ठाणे शहरात १०४ खेळांची मैदाने, मात्र खेळायला जागाच नाही

  40

हक्काच्या मैदानांसाठी न्यायालयात दाद मागण्याचा सामाजिक संस्थांचा इशारा


ठाणे : ठाण्यात क्रीडा संस्कृती रुजावी, क्रीडापटू तयार व्हावेत या उद्देशाने शहरात १०४ खेळांची मैदाने होती. मात्र काळाच्या ओघात अतिक्रमण आणि व्यापारीकरणामुळे खेळण्यासाठी मैदानेच उपलब्ध नसल्याचे वास्तव समोर आले आहे. ठाणे महापालिकेच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे ही परिस्थिती उद्भवल्याचा आरोप करीत ठाणे सिटिझन्स फाऊंडेशनने मैदाने वाचवण्यासाठी दंड थोपटले असुन न्यायालयात दाद मागण्याचा इशारा दिला आहे.


पुर्वी तलावांचे शहर असलेल्या ठाण्यात मुबलक मैदाने होती, मात्र, आता सेंट्रल मैदान, साकेत मैदान,पोलीस परेड ग्राऊंड, गावदेवी मैदान अशी हाताच्या बोटावर मोजता येतील एवढीच मैदाने शिल्लक आहेत. पूर्वी ठाण्याच्या मैदानामध्ये सर्कशी तसेच मोठमोठे सांस्कृतिक कार्यक्रम होत असत. आता मैदानामध्ये अन्य बिनकामाच्या विकासकामांची भाऊगर्दी दिसत आहे. शहरीकरणामुळे वाहनांची संख्या वाढल्याने पार्किंगच्या नावाखाली काही मैदानांचे लचके तोडले आहेत.


ठाणे महापालिका क्षेत्रात १०४ मैदाने आरक्षित आहेत. परंतु ही मैदाने विकासकांच्या घशात गेली आहेत. अनेक मैदानांवर झोपडपट्ट्यांचे अतिक्रमण झालेले आहे. देखभालीचा खर्च परवडत नसल्याचे कारण पुढे करून ठाणे महापालिकेने काही मैदाने खाजगी व्यावसायिक, संस्थांना दिली आहेत. त्यांच्याकडून लग्न, पार्ट्या, मोठ्या समारंभासाठी मैदाने भाड्याने दिली जातात, खेळाचा उद्देश बाजूला पडुन मोठा नफा कमावला जात आहे. तेव्हा, ठाण्यातील नागरिकांच्या हक्काची मैदाने वाचवण्यासाठी ठाणे सिटिझन्स फाउंडेशनने दंड थोपटले आहेत. २०१४ पासून त्यांचा विविध स्तरावर लढा सुरू आहे. ठाणे महापालिका ते थेट क्रीडामंत्री, मुख्यमंत्र्यांपर्यंत साकडे घातले.


एकीकडे ठाणे स्मार्ट सिटी म्हणून नावारूपास येत असताना दुसरीकडे मैदानाविना ठाणेकरांचे आरोग्य संकटात सापडले आहे. क्रीडा विभागाच्या निर्देशानुसार प्रत्येक वसाहतीनजीक मैदाने असावीत. पण अनेक खेळाच्या जागा ठाणे महापालिकेच्या ताब्यातच नाहीत. या मूलभूत सुविधेकडे प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे.
- कॅस्बर ऑगस्टीन, अध्यक्ष, ठाणे सिटिझन्स फाऊडेशन

Comments
Add Comment

ठाणे महानगरपालिकेची प्रभाग रचना जाहीर, नगरसेवक संख्येत वाढ नाहीच, यंदाही 131 नगसेवक

मुंबई, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, ठाणे महापालिकेच्या निवडणुकीची धामधूम सुरू झाली असून आज ठाणे महानगरपालिकेची

Bhiwandi Accident : भिवंडीत खड्ड्यांनी घेतला डॉक्टरचा बळी; आतापर्यंत जीवघेण्या खड्ड्यामुळे तिघांचे प्राण गेले, जबाबदार कोण?

भिवंडी : भिवंडी शहरातील रस्त्यांची दयनीय अवस्था पुन्हा एकदा जीवघेणी ठरली आहे. वंजारपट्टी नाका परिसरात उघडखाबड

ठाण्यात मुसळधार पावसामुळे गणपती कारखान्यात शिरलं पाणी

ठाण्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं असताना पावसाचा फटका गणपती मूर्तीला देखील बसला

पावसामुळे ठाण्यात ४ महिन्यांत २० जणांचा बळी!

ठाणे: गेल्या चार महिन्यांत ठाणे जिल्ह्यात पावसामुळे संबंधित घटनांमध्ये किमान २० लोकांचा मृत्यू झाला आहे, तर या

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सुरू केले ‘लाडकी सून’ अभियान

ठाणे: 'लाडकी बहीण' योजनेच्या यशामुळे उत्साहित होऊन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिलांसाठी

भिवंडीत साचलेल्या पाण्याचा निचरा करण्यासाठी आला स्पायडरमॅन !

ठाणे : भिवंडीत भाजी मार्केटमध्ये साचलेले पाणी काढण्यासाठी चक्क स्पायडरमॅन आल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर