Bus Strike : 'पालकांनो लक्ष द्या', मुलांच्या शाळेची बस न येण्याची शक्यता! विविध मागण्यांसाठी खाजगी बस चालकांचा १ जुलैपासून बेमुदत संप

  70

स्कूल बस सेवांवरही होणार परिणाम


मुंबई : मुंबईतील खाजगी बस चालकांनी त्यांच्या विविध मागण्यांसाठी बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहेत. दरम्यान, ३० जून २०२५ आधी आमच्या मागण्या मान्य झाल्यास १ जुलैपासून अनिश्चित काळासाठी आंदोलन सुरू करण्याचा इशारा त्यांनी सरकारला दिला. या संपामध्ये शालेय बस चालकही सहभागी होणार असल्याने पालकांना स्वत: त्यांच्या मुलांना शाळेत सोडवायला आणि शाळेतून घरी आणायला जावे लागण्याची शक्यता आहे.




स्कुल बसेससह खाजगी वाहतुकदारांचा समावेश


सरकारने ३० जून २०२५ नंतर आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास मुंबईतील विविध प्रवासी वाहतूक संघटनांनी अनिश्चित काळासाठी आंदोलन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे, असे मुंबई बस मालक संघटनेचे मुराद नाईक म्हणाले. या संपात सर्व प्रकारच्या बसेस, ज्यामध्ये स्कूल बससह, उबर सारख्या अ‍ॅग्रीगेटर बसेस आणि खाजगी वाहतुकदारांचा समावेश आहे. त्यामुळे वाहतुकीवर परिणाम होणार असून प्रवाशांचे हाल होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, ई-चलन दंड वसूल करणे थांबवणे, विद्यमान दंड माफ करणे, जड वाहनांसाठी अनिवार्य स्वच्छता नियम रद्द करणे आणि महानगरांमध्ये प्रवेश बंदीच्या वेळेचा पुनर्विचार करणे,अशा बस चालकांच्या मागण्या आहे. बस चालकांनी केलेल्या या मागण्यांबाबत सरकार काय भूमिका घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.


मुंबई शहरात मोठ्या प्रमाणात शालेय बस धावतात. अनेक शाळा त्यांच्या विद्यार्थ्यांसाठी स्कूल बसची व्यवस्था करतात. तसेच काही खासगी वाहतूक कंपन्या देखील ही सेवा पुरवतात. अशा परिस्थिती बस चालकांनी संप पुकारल्यास पालकांनाच आपल्या मुलांना शाळेत सोडवायला तसेच शाळेतून घरी आणायला जावे लागणार आहे.

Comments
Add Comment

ऑनलाईन लोनच्या नावाखाली तरुणीची फसवणूक, अश्लील फोटो केले व्हायरल

मुंबई : मुंबईच्या जोगेश्वरी भागात राहणाऱ्या तरुणीची ऑनलाइन फसवणूक करून तिचे अश्लील फोटो नातेवाईकांना

इंडिगोची ‘हॅपी इंडिगो डे सेल’ घोषणा, देशांतर्गत प्रवास १,२१९ पासून तर आंतरराष्ट्रीय ४,३१९ पासून

मुंबई: इंडिगोने आपल्या १९ व्या वर्धापनदिनानिमित्त ‘हॅपी इंडिगो डे सेल’ची घोषणा केली आहे. प्रवाशांना केवळ ₹१,२१९

या योजनेतून दर महिन्याला मिळतील ७ हजार रूपये...पाहा काय आहे ही योजना

मुंबई: भारतीय आयुर्विमा महामंडळाने महिलांसाठी एक विशेष योजना सुरू केली आहे, 'एलआयसी विमा सखी' (LIC Bima Sakhi). ही योजना

युगेंद्र पवारांचा साखरपुडा, मुंबईत पवार कुटुंब एकत्र

मुंबई : काही दिवसांपूर्वी अजित पवार यांचे पुत्र जय पवार यांच्या पुण्यात साखरपुडा झाला. आता अजित पवार यांचे भाऊ

मुंबईत अपघात; कार उलटली, दुभाजक ओलांडून पलिकडच्या रस्त्यावर गेली आणि...

मुंबई : रविवार म्हणजे अनेकांसाठी सुटीचा, विश्रांतीचा दिवस. यामुळे मुंबईकर निवांत असतात. पण आजच्या रविवारची

Megablock: मध्य रेल्वेच्या माटुंगा ते मुलुंड दरम्यान आज मेगा ब्लॉक

मुंबई: मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी रविवारी मेगा ब्लॉक