कोकण किनारपट्टीला ३.५ ते ४.५ मीटर उंच लाटांचा इशारा

  17

मुंबई : रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह पुणे घाट, सातारा घाट परिसरात पुढील २४ तासासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर कोकण किनारपट्टीला भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्र (आय.एन.सी.ओ.आय.एस.) तर्फे २६ जून २०२५ रोजीचे ५.३० पासून ते २८ जून २०२५ रोजी ११.३० पर्यंत ३.५ ते ४.५ मीटर उंच लाटांचा इशारा देण्यात आला असून लहान होड्यांना समुद्रास न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असे राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने कळविले आहे.


राज्यात मागील २४ तासांमध्ये (२७ जून २०२५ रोजी सकाळपर्यंत) वाशिम जिल्ह्यात ५२.८ मिमी पाऊस झाला आहे. तर बुलढाणा जिल्ह्यात ४४.८, वर्धा जिल्ह्यात ३९.२ मिमी, जळगाव २८.२, आणि रायगड जिल्ह्यात २६.७ मिमी सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे.


राज्यात कालपासून आज २७ जून रोजी सकाळपर्यंत झालेल्या पावसाची सरासरी आकडेवारी पुढीलप्रमाणे (सर्व आकडे मिलिमीटरमध्ये) :- ठाणे १६.४, रायगड २६.७, रत्नागिरी १२.८, सिंधुदुर्ग १३.६, पालघर १९.३, नाशिक ८.२, धुळे १०.५, नंदुरबार २, जळगाव २८.२, अहिल्यानगर १.२, पुणे ८.६, सातारा ४, सांगली १.७, कोल्हापूर ८.९, छत्रपती संभाजीनगर १७.४, जालना १५.२, बीड १.६, लातूर १.२, धाराशिव ०.४, नांदेड ३, परभणी ९.१, हिंगोली १४.८, बुलढाणा ४४.८, अकोला ११.९, वाशिम ५२.८, अमरावती १४.८, यवतमाळ १९.७, वर्धा ३९.२, नागपूर ११.२, गोंदिया ०.२, चंद्रपूर ८.२ आणि गडचिरोली जिल्ह्यात १२.४ मिमी पावसाची नोंद झाली आहे.


रत्नागिरी जिल्ह्यात झाड पडून एक व्यक्ती जखमी झाली आहे. वादळी वाऱ्यामुळे शेड पडून यवतमाळ जिल्ह्यात एका व्यक्तीचा मृत्यू, वर्धा जिल्ह्यात वीज पडून दोन व्यक्ती व एक प्राण्याचा मृत्यू, बुलढाणा जिल्ह्यात पुरात वाहून एक व्यक्ती व दोन प्राण्यांचा मृत्यू आणि मुंबई शहर जिल्ह्यात झाड पडून एक व्यक्ती जखमी झाली आहे.


सातारा जिल्ह्यात निरा नदीत माउलींच्या पादुका शाही स्नानासाठी घेऊन गेले असताना एका बुडणाऱ्या तरुणाला रेस्क्यू टीमद्वारे वाचवण्यात आले. वर्धा जिल्ह्यातील देवळीमधील दिगडोह येथे तीन शाळकरी मुले पुराच्या पाण्यामध्ये अडकली होती त्यांना देवळी नगरपालिका व फायर ब्रिगेड यांनी सुरक्षितपणे वाचवले.


बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील समृद्धी महामार्ग साब्रा-फर्दापूर इंटरचेंजजवळ पाणी साचल्याची परिस्थिती निर्माण झाली. ढगफुटीसारख्या मुसळधार पावसामुळे पुलाखाली पाणी साचले, ज्यामुळे पाणी वाहताना दिसू लागल्याने वाहतूक काही वेळासाठी थांबवण्यात आली होती. तसेच याठिकाणी जवळच्या शेतीचे नुकसान झाले असल्याचे राज्य आपत्कालीनकार्य केंद्राने कळविले आहे.

Comments
Add Comment

Tata Hospital : भारतात टाटा रुग्णालयामध्ये प्रथमच एमआयबीजी पद्धतीचा वापर, न्यूरोब्लास्टोमा रुग्णाचा जीव वाचला...

मुंबई : गेल्या अनेक वर्षांपासून न्यूरोब्लास्टोमा (Neuroblastoma) कर्करोगाच्या रुग्णांमध्ये वाढ होतं आहे. यापूर्वी अनेक

झिशान सिद्दीकी यांच्यावर पाळत ठेवणाऱ्या संशयित व्यक्तींना ताब्यात घेऊन सोडले

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाचे नेते झिशान सिद्दीकी यांच्यावर गेल्या चार दिवसांपासून

MHADA Lottery : आता सर्वसामान्यांना घर खरेदी करता येणार, म्हाडाच्या ६२४८ घरांच्या किमतीत कपात...

मुंबई : MHADA house prices reduced सर्वसामान्यांना हक्काचं घर खरेदी करण्यासाठी म्हाडाकडून अल्पदरात (MHADA Price)  घरांची सोडत काढण्यात

BMC : प्रतिष्ठित इमारतींना सौंदर्य बहाल करणार, इमारतीचा ५० टक्के भाग खुला, मनपाचे नवीन धोरण

मुंबई :  महानगरपालिका शहराच्या विकासासाठी नवीन धोरण तयार करण्याच्या उद्देशाने पाऊल उचलणार असून शहरातील

व्यायाम केल्यानंतर ही चूक कधीही करू नका ...

मुंबई : फिटनेस जपण्यासाठी चालणे, धावणे, जिम करणे या पद्धतीने घाम गाळण्यावर हल्ली अनेकांचा भर असतो. व्यायाम केला की

Pratap Sranaik : "वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पार्किंग व्यवस्थेत बदल करणार" प्रताप सरनाईक यांनी दिले आदेश...

मुंबई : रस्त्यावरील वाहतुकीला शिस्त लावून अनावश्यक वाहतूक कोंडी टाळण्यासाठी महानगरामध्ये  पार्किंग व्यवस्था