BMC : प्रतिष्ठित इमारतींना सौंदर्य बहाल करणार, इमारतीचा ५० टक्के भाग खुला, मनपाचे नवीन धोरण

मुंबई :  महानगरपालिका शहराच्या विकासासाठी नवीन धोरण तयार करण्याच्या उद्देशाने पाऊल उचलणार असून शहरातील प्रतिष्ठित इमारतींना सौंदर्य बहाल करणार आहे. शहराच्या विकासाला आकार देणे हा त्यामागचा उद्देश आहे.  इमारतींच्या विकासाठी नागरिकांकडून सुचना आणि हरकती मागवण्यात आले आहेत. २०३४ पर्यंत शहाराच्या विकासाला नवीन आकार देण्यासाठी आत्याधुनिक सुविधांचा देखील वापर करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.


नवीन धोरणानुसार इमारतीचा पुनर्बांधणीचा विचार करुनच सौंदर्य बहाल करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे त्यात महापालिका आयुक्त आणि वस्तुकला, दृश्य कला आणि संबंधिक क्षेत्रातील सहा सदस्यांचा समावेश असणार आहे.तसेच समावेश असलेल्या व्यक्तींचे छाननी पुनरावलोकन करण्यात येणार आहे. तसेच महानगरपालिकेच्या नवीन धोरणानुसार प्रतिष्ठित इमारतीचा ५० टक्के भाग खुला राहिला पाहिजे. असे नवीन धोरणात नमूद करण्यात येणार आहे.


दरम्यान, या नवीन धोरणामध्ये निवासी इमारतींना सामान्यतः या श्रेणीतून वगळण्यात येणार आहे. यात केवळ अद्वितीय वास्तुकलेवर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. या धोरणाचा उद्देश मुंबईच्या विविध स्थापत्य वारशाचे प्रतिबिंबित करणाऱ्या रचनांना प्रोत्साहन देणे हा आहे. ज्यामध्ये व्हिक्टोरियन गॉथिक, आर्ट डेको आणि इंडो-सारसेनिक शैलींचा समावेश आहे. त्यामुळे महापालिकेच्या नवीन  धोरणाला जनतेचा कसा प्रतिसाद मिळतो ते पाहणं महत्वाचं असणार आहे.






Comments
Add Comment

राष्ट्रीय महामार्ग ६१ च्या चौपदरीकरणामुळे वाशी APMC ला फायदा होणार, मुंबईकरांना दूध भाजीपाला आणखी ताजा मिळणार

मुंबई : दररोज मुंबईला प्रामुख्याने कल्याण-मुरबाड-अहिल्यानगर या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६१ वरुन दूध आणि

मुंबई मेट्रो वनचे तिकीट उबर ॲपवरही उपलब्ध

तिकीट खरेदीचा लागणारा वेळ होणार कमी मुंबई : आता घाटकोपर - अंधेरी - वर्सोवा या मेट्रो-१ मार्गिकेवर प्रवास अधिक

वडाळ्यात उबाठासाठी कठिण परिस्थती; ठाकरे बंधूंची युती झाल्यास मनसेला जागा कुठे सोडायची हा प्रश्न

मुंबई (सचिन धानजी): दक्षिण मध्य मुंबईतील वडाळा विधानसभा हा कोणे एकेकाळी शिवसेना बालेकिल्ला मानला जात होता, परंतु

गोव्यातील नाईटी क्लबला आग, मुंबई अग्निशमन झाले सतर्क

नववर्षाच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर २२ ते २८ डिसेंबर दरम्यान दलाची ‘विशेष अग्निसुरक्षा मोहीम’ हॉटेल्स्,

कचरा खासगीकरणाची फेरनिविदा की वाटाघाटी? अंदाजित दरापेक्षा ३९ ते ६३ टक्के अधिक दराने लावली कंपन्यांनी बोली

मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबई महापालिकेच्यावतीने कचरा उचलून वाहून नेण्यासाठी वाहन आणि मनुष्यबळ पुरवण्याकरता

महाराष्ट्राला थंडीच्या लाटेचा इशारा

मुंबई : राज्यासह देशातील वातावरणात सातत्याने बदला होताना दिसत आहे. डिसेंबर महिन्याचा पहिला आठवडा गेला असूनही