहूर्त चालू आहेत, त्यामुळे लोक आपल्या नातेवाईकांच्या लग्नाला जात असतात. असेच एक लग्न आटोपून

काळं सोनं संकटात ! होर्मुझमुळे इराण पहिल्यांदाच बॅकफूटला, नेमकं काय घडलं ?

अमेरिका, इस्रायलनं २८ फेब्रुवारीपासून इराणवर हल्ले सुरु केले. आणि जगाची डोकेदुखी वाढली. या हल्ल्यामध्ये जगाला

Everyone Sorry… मोबाईल स्टेट्सवर अखेरचा मेसेज अन् त्यानंतर जे घडलं त्याने काळजाचा थरकापच उडाला

पुणे : Everyone Sorry असं स्टेट्स ठेवलं आणि पुण्यातील २७ वर्षीय तरुण अचानक गायब झाला. कुटुंबीयांची तरुणाला शोधण्यासाठी

Ambenali Ghat : आंबेनळी घाटात भीषण दुर्घटना; ७०० फूट दरीत कोसळून दांपत्याचा मृत्यू, बचावकार्याला पावसाचा अडथळा

सातारा : महाबळेश्वर तालुक्यातील कुंभरोशी गावाजवळ, पोलादपूर हद्दीतील आंबेनळी घाटात घडलेल्या भीषण अपघातात