क्रिकेटपटू सूर्यकुमार यादव रुग्णालयात

नवी दिल्ली : भारताच्या टी २० क्रिकेट संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव जर्मनीतील रुग्णालयात आहे. सूर्यकुमार यादववर जर्मनीत यशस्वी स्पोर्ट्स हर्निया झाली.

बीसीसीआयने रोहित शर्मानंतर भारताच्या टी २० क्रिकेट संघाचे नेतृत्व ३४ वर्षांच्या सूर्यकुमार यादवकडे सोपवले. पण शस्त्रक्रियेमुळे सूर्यकुमार यादव बांगलादेश दौऱ्यावर जाण्याची शक्यता कमी आहे. पूर्ण बरा होण्यासाठी सूर्यकुमारला किमान सहा ते बारा आठवडे लागतील.

पुढच्या वर्षी म्हणजेच २०२६ मध्ये भारत आणि श्रीलंका संयुक्तपणे टी २० विश्वचषक स्पर्धेचे आयोजन करणार आहेत. या स्पर्धेत सूर्यकुमार यादव भारताच्या टी २० क्रिकेट संघाचे नेतृत्व करेल. सध्या भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. यानंतर भारत बांगलादेश दौऱ्यावर जाणार आहे. बांगलादेशमध्ये एकदिवसीय सामन्यांची मालिका आणि टी २० मालिका खेळवली जाणार आहे. पहिला टी २० सामना २६ ऑगस्ट २०२५ रोजी तर शेवटचा टी २० सामना ३१ ऑगस्ट २०२५ रोजी होणार आहे.

सूर्यकुमार यादवची सोशल मीडिया पोस्ट

'लाइफ अपडेट, पोटाच्या खालच्या उजव्या भागात स्पोर्ट्स हर्नियाची शस्त्रक्रिया झाली. यशस्वी शस्त्रक्रियेनंतर, मी बरा होत आहे. क्रिकेटच्या मैदानावर परतण्याची उत्सुकतेने वाट पाहत आहे.'



सूर्यकुमार यादवची कारकिर्द

सूर्यकुमार यादवने तिसाव्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याने एक कसोटी, ३७ एकदिवसीय आणि ८३ टी २० सामने खेळले आहेत. त्याने एकदिवसीय सामन्यात ७७३ धावा आणि टी २० मध्ये २५९८ धावा केल्या आहेत. त्याने एकदिवसीय सामन्यात चार अर्धशतके झळकावली आहेत. तसेच त्याने टी २० मध्ये चार शतके आणि २१ अर्धशतके झळकावली आहेत. तो रुग्णालयात दाखल होण्याआधी मुंबई लीग २० या काही दिवसांपूर्वी झालेल्या स्पर्धेत खेळला होता.
Comments
Add Comment

राष्ट्रध्वजाचा अपमान टाळण्यासाठी विराट कोहलीने केलेल्या कृतीचे अनेकांनी केले कौतुक

सिडनी : रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या जबरदस्त बॅटिंग भारतानं ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात

ऑस्ट्रेलियात पॅरा बॅडमिंटनमध्ये भारताला ११ पदके

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलिया पॅरा बॅडमिंटन इंटरनॅशनल २०२५ मध्ये भारतीय पॅरा-बॅडमिंटन खेळाडूंनी शानदार कामगिरी करत

उपांत्य फेरीत भारतीय संघ खेळणार 'या' संघाविरूद्ध!

मुंबई: महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ अखेरच्या टप्प्यात येऊन पोहोचला असून उपांत्य फेरीची उत्सुकता क्रिकेट

'रो-को'ने ऑस्ट्रेलियाचा विजयरथ रोखला, रोहितचे शतक आणि विराटचे अर्धशतक; 'रो-को'ची ऐतिहासिक कामगिरी

सिडनी : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सिडनीच्या मैदानावर रंगलेला एकदिवसीय सामना भारताने नऊ गडी राखून जिंकला.

“विकसित भारत चॅलेंज ट्रॅक” मुंबईत युवा महोत्सव २७ ऑक्टोबरला

मुंबई : युवकांचा सर्वांगीण विकास, भारतीय संस्कृती आणि परंपरेचे जतन, सुप्त गुणांना प्रोत्साहन तसेच राष्ट्रीय

तिसऱ्या युथ आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला सुवर्ण

मुंबई : बहरीनमधील मनामा येथे आशियाई युवा क्रीडा स्पर्धा २०२५ मध्ये भारताने कबड्डीमध्ये पूर्ण विजय मिळवत सुवर्ण