'त्या गे व्यक्तीने मला नको तिथे स्पर्श केला...', अभिषेक कुमारचा धक्कादायक अनुभव

मुंबई: 'बिग बॉस १७' मुळे घराघरात पोहोचलेला अभिनेता अभिषेक कुमारने (Abhishek Kumar) नुकताच कास्टिंग काऊचचा एक धक्कादायक अनुभव (Casting Couch Experience) शेअर केला आहे. एका मुलाखतीत त्याने सांगितले की, मुंबईत करिअरच्या सुरुवातीलाच त्याला या वाईट अनुभवाला सामोरे जावे लागले, ज्यामुळे तो इतका घाबरला की त्याने रडत रडत आपल्या आईला फोन केला.


अभिषेक म्हणाला, "एकदा माझ्यासोबत एक घटना घडली होती. एक गे (Gay) व्यक्ती होता... त्याने मला नको तिथे स्पर्श केला... मी खूप घाबरलो. 'तुला असे करावे लागेल, तरच तू पुढे जाशील...' असे तो बोलला होता. ही गोष्ट तेव्हाची आहे, ज्यावेळी मला मुंबईत येऊन दोन महिनेच झाले होते"


या घटनेनंतर अभिषेक इतका अस्वस्थ झाला होता की त्याने त्वरित आपल्या आईला फोन केला. त्यावेळी त्याने घरी सांगितले नव्हते की तो मुंबईत आहे; त्याने आईला दिल्लीत ट्रेनिंग करत असल्याचे सांगितले होते. अभिषेकने सांगितले, "मी माझ्या आईला रडत रडत म्हणआलो की, 'माझ्यासोबत असे झाले आहे...' माझ्या आईने मला घरी परत येण्यास सांगितले. मी पुढच्याच दिवशी ट्रेनच्या जनरल कोचचे तिकीट काढले. ट्रेनच्या जनरल कोचमध्ये बसून मी रडत रडत घरी चाललो होतो. त्यावेळी घरी गेलो होतो आणि स्वतःशीच म्हणत होतो की, मला या इंडस्ट्रीत यायचे नाही, इथे काम करणे अवघड आहे... मला इथे यायचेच नाही."


अभिषेक कुमारने 'उडारियां' शोमध्ये अमरीक सिंह विर्क आणि 'बेकाबू'मध्ये आदित्य रायचंद या भूमिका साकारल्या होत्या. या भूमिका प्रेक्षकांना खूप आवडल्या होत्या. त्यानंतर तो 'बिग बॉस १७'मध्ये सहभागी झाला आणि उपविजेता ठरला. बिग बॉसच्या घरात ईशा मालवियासोबतच्या भांडणामुळे तो विशेष चर्चेत आला होता.

Comments
Add Comment

दिग्दर्शक बुची बाबू सना यांच्या वाढदिवसानिमित्त ‘पेड्डी’ टीमकडून खास भेट; BTS व्हिडिओ प्रदर्शित

मुंबई : ‘पेड्डी’मधील पहिले गाणे ‘चिकीरी’ने आधीच सर्व प्लॅटफॉर्म्सवर 200 दशलक्षांहून अधिक व्ह्यूज मिळवले आहेत. या

‘जय सोमनाथ’साठी बॉलिवूडचे दिग्गज करणार महायुती

मुंबई : ऐतिहासिक सोमनाथ मंदिरावर १०२६ मध्ये पहिल्यांदा हल्ला झाला. यानंतर वारंवार हल्ले झाले. या सर्व

बिग बॉस फेम कलाकाराचे 'तुरू तुरू' गाणे सुपरहिट, दोन दिवसांत दहा लाखांपेक्षा जास्त व्हयूज

मुंबई : मराठी म्युझिक इंडस्ट्रीत सध्या ‘तुरू तुरू’ या नव्या गाण्याची जोरदार चर्चा रंगली आहे. अवघ्या दोन दिवसांत

पाकिस्तानमध्ये बॉलिवूडप्रेमींसाठी 'धुरंधर'ची पायरसी जोरात

कराची : आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर' हा हिंदी चित्रपट भारतात सुपरहिट झाला. अनिवासी भारतीय पण मोठ्या संख्येने हा

रामायण मालिकेचे दिग्दर्शक रामानंद सागर यांच्या मुलाचे निधन

मुंबई : रामायण ही टीव्ही मालिका घराघरात पोहोचली. या लोकप्रिय मालिकेचे दिग्दर्शक रामानंद सागर यांचे पुत्र आनंद

Valentines Day: अभिनेत्री नम्रता गायकवाड 'काहीतरी वेगळे' करणार? चर्चांना उधाण

मुंबई: काही दिवसांपूर्वी अभिनेत्री नम्रता गायकवाड हीने अभिनेता तुषार कावळे यांच्यासोबतचे काही फोटो शेअर करून