Birla Group App: आदित्य बिर्ला कॅपिटल कंपनीचे ॲप हॅक ! सायबर घोटाळेबाजांनी चोरले १.९५ कोटींचे डिजिटल गोल्ड!

  62

प्रतिनिधी: आदित्य बिर्ला समुहाची कंपनी एबीसीडी (Aditya Birla Capital Digital ABCD) कंपनीने आपले वित्तीय सेवा देणारे ॲप एप्रिल २०२४ मध्ये चालू केले होते. त्याच ॲपची चर्चा पुन्हा एकदा रंगली आहे. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, कंपनीचे ॲप (App) सायबर घोटाळेबाजांनी हॅक केले आहे.त्यामुळे या डिजिटल गोल्डमधील ४३५ खात्यातील १.९५ कोटी लंपास केले आहेत. कंपनीच्या स्थापनेनंतरची हा सर्वांत मोठी मानली जात आहे. ९ जूनला प्रथम घोटाळा उघडकीस आला होता. काही ग्राहकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी कंपनीच्या कस्टमर केअरला संपर्क साधला असता पुढील प्रकार लक्षात आलेला आहे.


माहितीनुसार, या घटनेनंतर पोलिसांत कंपनीने तक्रार नोंदवली आहे. कंपनीने यानंतर कथित प्रकरणात नुकसान भरपाई देत ग्राहकांची खाती पुन्हा पुर्ववत केली आहेत. या डिजिटल ॲपमधून ग्राहकांना विविध प्रकारच्या आर्थिक वित्तीय सेवा व गुंतवणूक सेवा पुरविली जाते. युपीआय पेमेंट, म्युचल फंड गुंतवणूक, कर्ज, विमा अशा विविध सुविधांचा यात समावेश असतो. मात्र या घटनेमुळे ग्राहकांमध्ये चिंतेची लाट पसरली होती.ग्राहक प्लॅटफॉर्मद्वारे देखील डिजिटल सोने विकू शक तात.


याबाबतची तक्रार दाखल केली असताना कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, जेव्हा ग्राहकांनी हेल्पलाइनवर फोन करून त्यांच्या खात्यातून डिजिटल सोन्याची विक्री करण्याची परवानगी नसल्याचे सांगण्यास सुरुवात केली तेव्हा ही बाब उघडकीस आली. एफआयआरमध्ये असे नमूद केले आहे की कंपनीच्या तांत्रिक टीमला असे आढळून आले की एका अज्ञात व्यक्तीने प्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस हॅक केला आहे, ॲपची सामान्य प्रक्रिया बदलली आहे, ग्राहकांच्या खात्यांमधून डिजिटल सोने विकले आहे आणि पैसे त्यांच्या विविध बँक खात्यांमध्ये ट्रान्सफर केले आहेत.


कंपनीने तक्रार दाखल केली करण्यापूर्वी कंपनीने केलेल्या समिक्षेनुसार, ४३५ खात्यातील डिजिटल गोल्डची फेरफार झाली. त्यामुळे १.९५ कोटीचे नुकसान कंपनीच्या ग्राहकांचे झाले होते. त्यानंतर लगेचच प्रभावित ग्राहकांचे डिजिटल सोने पुनर्संचयित करण्यात आले असे कंपनीने आपल्या निवेदनात म्हटले आहे आणि अनेक बँक खात्यांमधील हस्तांतरण गोठवण्यासाठी सुधारात्मक कारवाई करण्यात आली. अधिकाऱ्यांनी असेही म्हटले आहे की हॅकशी संबंधित तांत्रिक कमकुवतपणा दूर करण्यात आला आहे.


माहितीनुसार कंपनीच्या तक्रारीनंतर कलम ३१८(४), ३१९ (२) अंतर्गत तक्रार दाखल झाली आहे. पोलिस या घटनेचा तपास करत आहेत. याप्रकरणी अजून कुणालाही अटक झालेली नाही. मात्र यानिमित्ताने पुन्हा एकदा सायबर सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

Comments
Add Comment

मुंबईत अंधेरीमध्ये पाच मजली मासळी बाजार बांधणार ?

मुंबई : मुंबईत अंधेरीमध्ये जे. बी. नगर येथे पाच मजली मासळी बाजार बांधण्याचा १३८ कोटी रुपयांचा प्रस्ताव मंजुरी

आरक्षणाची लढाई लढावी, पण... नितेश राणेंचा जरांगेंना इशारा

मुंबई : जे रक्ताने मराठे असतात ते कधीही आईविषयी अपशब्द वापरणार नाही. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आपण आदर्श

बाप्पाच्या आगमनापूर्वी सोने स्वस्त पण चांदी महाग झाली 'ही' आहेत कारणे जाणून घ्या आजचे दर

मोहित सोमण:आज जागतिक अस्थिरतेच्या तोंडावर आज व गणपती बाप्पाच्या आगमनापूर्वी पुन्हा सोन्यात घसरण झाली आहे.

मुख्यमंत्र्यांच्या आईबाबत मनोज जरांगेंचे वक्तव्य वादाच्या भोवऱ्यात

मुंबई : मराठा समाजाला सरसकट कुणबी दर्जा आणि आरक्षण द्या, अशी मागणी करत मनोज जरांगे यांनी समाजबांधवांना

'प्रहार' शेअर बाजार विश्लेषण: सेन्सेक्स व निफ्टीत वाढ शेअर बाजाराची गाडी पुन्हा रुळावर 'या' कारणामुळे वाढ जाणून घ्या आजचे विश्लेषण

मोहित सोमण : आज अखेरचा सत्राच्या अखेरीस इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात वाढ झाली आहे. सेन्सेक्स ३२९.०६ अंकाने

अंतरवाली सराटीमधून 27 ऑगस्टला मुंबईसाठी निघणार, जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा

मराठा आरक्षण चळवळीचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी २९ ऑगस्टला सकाळी १० वाजल्यापासून मुंबईच्या आझाद मैदानावर