अलिबाग-वडखळ महामार्गावर खड्डेच खड्डे; लोकप्रतिनिधींसह अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

अलिबाग : अतिवृष्टीमुळे अलिबाग-वडखळ या राष्ट्रीय महामार्गावर केलेली तात्पुरती मलमपट्टी उखडून गेल्याने या मार्गावर जागोजागी खड्डे पडले आहेत. त्याचा सर्वच वाहन चालकांना कमालीचा त्रास होण्याबरोबरच दुचाकीस्वारांचे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे या मार्गाची तातडीने दुरुस्ती न झाल्यास स्थानिकांनी रास्ता रोको आंदोलनाचा इशारा दिला आहे.


अलिबाग-वडखळ राष्ट्रीय महामार्ग १६६-ए हा अत्यंत महत्त्वाचा मार्ग असून, या मार्गावर मोठी विविध प्रकारच्या वाहनांची वर्दळ असते. मात्र हा मार्ग सर्व बाजुंनी दुर्लक्षित असून, या मार्गावर जागोजागी मोठे खड्डे पडले आहे. यामुळे अपघाताचे प्रमाणही वाढले आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी होणारे अपघात गंभीर ठरत आहे.



दुचाकीस्वार विद्यार्थी, पालक, रुग्णवाहिका व गर्भवतींना याचा फटका बसत आहे. त्यामुळे स्थानिक चिंतेत आहेत. महामार्गाच्या या स्थितीच्या निषेधार्थ, वटपौर्णिमेदिवशी अलिबागच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळील खड्ड्यांत काहींनी वटवृक्षाची रोपे लावली होती. त्यानंतरही संबंधित विभागाला जाग येत नसल्याचे पाहून अलिबागचे माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांनी स्वखर्चाने काही भागांत पेव्हरब्लॉक बसविले. तरीही महामार्ग अधिकारी व जिल्हा प्रशासनास जाग येत नसल्याने प्रवाशांमध्ये संताप आहे. या मार्गावरून विविध खात्यांचे मंत्री, लोकप्रतिनिधी, तसेच जिल्हा प्रशासनाचे उच्च पदस्थ अधिकारी प्रवास करीत असतात. त्यांचेही याकडे दुर्लक्ष झाल्याने स्थानिक संताप व्यक्त करीत आहे. नेमेचि येतो पावसाळा. अन् खड्ड्यांचा आलाय कंटाला’अशी म्हणण्याची वेळ स्थानिकांवर आली आहे.


दरम्यान, नुकताच फेरफटका मारला असता, रिलायन्स पंप, तीनवीरा, पोयनाड नाका, धरमतर पूल, जेएसडब्लू कंपनीपासून ते अलिबागपर्यंत जागोजागी खड्डे पडल्याचे दिसून आले. या खड्ड्यांमधून वाहने हेलकावे खात जाताना दिसून येत होती. जेएसडब्ल्यू कंपनीपासून ते वडखळ दरम्यानच्या मार्गावर साचणारे पाणी जाण्यासाठी नालेच नसल्याने तेथील मार्ग नेहमीच पाण्याखाली असल्याचे दिसून आले. याकडेही कोणाचे लक्ष नसल्य़ाने या पाण्य़ातून एखादे वाहन वेगाने गेल्यास ते पाणी दुचाकीस्वारांच्या अंगावर उडत असल्याचेही दिसून आले. या मार्गावर काहीठिकाणी मोठ्या भेगा पडल्याने तेथे मार्ग खचायला सुरवात झाली आहे. त्यातून कोणत्याही क्षणी अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.


या अरुंद मार्गाच्या दुतर्फा वाढलेली झाडेझुडपे, संरक्षक कठड्यांची झालेली मोडतोड, पोयनाड नाका, पेझारी नाका, कार्लेखिंड येथे होणारी वाहतूक कोंडी, मार्गाच्या कडेला बसणारे फेरीवाले, अनधिकृत बांधकामे यांचाही त्रास या मार्गावरून येजा करणाऱ्या सर्वच प्रकारच्या वाहनांना होत असतो. त्यामुळे वाहतूक पोलिसाची गस्त महत्वाची असताना ते वाहतूक पोलिस कोठेच गस्त घालताना दिसत नाहीत.

Comments
Add Comment

लक्ष द्या ! लग्नपत्रिकेवर वधू-वराची जन्मतारीख टाकणे अनिवार्य होणार ? नेमकी शिफारस काय ?

लग्न म्हणजे दोन व्यक्तींचे , दोन कुटुंबाचे मिलन. पण वयोमर्यादा अपूर्ण असली तरी अनेक लग्न होतात, अर्थात बालविवाह

Health Department : आरोग्य विभागाच्या बदलीत राजकीय दबाव आणल्यास शिस्तभंगाची कारवाई

मुंबई : सार्वजनिक आरोग्य विभागातील मनुष्यबळ व्यवस्थापनात सुसूत्रता आणि पारदर्शकता आणण्यासाठी राज्य सरकारने

Nashik : मोठी बातमी ! डॉ. वसंतराव पवार मेडिकल कॉलेजमध्ये लिफ्ट कोसळल्याने महिला कर्मचारी गंभीर जखमी

नाशिक : नाशिकमध्ये पुन्हा एकदा गंभीर लिफ़्ट दुर्घटना समोर आली आहे. नाशिकच्या आडगाव परिसरातील डॉ. वसंतराव पवार

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींना ₹१५०० येणार की ₹३००० येणार? अपडेट काय ?

Ladki Bahin Yojana: राज्य सरकारची महत्वाकांक्षी योजना म्हणून ओळखली जाणारी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अनेक गरजू

XChat : लाँच झाले एक्सचे एक्सचॅट ॲप

टेक्सास : एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मने मेसेजिंग ॲप एक्सचॅट लॉन्च केले आहे. सध्या हे ॲप फक्त आयओएस

IPL 2026 : सनरायझर्स हैदराबादचा विजयी चौकार, गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी झेप

जयपूर : इशान मलिंगाच्या नेतृत्वाखालील भेदक गोलंदाजी आणि अभिषेक शर्मा व इशान किशन यांच्यातील शतकी भागीदारीच्या