Woman Kirtankar Murder: महिला कीर्तनकारची आश्रमात दगडाने ठेचून हत्या, संभाजीनगर हादरले

  97

संभाजीनगर: वैजापुरातील एका आश्रमात महिला कीर्तनकाराची अज्ञात मारेकऱ्याने दगडाने ठेचून निर्घृण हत्या (Woman Kirtankar Murder) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हत्येमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली असून, पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली आहेत.


ह. भ. प. संगीताताई महाराज (Sangitatai Maharaj) असं हत्या झालेल्या कीर्तनकार महिलेचं नाव आहे. त्या वैजापूर इथं एका आश्रमात राहत होत्या. २७ जून रोजी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञाताने आश्रमात घुसून त्यांची हत्या केली. आरोपीनं अमानुषपणे त्यांच्या डोक्यावर दगडाने अनेक प्रहार केले. हे वार इतके गंभीर होते की, या हल्ल्यात संगिताताई रक्ताच्या थारोळ्यात पडल्या आणि यातच त्यांचा मृत्यू झाला.


या घटनेची माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी दाखल झालं. घटनास्थळी पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला आहे. फॉरेन्सिक पथक आणि श्वान पथक देखील घटनास्थळी दाखल झाले असून, ठोस पुरावे गोळा करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.


महिला कीर्तनकाराची दगडाने ठेचून हत्या होणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. या घटनेमुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. आता या प्रकरणात नेमके काय खुलासे होणार? हे पाहणे महात्त्वाचे ठरणार आहे.

Comments
Add Comment

पुण्यात कोयता गँगचा धुमाकूळ, वाहनांची तोडफोड; तिघांना अटक

पुणे: शहरात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत असताना, आता पुण्यात पुन्हा एकदा कोयता गँगचा धुमाकूळ पाहायला

IND vs ENG: आम्ही कधीच हार मानणार नाही', हेड कोच गौतम गंभीरची विजयानंतर पहिली प्रतिक्रिया

मुंबई: इंग्लंडविरुद्धच्या ओव्हल कसोटीत टीम इंडियाने ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर (Gautam

कामानिमित्त मंत्रालयात येत असाल तर हे आधी वाचा...

ऑफलाइन पास देणाऱ्या खिडक्या स्वातंत्र्यदिनापासून बंद मंत्रालय प्रवेशासाठी सर्वसामान्यांना आता ' डीजी' नोंदणी

DSP सिराजला पोलीस विभागाने केला या खास अंदाजात सलाम, मोठ्या कामगिरीसाठी दिल्या शुभेच्छा

मुंबई: मोहम्मद सिराजला DSP सिराज यासाठी म्हटले जाते कारण तेलंगणा पोलीसमध्ये तो डीएसपी पदावर आहे. या मोहम्मद

Health: रिकाम्या पोटी ओव्याचे पाणी पिण्याचे आरोग्यदायी फायदे

मुंबई: ओवा हा भारतीय स्वयंपाकघरात वापरला जाणारा एक सामान्य मसाला आहे, पण त्याचे आरोग्यदायी फायदे खूप मोठे आहेत.

वादग्रस्त विधाने करू नयेत, सर्वांनी समन्वयाने काम करावे - आमदार दीपक केसरकर

सिंधुदुर्ग - महायुतीची सध्याची राजकीय परिस्थिती चांगली असून, कार्यकर्त्यांनी कोणत्याही प्रकारची वादग्रस्त