कुर्ला ते छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंतचा प्रवास आता  वेगाने होणार...

मुंबई : मुंबईकरांची  वाहतूक कोंडी (TRAFFIC CONGESTION) सोडवण्यासाठी "एमएमआरडीए"ने नवीन प्रकल्प उभारण्याचं काम सुरु केले आहे.  कुर्ला ते विमानतळ (Mumbai Airport) दरम्यानचा प्रवास आता सुसाट होणार आहे.  संबंधित कामासाठी सर्वात लांब केबल आधारित पूलाचे काम पूर्ण झाले आहे. मुंबईतील वाकोल्यातील हा पूल सांताक्रूझ चेंबूर जोडरस्ता प्रकल्पाचा भाग आहे. या पुलामुळे कुर्ला ते छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंतचा प्रवास आता  वेगाने करता येणार आहे. त्यामुळे वाहतुक कोंडीचा प्रश्न सुटणार आहे.





दिवसेंदिवस मुंबईच्या पूर्व पश्चिम कॉरिडॉरवरील वाहनांची गर्दी कमी करण्यासाठी उभारण्यात आलेल्या पुलाचे काम लवकरच पूर्ण होणार आहे.  या पुलाची रुंदी १०.५ ते १७.२ मीटर आहे.आणि तो दुहेरी वाहतुकीसाठी डिझाइन करण्यात आला आहे. वांद्रे - कुर्ला संकुलातील (BKC)  वाहतूक कोंडी टाळण्यासाठी एससीएलआर (SCLR)  प्रकल्प हाती घेण्यात आला होता. या प्रकल्पांतर्गत बीकेसी परिसरात कलिना ते कुर्ला असे दोन उड्डाणपूल आहे. यापूर्वी कलिना येथून विमानतळाच्या दिशेने जाताना पश्चिम द्रुतगती मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत होती. ही वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी वाकोला जंक्शन येथे पुलाची उभारणी केली असून त्याचे काम पूर्ण झाले आहे.


एमएमआरडीने (MMRDA) महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांनी बुधवारी या पुलाला भेट देऊन पाहणी केली. यावेळी मुखर्जी यांनी माध्यमांशी संवाद साधला, एवढचं नाही तर हा पुल पावसाळ्यातच वाहतुकीसाठी खुला होईल अशी माहिती दिली. तसेच हा पूल वाहतुकीची कोंडी सोडवणारा असणार आहे असा विश्वास मुर्खजी यांनी व्यक्त केला. केबल आधारित उभारण्यात आलेल्या पुलाची लांबी साधारणपणे ९० अंशाचे असून त्याची लांबी सुमारे १००० मीटर आहे. तीव्र वळणामुळेच केबलचा वापर करण्यात आला आहे. हेच या पुलाचे खास वैशिष्टय आहे. मीडियाच्या आवाहलानुसार अशा प्रकारचा केबल पुल पहिलाच आहे, या पुलाचे काम लवकरच पूर्ण होणार असून मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणार आहे.



 

 

 

 

 

 

 
Comments
Add Comment

Andheri Tree Fall : मुंबईत आणखी एक दुर्घटना! अंधेरीत फांदी कोसळून पादचारी गंभीर जखमी

मुंबई : मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसादरम्यान झाड कोसळण्याच्या घटनांमध्ये आणखी एक भर पडली आहे. अंधेरी पूर्व

Atul save : दिव्यांग शाळांच्या नूतनीकरणासाठी ६० दिवसांची मुदत; मंत्री अतुल सावे यांची विधान परिषदेत माहिती

मुंबई : दिव्यांग शाळांच्या ऑनलाईन नूतनीकरणाच्या प्रक्रियेला गती देण्यासाठी, पोर्टलवर अर्ज प्राप्त झाल्यानंतर

Chandrashekhar Bawankule : राज्यातील २ लाख आदिवासींना मिळणार 'सातबारा'

- वनपट्टाधारकांसाठी 'नमुना ७ ई आणि १२ ई' लागू; महसूलमंत्र्यांची विधानसभेत ऐतिहासिक घोषणा मुंबई : राज्यातील लाखो

Mumbai Water Supply : मुंबईसाठी दिलासादायक बातमी! विहारनंतर तुळशी तलावही ओसंडून वाहू लागला

मुंबई : मुंबईत सुरू असलेल्या दमदार पावसामुळे शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी महत्त्वाचा असलेला तुळशी तलाव (Tulsi lake)

Bhandup Bus Accident : भरधाव बेस्ट बसचं भांडुपमध्ये नियंत्रण सुटलं; पादचाऱ्यासह अनेक वाहनांना धडक

मुंबई : मुंबईतील भांडुप (Bhandup) परिसरात बेस्ट बसचा विचित्र अपघात (Accident) घडला. भांडुपमधील कोकण नगर (Kokan Nagar) येथील क्रिटिकल

Vasai-Virar Rain Update : वसई-विरारमध्ये पावसाचा कहर! पूर, वीज आणि इंटरनेट बंद; हजारो नागरिकांचे जनजीवन विस्कळीत

पालघर : वसई-विरार (Vasai- Virar) परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. सलग दोन