Pandharpur Wari 2025 : वारकऱ्यांची आरोग्यसेवा कोण करतं?

महाराष्ट्राचं आराध्य दैवत म्हणजे पंढरपूरचा विठोबा. याच लाडक्या विठूरायाच्या दर्शनासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आषाढी एकादशी पंढरपूरमध्ये दाखल होतात. पण हे वारकरी १५ ते २० दिवस आधीच आपल्या घरातून पायी निघालेले असतात. पालखी सोहळ्यात वारकऱ्यांची मोठी गर्दी असते​. या काळात त्यांना अनेक आरोग्य विषयक समस्यांना तोंड द्यावे लागते. वारी आरोग्य संपन्न ठरावी म्हणून शासन स्तरावर आरोग्य विभाग, सेवाभावी व विविध सामाजिक संस्थांकडून दिंडी मार्गावरआरोग्य सुविधा उपलब्ध करून ​दिल्या जातात. ​दिंडी आणि आरोग्यसेवा यांचा जवळचा संबंध आहे. ​त्यामुळं जनसेवा हीच ईश्वरसेवा हे ब्रीदवाक्य समोर ठेवत आळंदी ते पंढरपूर पालखीमार्गावर संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या वारकरी बांधवांची सेवा करण्यासाठी अनेक स्वयंसेवी संघटनांनी विविध उपक्रम राबविले.​

?si=Dyz9UkmfK3e7kBy4

ऊन, वारा,पावसाची तमा न बाळगता विठूरायाचं नाम घेत वारकरी चालत असतात. त्यामुळं वारकऱ्यांचे पाय दुखतात.सर्दी,ताप,खोकला व अंगदुखीचा त्रास होतो. त्यामुळं यासाठी त्यांनाउपचाराची गरज असते. त्यामुळं वारी मार्गावर वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेतली जाते. यंदा वारी मार्गावर दर पाच किलोमीटर अंतरावर तात्पुरत्या आपला दवाखाना माध्यमातून माेफत वैद्यकीय सेवा पुरवली जात आहे. यासाठी आरोग्य विभागाने दीड हजारांवर डाॅक्टर व कर्मचारी पुरवलेत. वारीच्या मार्गावर ४६ ठिकाणी १० खाटा तात्पुरत्या रुग्णांसाठी आरक्षित ठेवण्यात आलेल्या आहेत. अनेक दानशूर नागरिक व स्वयंसेवी संस्थाही वारकऱ्यांना आरोग्य सेवा मोफत पुरवत आहेत. सलग ३३ ​वर्षांपासून मुंबई येथील माउली चॅरीटेबल अ‍ॅड मेडिकल ट्रस्ट ​वारकऱ्यांची आरोग्य सेवा करत आहे. यंदाही या ट्रस्टने आळंदीपासून निघालेल्या वारकरी बांधवांची ​मोफत आरोग्य तपासणी ​करून औषधांचे वाटप केले. वारीतील वारकरी बांधवांची तेल लावून मालीश केली जात आहे. या आरोग्य सेवेसाठी साडेचारशे डॉक्टर व सेवक सहभागी ​झालेले आहेेत. पंढरपूरपर्यंत त्यांची सेवा सुरू राहणार आहे.



​जगद्गुरू संत तुकाराम व संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालख्यां​ पुण्यात दाखल झाल्या. त्यावेळी पुणे महापालिकेतर्फे १६ फिरती वैद्यकीय पथके तैनात ​केली. या माध्यमातून ​ मोफत तपासणी आणि औषधोपचार​ केले. पुण्यात जवळपास पुण्यात ३०हजार वारकऱ्यांवर मोफत उपचार ​करण्यात आले. पालखीतळाच्या परिसरात १० ठिकाणी वैद्यकीय पथके व दवाखाने कार्यरत होते.
Comments
Add Comment

गावदेवी भाजी मंडई आग दुर्घटनेप्रकरणी दुर्घटनाग्रस्तांना नुकसानभरपाई द्या, आमदार डावखरेंची मागणी

Thane : ठाण्यातील रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या गजबजलेल्या गावदेवी भाजी मंडईमध्ये आज पहाटेच्या सुमारास भीषण आग लागून

प्रसाद लाड यांनी स्वीकारले जरांगे पाटील यांचे चर्चेचे निमंत्रण; उद्या आंतरवलीत भेट

मराठा आरक्षणाचा तिढा सुटणार?; २३ मे च्या 'डेडलाईन'पूर्वी सरकारच्या वतीने मध्यस्थी मुंबई : मराठा आरक्षणाच्या

आता गावकऱ्यांना मिळणार मोफत मिळकत पत्रिका

सनद फी माफ करण्याची महसूलमंत्री बावनकुळेंची घोषणा; ग्रामविकास विभाग प्रस्ताव तयार करणार मुंबई : ग्रामपंचायत

वाई येथे लघुकुंभमेळ्याचा शुभारंभ ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते संपन्न

वाईच्या लघुकुंभ मेळ्याची महती संपूर्ण राज्यात पसरणार:-जयकुमार गोरे सातारा वाई नगरीला “दक्षिण काशी” अशी ओळख

पक्षसंघटनेची एकजुटीने मजबूत बांधणी करणार

प्रदेशाध्यक्ष खा. सुनिल तटकरे यांचा निर्धार मुंबई; राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील सर्व समज-गैरसमज दूर झाले आहेत.

BCCI : निवड समितीचा मोठा निर्णय! भारत अ संघात अचानक बदल; या ऑलराउंडरला मिळाली संधी

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयने भारत A संघात मोठा बदल केला आहे. आगामी श्रीलंका दौऱ्यातील ट्राय