राज्यात ५१ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

नाशिक : राज्यातील ५१ पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या बदल्या करण्यात आल्या असून त्यामध्ये नाशिक पोलीस आयुक्त नव्याने २ पोलीस उपयुक्त येणार आहे तर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधीक्षक पदी नव्याने नियुक्ती करण्यात आली आहे.


राज्य शासनाच्या गृह विभागाने शुक्रवारी सायंकाळी ५१ पोलीस अधीक्षक व अप्पर पोलीस अधीक्षक दर्जाच्या पोलीस पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आलेले आहे. या बदल्यांमध्ये नासिक पोलीस आयुक्तलयातील गुन्हे शाखेचे पोलीस उपयुक्त प्रशांत बच्छाव यांची नासिक वरून नागरी हक्क संरक्षण कोल्हापूर येथे बली करण्यात आलेली आहे तर नाशिक पोलीस आयुक्तालयातील मुख्यालय येथे कार्यरत असलेले पोलीस उपयुक्त चंद्रकांत खांडवी यांची धुळे येथील पोलीस प्रशिक्षण केंद्र येथे पोलीस अधीक्षक या पदावरती बदली करण्यात आलेली आहे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधीक्षक शमिष्ठा वलावडकर यांची छत्रपती संभाजी नगर पोलीस आयुक्तालयात पोलीस उपयुक्त या पदावर बदली करण्यात आलेली आहे तर गुप्तवार्ता विभागामध्ये कार्यरत असलेले गीता चव्हाण यांची महाराष्ट्र पोलीस अकॅडमी मध्ये पोलीस अधीक्षक या पदावर बदली करण्यात आलेली आहे.


नाशिक शहरामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सुरक्षा विभागामध्ये गुप्तवार्ता या पदावरती कार्यरत असलेले योगेश चव्हाण यांची नाशिक पोलीस आयुक्तालयात उपयुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे. धुळे येथे अप्पर पोलीस अधीक्षक या पदावरती कार्यरत असलेले किशोर काळे यांची बदली नाशिक शहरात पोलीस उपयुक्त या पदावर करण्यात आलेली आहे. तर अहिल्यानगर या ठिकाणी कार्यरत असलेले प्रशांत खैरे यांची बदली महाराष्ट्र पोलीस अकॅडमी मध्ये अप्पर पोलीस अधीक्षक या पदावरती करण्यात आलेली आहे तर अनिकेत भारती हे आस्थापनाच्या प्रतीक्षेत असलेले त्यांची नियुक्ती गुप्त वार्ता विभागाच्या उपयुक्त पदी करण्यात आलेली आहे नाशिकच्या नागरी हक्क संरक्षण विभागामध्ये कार्यरत असलेले अण्णासाहेब जाधव यांची बदली अप्पर पोलीस अधीक्षक गडहिंग्लज येथे करण्यात आलेली आहे तर महाराष्ट्र पोलीस अकॅडमी मध्ये कार्यरत असलेले प्रदीप जाधव यांची बदली मुक्त वार्ता अमरावती येथे करण्यात आलेली आहे.

Comments
Add Comment

Agriculture Minister Dattatray Bharne : पेरणीची घाई करू नका!

 कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांचे आवाहन; खरीप पूर्वतयारीसाठी प्रत्येक ग्रामपंचायतीत सुविधा केंद्र

Wedding Invitations : बालविवाहाच्या कुप्रथेला आळा घालण्यासाठी सरकारची मोठी पावले: लग्नपत्रिकेवर जन्मतारीख छापणे होणार अनिवार्य

मुंबई : राज्यातील बालविवाहाची (Child Marriage) प्रथा पूर्णपणे बंद करण्यासाठी आणि अल्पवयीन मुलींचे लग्न लावून देणाऱ्या

Vilas Ghule Murder Case: विलास घुले खून प्रकरणात पोलिसांची धडक कारवाई, सर्व ९ आरोपी ताब्यात

बीड : बीड (Beed) जिल्ह्यातील केज (Kej) तालुक्यातील टाकळी फाटा येथील हॉटेल चालक विलास घुले यांच्या हत्या (Murder) प्रकरणात

Farmer loan waive : कर्जमाफी अन् अनुदानातील अडथळे दूर होणार; संबंधित विभागांना तातडीने बैठकांचे आदेश

मुंबई : राज्यातील शेतकरी कर्जमाफी (Farmer loan waive), प्रोत्साहन अनुदान आणि ओटीएस (वन टाईम सेटलमेंट) योजनांच्या

Raigad Fort : दरड कोसळल्याने रायगड किल्ल्याचा पायरी मार्ग २५ जूनपर्यंत बंद

रायगड : अतिवृष्टीमुळे किल्ले रायगडावरील (Raigad Fort) महादरवाजा परिसरात दरड कोसळल्याने किल्ल्यावर जाणारा पायरी मार्ग

Maharashtra wedding card new rule : लग्न ठरलंय? मग हा नवा नियम जाणून घ्या; पत्रिकेत द्यावी लागणार 'ही' महत्त्वाची माहिती

बालविवाह रोखण्यासाठी सरकारचा नवा फॉर्म्युला; लग्नपत्रिकेत होणार मोठा बदल महाराष्ट्रात बालविवाह (Child Marriage)