पंचवटीसह द्वारका परिसरात सलग पाचव्या दिवशी पाणीटंचाई

नागरिक त्रस्त : निलगिरी बाग केंद्रावर तांत्रिक बिघाड जैसे थे


नाशिक : निलगिरी बाग जलशुद्धीकरण केंद्राला जोडणाऱ्या जलवाहिनीत चाचणीनंतर हवेचा दाब निर्माण झाला. त्यामुळे ५० दशलक्ष लिटर्स क्षमतेचे हे केंद्र पूर्ण क्षमतेने चालले नाही. अवघे २५ दशलक्ष लिटर्स पाणीपुरवठा झाल्याने पंचवटीसह पूर्व विभागातील काठे गल्ली व परिसरात पाणीपुरवठा पाचव्या दिवशी विस्कळीत झाला आहे.


स्मार्ट सिटी कंपनीमार्फत गेल्या शनिवारी हाती घेण्यात आलेल्या जुने गंगापूर पंपिंग स्टेशन येथील जलवाहिनी दुरुस्तीचे काम पूर्ण न झाल्याने पाणी टंचाई कायम आहे. जलवाहिनी दुरुस्तीचे काम मंगळवारी (दि. २४) पहाटे पूर्ण होत असतानाच निलगिरी बाग जलशुद्धीकरण केंद्रावरील जलवाहिनीत हवेचा दाब निर्माण झाल्याने पंचवटीसह पूर्व विभागातील काठे गल्ली भागातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला. जलशुद्धीकरण केंद्रे तसेच जलवाहिन्यांच्या दुरुस्तीच्या कामांसाठी महापालिकेचा पाणीपुरवठा विभाग व स्मार्ट सिटी कंपनीच्या वतीने शनिवारी (दि.२१) शटडाउन घेण्यात आला होता. बारा बंगला ते निलगिरी बाग जलशुद्धीकरण केंद्राला जोडणारी ९०० मिमी व्यासाची जलवाहिनी जुन्या गंगापूर पंपिंग स्टेशन येथे लिकेज झाल्याने दुरुस्ती करण्यात आली. मात्र, काही तासांतच पुन्हा त्याच ठिकाणी ही जलवाहिनी लिकेज झाली. त्यामुळे शनिवार, रविवारपाठोपाठ सोमवारीदेखील सिडको व इंदिरानगरचा काही भाग वगळता उर्वरित शहरात पाणीपुरवठा होऊ शकला नव्हता. या जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम मंगळवारी (दि. २४) पहाटेपर्यंत सुरू होते. परंतु, जलकुंभ भरण्यास विलंब झाल्याने सकाळचा पाणीपुरवठा सलग चौथ्या दिवशी बंदच राहिला. अनेक भागांत पाणी न आल्याने टँकरची मागणी नोंदविली गेली. विशेष करून, गांधीनगर जलशुद्धीकरण केंद्रावरून होणारा पाणीपुरवठा मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाला. तीन तास उशिराने पाणी सोडण्यात आले.


जुने नाशिक भागात पाण्याची सर्वाधिक बोंब झाली. सिडको, इंदिरानगर भागात विल्होळी जलशुद्धीकरण केंद्रातून पाणीपुरवठा करण्यात आला.



नागरिकांना पाणीपुरवठ्याबाबत झालेल्या त्रासाबद्दल महापालिकेतर्फे दिलगिरी व्यक्त करण्यात येत आहे. लवकरच पाणीपुरवठा सुरळीत होईल.
- रवींद्र धारणकर, अधीक्षक अभियंता, पाणीपुरवठा विभाग
Comments
Add Comment

बीएसएनएलची टॉवर उभारण्याची योजना का मंदावली? २,७५१ ऐवजी केवळ ९३० गावांमध्येच टॉवर उभारणार!

बीएसएनएल '४जी' साठी ९३० गावांमध्ये जमीन देण्यास महाराष्ट्र सरकारची मंजुरी मुंबई: ग्रामीण आणि दुर्गम भागांमध्ये

Satara Gazette: जरांगे पाटलांची ती मागणी सुद्धा होणार मान्य, मराठा समाजाला दिलासा!

सातारा गॅझेट लागू करण्यासंदर्भात सरकारी हालचालींना सुरुवात  मुंबई: मराठा समाजाला आणखीन एक दिलासा देणारी बातमी

'आदिवासींच्या जीवनात ३ वर्षांत आमुलाग्र परिवर्तन घडेल'

यवतमाळ : आदिवासी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र शासनाने महत्वाच्या योजना हाती घेतल्या

साई मंदिरातील प्रसाद, दर्शन, सुरक्षा आता एआयच्या नियंत्रणात

स्मार्ट सुरक्षा प्रणालीमुळे अपप्रवृत्तीला बसणार आळा शिर्डी : श्री साईबाबा संस्थानात भाविकांच्या सुरक्षेसह

परतीचा पाऊस येत आहे रे.. सावधान!

महाराष्ट्रातील १७ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा मुंबई: गणपती विसर्जनानंतर अनेक दिवस दडी मारून बसलेला

पुण्यातील दर्ग्याखाली बोगदा! हिंदू संघटनांनी केला मंदिर असल्याचा दावा

पुणे: पुण्यातील मंचर येथील दर्ग्याच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळली, त्याखाली मंदिरासारखी रचना आढळल्याने वाद