मुंबई: 'बिग बॉस १७' मुळे घराघरात पोहोचलेला अभिनेता अभिषेक कुमारने (Abhishek Kumar) नुकताच कास्टिंग काऊचचा एक धक्कादायक अनुभव (Casting Couch Experience) शेअर केला आहे. एका मुलाखतीत त्याने सांगितले की, मुंबईत करिअरच्या सुरुवातीलाच त्याला या वाईट अनुभवाला सामोरे जावे लागले, ज्यामुळे तो इतका घाबरला की त्याने रडत रडत आपल्या आईला फोन केला.
अभिषेक म्हणाला, "एकदा माझ्यासोबत एक घटना घडली होती. एक गे (Gay) व्यक्ती होता... त्याने मला नको तिथे स्पर्श केला... मी खूप घाबरलो. 'तुला असे करावे लागेल, तरच तू पुढे जाशील...' असे तो बोलला होता. ही गोष्ट तेव्हाची आहे, ज्यावेळी मला मुंबईत येऊन दोन महिनेच झाले होते"
या घटनेनंतर अभिषेक इतका अस्वस्थ झाला होता की त्याने त्वरित आपल्या आईला फोन केला. त्यावेळी त्याने घरी सांगितले नव्हते की तो मुंबईत आहे; त्याने आईला दिल्लीत ट्रेनिंग करत असल्याचे सांगितले होते. अभिषेकने सांगितले, "मी माझ्या आईला रडत रडत म्हणआलो की, 'माझ्यासोबत असे झाले आहे...' माझ्या आईने मला घरी परत येण्यास सांगितले. मी पुढच्याच दिवशी ट्रेनच्या जनरल कोचचे तिकीट काढले. ट्रेनच्या जनरल कोचमध्ये बसून मी रडत रडत घरी चाललो होतो. त्यावेळी घरी गेलो होतो आणि स्वतःशीच म्हणत होतो की, मला या इंडस्ट्रीत यायचे नाही, इथे काम करणे अवघड आहे... मला इथे यायचेच नाही."
अभिषेक कुमारने 'उडारियां' शोमध्ये अमरीक सिंह विर्क आणि 'बेकाबू'मध्ये आदित्य रायचंद या भूमिका साकारल्या होत्या. या भूमिका प्रेक्षकांना खूप आवडल्या होत्या. त्यानंतर तो 'बिग बॉस १७'मध्ये सहभागी झाला आणि उपविजेता ठरला. बिग बॉसच्या घरात ईशा मालवियासोबतच्या भांडणामुळे तो विशेष चर्चेत आला होता.