Saturday, June 28, 2025

श्री दत्तात्रेयाच्या गिरनार पर्वतावर धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न

श्री दत्तात्रेयाच्या गिरनार पर्वतावर धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न

येत्या २ जुलै रोजी स्थानिक प्रशासन घेणार योग्य खबरदारी


जुनागढ : गुजरातमधील जुनागड येथे असलेल्या गिरनार पर्वताच्या पाचव्या भागात श्री दत्तात्रेय भगवान यांचे तपश्चर्या स्थान आहे. प्रत्येक दत्त भक्ताच्या मनातील श्रद्धास्थान असलेल्या या जागेवर गेल्या काही वर्षापासून दिगंबर जैन आपला हक्क सांगण्याचा प्रयत्न केला आहेत. परंतु, गुजरात न्यायालयाने यासंदर्भातील याचिकेवरील सुनावणीत शांततेच्या मार्गाने फक्त दर्शन घेण्याचे निर्देश दिलेले असतानाही, दिगंबर जैन पंथाकडून दर्शनाच्या नावाखाली शक्तीप्रदर्शन करण्याचा प्रयत्न सुरू आहे. येत्या २ जुलै २०२५ रोजी जैन मंडळीकडून शक्ती प्रदर्शन झाल्यास धार्मिक तेढ निर्माण होऊ शकतो. याबाबत स्थानिक प्रशासनाने योग्य खबरदारी घेतली आहे. दुसऱ्या बाजुला प्रत्येक दत्त भक्ताने येऊन दर्शन घ्यावे. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यास मदत करावी, असे आवाहन श्रीगुरु दत्तात्रेय गिरनार चॅरिटेबल ट्रस्टचे कैलास पुरोहित यांनी केले आहे.


Girnar

गिरनार हे दत्तस्थान असून दत्त भगवान यांनी येथे १२ हजार वर्षे ध्यान केले होते आणि तेथून ते निराकार झाले. दत्तांनी गिरनार येथे त्यांच्या पाऊलखुणा सोडल्या. ज्यांची पूजा गुरु- शिष्य परंपरेनुसार अखंड चालू आहे आणि पुढे देखील चालू राहील. दर पौर्णिमेला दत्तभक्त महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून गिरनार वारीला येतात. हिंदुधर्मियांच्या भावनांना ठेच पोहचविण्याचे काम काही जैन मंडळीकडून केले जात असल्याने महाराष्ट्र आणि संपूर्ण देशातील दत्तभक्त दुःखी झाले आहेत. त्यामुळे काही दत्त भक्तांनी स्वयंस्फुर्तीने मोठ्या संख्येने या हिंसक घटनेचा निषेध केला आहे. गिरनार पर्वताचे पावित्र्य राखत शांतता पद्धतीने दर्शन व्हावे, प्रशासनाला पूर्ण सहकार्य करत, कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये याची हजारोंच्या संख्येने गिरनार पर्वतावर उपस्थित राहणार असल्याचे समजते.



दरम्यान, दिगंबर जैन पंथाने असा दावा केला आहे की, येथील पाचवा भाग त्यांच्या श्री नेमिनाथ जींचा आहे. आणि दरवर्षी ते नेमिनाथ जींच्या निर्वाण दिवशी लाडू अर्पण करण्यासाठी तेथे येतात. या वर्षी २ जुलै २०२५ रोजी ते गिरनारला येणार आहेत आणि त्यांच्या एका मुनीने व्हिडिओमध्ये असे आवाहन केले आहे की, जैन लोकांनी मोठ्या संख्येने तेथे पोहोचावे आणि त्यांनी त्या व्हिडिओमध्ये काही हिंसक गोष्टी देखील सांगितल्या आहेत. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था तेढा निर्माण होउ नये यासाठी प्रशासनाकडून मोठया प्रमाणावर खबरदारी घेण्यात आली आहे.

Comments
Add Comment