BMC : प्रतिष्ठित इमारतींना सौंदर्य बहाल करणार, इमारतीचा ५० टक्के भाग खुला, मनपाचे नवीन धोरण

मुंबई :  महानगरपालिका शहराच्या विकासासाठी नवीन धोरण तयार करण्याच्या उद्देशाने पाऊल उचलणार असून शहरातील प्रतिष्ठित इमारतींना सौंदर्य बहाल करणार आहे. शहराच्या विकासाला आकार देणे हा त्यामागचा उद्देश आहे.  इमारतींच्या विकासाठी नागरिकांकडून सुचना आणि हरकती मागवण्यात आले आहेत. २०३४ पर्यंत शहाराच्या विकासाला नवीन आकार देण्यासाठी आत्याधुनिक सुविधांचा देखील वापर करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.


नवीन धोरणानुसार इमारतीचा पुनर्बांधणीचा विचार करुनच सौंदर्य बहाल करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे त्यात महापालिका आयुक्त आणि वस्तुकला, दृश्य कला आणि संबंधिक क्षेत्रातील सहा सदस्यांचा समावेश असणार आहे.तसेच समावेश असलेल्या व्यक्तींचे छाननी पुनरावलोकन करण्यात येणार आहे. तसेच महानगरपालिकेच्या नवीन धोरणानुसार प्रतिष्ठित इमारतीचा ५० टक्के भाग खुला राहिला पाहिजे. असे नवीन धोरणात नमूद करण्यात येणार आहे.


दरम्यान, या नवीन धोरणामध्ये निवासी इमारतींना सामान्यतः या श्रेणीतून वगळण्यात येणार आहे. यात केवळ अद्वितीय वास्तुकलेवर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. या धोरणाचा उद्देश मुंबईच्या विविध स्थापत्य वारशाचे प्रतिबिंबित करणाऱ्या रचनांना प्रोत्साहन देणे हा आहे. ज्यामध्ये व्हिक्टोरियन गॉथिक, आर्ट डेको आणि इंडो-सारसेनिक शैलींचा समावेश आहे. त्यामुळे महापालिकेच्या नवीन  धोरणाला जनतेचा कसा प्रतिसाद मिळतो ते पाहणं महत्वाचं असणार आहे.






Comments
Add Comment

एसटी बसस्थानक स्वच्छतेसाठी दर १५ दिवसांनी विशेष मोहीम — प्रवाशांच्या सुरक्षित, आरोग्यदायी प्रवासासाठी एसटी महामंडळाचा पुढाकार

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सर्व बसस्थानकांवर, बसस्थानक परिसरात तसेच प्रशासकीय

उमेदवारी अर्ज, प्रचार रथ, झेंडे आणि प्रचार साहित्यांची खरेदी आणि उबाठाने कापला पत्ता...

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : वडाळ्यातील माजी नगरसेवक अमेय घोले यांनी उबाठाला राम राम ठोकत शिवसेनेत प्रवेश

भांडुप बेस्ट अपघात प्रकरणी बेस्टतर्फे चौकशी

मृतांना बेस्ट तर्फे २ लाख,र मुख्यमंत्र्यांकडून ५ लाखांची मदत मुंबई : सोमवारी रात्री भांडुप पश्चिम या

आज मध्यरात्री उशिरापर्यंत धावणार 'मेट्रो १'

मुंबईकरांना इच्छितस्थळी जाणे सुकर होणार मुंबई : घाटकोपर,वर्सोवा,अंधेरी मेट्रो-१ मार्गिकेवरील सेवा उद्या

१ ते ३१ जानेवारी दरम्यान राज्यात ‘रस्ता सुरक्षा अभियान’

मुंबई : रस्ते अपघातांमध्ये होणारी जीवितहानी कमी करण्यासाठी आणि नागरिकांमध्ये रस्ता सुरक्षेविषयी जनजागृती

मतदानाच्या दिवशी, १५ जानेवारी रोजी भरपगारी सुट्टी

मुंबई : राज्यातील सर्व सरकारी,निमसरकारी आणि खासगी आस्थापना मधील सर्व कर्मचाऱ्यांना यंदाची संक्रात पावली आहे. १५