Pandharpur Wari 2025 : वारकऱ्यांची आरोग्यसेवा कोण करतं?

  119

महाराष्ट्राचं आराध्य दैवत म्हणजे पंढरपूरचा विठोबा. याच लाडक्या विठूरायाच्या दर्शनासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आषाढी एकादशी पंढरपूरमध्ये दाखल होतात. पण हे वारकरी १५ ते २० दिवस आधीच आपल्या घरातून पायी निघालेले असतात. पालखी सोहळ्यात वारकऱ्यांची मोठी गर्दी असते​. या काळात त्यांना अनेक आरोग्य विषयक समस्यांना तोंड द्यावे लागते. वारी आरोग्य संपन्न ठरावी म्हणून शासन स्तरावर आरोग्य विभाग, सेवाभावी व विविध सामाजिक संस्थांकडून दिंडी मार्गावरआरोग्य सुविधा उपलब्ध करून ​दिल्या जातात. ​दिंडी आणि आरोग्यसेवा यांचा जवळचा संबंध आहे. ​त्यामुळं जनसेवा हीच ईश्वरसेवा हे ब्रीदवाक्य समोर ठेवत आळंदी ते पंढरपूर पालखीमार्गावर संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या वारकरी बांधवांची सेवा करण्यासाठी अनेक स्वयंसेवी संघटनांनी विविध उपक्रम राबविले.​

?si=Dyz9UkmfK3e7kBy4

ऊन, वारा,पावसाची तमा न बाळगता विठूरायाचं नाम घेत वारकरी चालत असतात. त्यामुळं वारकऱ्यांचे पाय दुखतात.सर्दी,ताप,खोकला व अंगदुखीचा त्रास होतो. त्यामुळं यासाठी त्यांनाउपचाराची गरज असते. त्यामुळं वारी मार्गावर वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेतली जाते. यंदा वारी मार्गावर दर पाच किलोमीटर अंतरावर तात्पुरत्या आपला दवाखाना माध्यमातून माेफत वैद्यकीय सेवा पुरवली जात आहे. यासाठी आरोग्य विभागाने दीड हजारांवर डाॅक्टर व कर्मचारी पुरवलेत. वारीच्या मार्गावर ४६ ठिकाणी १० खाटा तात्पुरत्या रुग्णांसाठी आरक्षित ठेवण्यात आलेल्या आहेत. अनेक दानशूर नागरिक व स्वयंसेवी संस्थाही वारकऱ्यांना आरोग्य सेवा मोफत पुरवत आहेत. सलग ३३ ​वर्षांपासून मुंबई येथील माउली चॅरीटेबल अ‍ॅड मेडिकल ट्रस्ट ​वारकऱ्यांची आरोग्य सेवा करत आहे. यंदाही या ट्रस्टने आळंदीपासून निघालेल्या वारकरी बांधवांची ​मोफत आरोग्य तपासणी ​करून औषधांचे वाटप केले. वारीतील वारकरी बांधवांची तेल लावून मालीश केली जात आहे. या आरोग्य सेवेसाठी साडेचारशे डॉक्टर व सेवक सहभागी ​झालेले आहेेत. पंढरपूरपर्यंत त्यांची सेवा सुरू राहणार आहे.



​जगद्गुरू संत तुकाराम व संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालख्यां​ पुण्यात दाखल झाल्या. त्यावेळी पुणे महापालिकेतर्फे १६ फिरती वैद्यकीय पथके तैनात ​केली. या माध्यमातून ​ मोफत तपासणी आणि औषधोपचार​ केले. पुण्यात जवळपास पुण्यात ३०हजार वारकऱ्यांवर मोफत उपचार ​करण्यात आले. पालखीतळाच्या परिसरात १० ठिकाणी वैद्यकीय पथके व दवाखाने कार्यरत होते.
Comments
Add Comment

कल्याणमध्ये भीषण अपघात: ट्रकने दुचाकीस्वार महिलेला चिरडले, जागीच मृत्यू

ठाणे: कल्याण पश्चिम येथील निक्कीनगर परिसरात एका दुचाकीस्वार महिलेचा भीषण अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. आपल्या

Health: दररोज प्या 'या' ड्रायफ्रुट्सचे पाणी, आरोग्य राहील निरोगी आणि त्वचा होईल चमकदार

मुंबई : सुका मेवा आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असतो. त्यातीलच एक महत्त्वाचा सुका मेवा म्हणजे काळ्या मनुका.

विवाह नोंदणीसाठी आता रविवारीही महापालिकेची सेवा

जोडप्यांना सुट्टीच्या दिवशीही करता येणार नोंदणी विवाह मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबईत दरवर्षी

गरूड पुराणात सांगितलेली ही ४ कामे माणसाचे झोपलेले नशीब जागे करू शकतात, जाणून घ्या...

मुंबई: हिंदू धर्मातील अठरा महापुराणांपैकी एक असलेल्या गरुड पुराणात केवळ मृत्यू आणि परलोकाचेच नव्हे, तर यशस्वी

बैलपोळाच्या दिवशी नदीमध्ये वाहून गेलेल्या युवकाचा मृतदेह गवसला

अकोला: मूर्तिजापूर तालुक्यातील एक युवक बैलपोळा सणाच्या दिवशी बैलांना धुण्यासाठी पेढी नदीवर गेला असता, अचानक पाय

ढोल-ताशांच्या गजरात गणेशमूर्तींचे आगमन

मुंबई : गणेशोत्सवाला अवघे काही दिवस उरले असून मुंबईतील अनेक गणेश मंडळांनी मूर्ती मंडपात नेण्यास सुरुवात केली