ठाणे शहरात १०४ खेळांची मैदाने, मात्र खेळायला जागाच नाही

  38

हक्काच्या मैदानांसाठी न्यायालयात दाद मागण्याचा सामाजिक संस्थांचा इशारा


ठाणे : ठाण्यात क्रीडा संस्कृती रुजावी, क्रीडापटू तयार व्हावेत या उद्देशाने शहरात १०४ खेळांची मैदाने होती. मात्र काळाच्या ओघात अतिक्रमण आणि व्यापारीकरणामुळे खेळण्यासाठी मैदानेच उपलब्ध नसल्याचे वास्तव समोर आले आहे. ठाणे महापालिकेच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे ही परिस्थिती उद्भवल्याचा आरोप करीत ठाणे सिटिझन्स फाऊंडेशनने मैदाने वाचवण्यासाठी दंड थोपटले असुन न्यायालयात दाद मागण्याचा इशारा दिला आहे.


पुर्वी तलावांचे शहर असलेल्या ठाण्यात मुबलक मैदाने होती, मात्र, आता सेंट्रल मैदान, साकेत मैदान,पोलीस परेड ग्राऊंड, गावदेवी मैदान अशी हाताच्या बोटावर मोजता येतील एवढीच मैदाने शिल्लक आहेत. पूर्वी ठाण्याच्या मैदानामध्ये सर्कशी तसेच मोठमोठे सांस्कृतिक कार्यक्रम होत असत. आता मैदानामध्ये अन्य बिनकामाच्या विकासकामांची भाऊगर्दी दिसत आहे. शहरीकरणामुळे वाहनांची संख्या वाढल्याने पार्किंगच्या नावाखाली काही मैदानांचे लचके तोडले आहेत.


ठाणे महापालिका क्षेत्रात १०४ मैदाने आरक्षित आहेत. परंतु ही मैदाने विकासकांच्या घशात गेली आहेत. अनेक मैदानांवर झोपडपट्ट्यांचे अतिक्रमण झालेले आहे. देखभालीचा खर्च परवडत नसल्याचे कारण पुढे करून ठाणे महापालिकेने काही मैदाने खाजगी व्यावसायिक, संस्थांना दिली आहेत. त्यांच्याकडून लग्न, पार्ट्या, मोठ्या समारंभासाठी मैदाने भाड्याने दिली जातात, खेळाचा उद्देश बाजूला पडुन मोठा नफा कमावला जात आहे. तेव्हा, ठाण्यातील नागरिकांच्या हक्काची मैदाने वाचवण्यासाठी ठाणे सिटिझन्स फाउंडेशनने दंड थोपटले आहेत. २०१४ पासून त्यांचा विविध स्तरावर लढा सुरू आहे. ठाणे महापालिका ते थेट क्रीडामंत्री, मुख्यमंत्र्यांपर्यंत साकडे घातले.


एकीकडे ठाणे स्मार्ट सिटी म्हणून नावारूपास येत असताना दुसरीकडे मैदानाविना ठाणेकरांचे आरोग्य संकटात सापडले आहे. क्रीडा विभागाच्या निर्देशानुसार प्रत्येक वसाहतीनजीक मैदाने असावीत. पण अनेक खेळाच्या जागा ठाणे महापालिकेच्या ताब्यातच नाहीत. या मूलभूत सुविधेकडे प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे.
- कॅस्बर ऑगस्टीन, अध्यक्ष, ठाणे सिटिझन्स फाऊडेशन

Comments
Add Comment

भारत महासत्ता न होण्यासाठी तरुणाईला अंमली पदार्थांच्या आहारी लोटण्याचा परकीय शक्तींचा डाव

आयआरएस समीर वानखेडे यांचे वक्तव्य कल्याण  : ''आपला भारत देश हा महासत्ता होण्याच्या दिशेने अतिशय विश्वासाने आणि

पोलीस अधिकारी संभाजी देशमुख यांना दुसऱ्यांदा राष्ट्रपती पोलीस पदक

कल्याण : पोलीस दलात केलेल्या उल्लेखनीय कामगीरीमुळे राज्य गुप्त वार्ता विभागातील पोलीस अधिकारी संभाजी देशमुख

ठाणेकरांनो, पाण्याचा जपून वापरा करा

मंगळवारी ८ तास पाणीपुरवठा बंद डोंबिवली  : केडीएमसीच्या कल्याण (पूर्व) परिसरातील पाणीपुरवठा वितरण व्यवस्थेतील

श्रीकृष्णनाथ पांचाळ ठाण्याचे जिल्हाधिकारी

मुंबई : जालन्याचे जिल्हाधिकारी श्रीकृष्णनाथ पांचाळ यांची महाराष्ट्र सरकारने बदली केली असून ठाण्याचे

मध्य रेल्वेची ऐन सकाळी ठप्प झालेली वाहतूक सुरळीत, रेल्वे रुळाला तडे गेल्याने नोकरदारांचे झाले हाल

कर्जत: मध्य रेल्वेची लोकल वाहतूक आज सकाळी काही तासांसाठी विस्कळीत झालेली पाहायला मिळाली. पण रेल्वे प्रशासनाच्या

सॅनिटरी नॅपकिन बनवणारी मशीन भंगारमध्ये

सहा वर्षे धूळ खात पडून भाईंदर : महिलांच्या मासिक पाळी काळात स्वच्छता वाढवण्यासाठी तसेच महिलांना रोजगार उपलब्ध