मुंबई : मुंबईकरांची वाहतूक कोंडी (TRAFFIC CONGESTION) सोडवण्यासाठी "एमएमआरडीए"ने नवीन प्रकल्प उभारण्याचं काम सुरु केले आहे. कुर्ला ते विमानतळ (Mumbai Airport) दरम्यानचा प्रवास आता सुसाट होणार आहे. संबंधित कामासाठी सर्वात लांब केबल आधारित पूलाचे काम पूर्ण झाले आहे. मुंबईतील वाकोल्यातील हा पूल सांताक्रूझ चेंबूर जोडरस्ता प्रकल्पाचा भाग आहे. या पुलामुळे कुर्ला ते छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंतचा प्रवास आता वेगाने करता येणार आहे. त्यामुळे वाहतुक कोंडीचा प्रश्न सुटणार आहे.
दिवसेंदिवस मुंबईच्या पूर्व पश्चिम कॉरिडॉरवरील वाहनांची गर्दी कमी करण्यासाठी उभारण्यात आलेल्या पुलाचे काम लवकरच पूर्ण होणार आहे. या पुलाची रुंदी १०.५ ते १७.२ मीटर आहे.आणि तो दुहेरी वाहतुकीसाठी डिझाइन करण्यात आला आहे. वांद्रे - कुर्ला संकुलातील (BKC) वाहतूक कोंडी टाळण्यासाठी एससीएलआर (SCLR) प्रकल्प हाती घेण्यात आला होता. या प्रकल्पांतर्गत बीकेसी परिसरात कलिना ते कुर्ला असे दोन उड्डाणपूल आहे. यापूर्वी कलिना येथून विमानतळाच्या दिशेने जाताना पश्चिम द्रुतगती मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत होती. ही वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी वाकोला जंक्शन येथे पुलाची उभारणी केली असून त्याचे काम पूर्ण झाले आहे.
एमएमआरडीने (MMRDA) महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांनी बुधवारी या पुलाला भेट देऊन पाहणी केली. यावेळी मुखर्जी यांनी माध्यमांशी संवाद साधला, एवढचं नाही तर हा पुल पावसाळ्यातच वाहतुकीसाठी खुला होईल अशी माहिती दिली. तसेच हा पूल वाहतुकीची कोंडी सोडवणारा असणार आहे असा विश्वास मुर्खजी यांनी व्यक्त केला. केबल आधारित उभारण्यात आलेल्या पुलाची लांबी साधारणपणे ९० अंशाचे असून त्याची लांबी सुमारे १००० मीटर आहे. तीव्र वळणामुळेच केबलचा वापर करण्यात आला आहे. हेच या पुलाचे खास वैशिष्टय आहे. मीडियाच्या आवाहलानुसार अशा प्रकारचा केबल पुल पहिलाच आहे, या पुलाचे काम लवकरच पूर्ण होणार असून मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणार आहे.