Pratap Sarnaik : वाहतूक व्यवसायकांना फायदा होणार ! ई-चलन समस्या सोडवण्यासाठी समिती स्थापन करावी, परिवहन मंत्र्यांचे आदेश...

मुंबई : गेले अनेक वर्षापासून वाहतूक व्यावसायकांना ई-चलन संदर्भात अडचणींचा सामना करावा लागतोय, ही बाब सरकारच्या निदर्शनास आल्याने परिवहन विभागाचे मंत्री प्रताप सरनाईक यांनी महत्वाचे आदेश दिले आहेत. ई-चलनविषयक समस्या सोडवण्यासाठी राज्य सरकारची भूमिका असून त्यासाठी परिवहन विभागाने संबंधित समिती स्थापन करावी आणि त्या समितीने एक महिन्याच्या आत अहवाल सादर करावा असे आदेश प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत. मंत्रालय विभागात प्रताप सरनाईक यांनी गुरुवारी बैठक बोलवली.


या बैठकीत उद्योग मंत्री उदय सामंत, अतिरिक्त मुख्य सचिव (परिवहन) गृह विभाग संजय सेठी, परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी, विविध वाहतूक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ई-चलन प्रणालीत सुधारणा करण्यासाठी काही महत्वाच्या सूचना दिल्या आहेत. प्रताप सरनाईक म्हणाले ई- "चलन प्रणालीत सुधारणा करताना प्राधान्याने वाहनचालक व मालकांना नियमांचे पालन करण्यास प्रोत्साहन देणारे निकष असावे, त्यात कुठेही जाचक अटी लादू नये.


एकाच दिवशी एकसमान कारणासाठी वेगवेगळे चलन वसूल करू नये. त्यासाठी चलनाचा ग्राह्यता कालावधी निश्चित करावा, व्यावसायिक वाहनांना पार्किंग सुविधा उपलब्ध करून द्यावी. मुंबईमध्ये जड वाहतूक वाहनांना प्राधान्याने वाहनतळ सुविधा उपलब्ध करून द्यावी. वाहतूक संघटनांच्या समस्या सोडवण्यासाठी परिवहन विभाग, पोलीस आणि संबंधित क्षेत्रातील तज्ञांची सयुंक्त समिती स्थापन करावी, त्यामध्ये वाहतूक संघटनांच्या प्रतिनिधींचा समावेश करावा." अशी माहिती सरनाईक यांनी दिली.


तसेच प्रताप सरनाईक पुढे म्हणाले  "समितीच्या कामात पारदर्शकता व सर्वसमावेशकता येईल. तसेच पोलीस विभागामार्फत करण्यात येणाऱ्या कारवाईत सध्याच्या ई-चलन निकषात शिथिलता आणावी. परिवहन विभागाच्या परित्रकाच्या निकषानुसार पोलिसांनीही आवश्यक तिथेच कार्यवाही करावी. चलनासोबत प्रत्यक्षस्थळाचे छायाचित्र अपलोड करावे, वास्तविक वेळेचे छायाचित्र घ्यावे. अनावश्यक, नाहक कारवाई करणे थांबवावे. संपूर्ण चलन प्रक्रिया ही सहिष्णू, पारदर्शक आणि सुव्यवस्थितरित्या राबवण्याच्या दृष्टीने समितीने अभ्यास करावा. ई-चलनाच्या जाचक निकषात योग्य बदल करावेत. वाहनांसाठीची गती मर्यादा, वाहनतळ नियमावली या सर्वांचा अभ्यास करून समितीने अहवाल सादर करावा. वाहतूक संघटनांच्या मागण्यांना न्याय देण्याची विभागाची भूमिका असल्याचे"  मंत्री सरनाईक यांनी सांगितले.


Comments
Add Comment

Eknath Shinde : एकनाथ शिंदे-गणेश नाईक यांच्यात मनोमिलन? - मंत्रालयात बंद दाराआड चर्चा

नवी मुंबई पालिकेसह ठाण्यातील जागावाटपाचा तीढा सुटणार मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात ठाणे आणि नवी मुंबईतील

Chandrashekhar Bawankule : ठाकरे बंधूंची युती हा केवळ निवडणूक फंडा - चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई : "ठाकरे बंधूंची युती हा केवळ निवडणुकीचा फंडा असून, जनतेला याची पूर्ण कल्पना आहे. त्यामुळे त्यांनी मुंबई

Devendra Fadanvis : राज्य मंत्रिमंडळाचा मोठा धडाका! नगराध्यक्षांची ताकद वाढली; आता मिळणार थेट...वाचा सविस्तर

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या

मुंबईत थर्टी फर्स्ट सेलिब्रेशन साठी 'फायर अलर्ट' जारी; हॉटेल्स, पब्स आणि मॉल्सची झाडाझडती सुरु

मुंबई : थर्टी फर्स्ट जवळ येतोय, नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबई हळू हळू सज्ज होत असतानाच, मुंबईकरांच्या

या वर्षीचा ख्रिसमस ठरतोय खास का ? जाणून घेऊया कारण

अंकांचा अनोखा योग जुळून आला आहे .तारीख बघा २५ /१२/२५ आहे ना आश्चर्यकारक डिसेंबर महिना सुरु झाला की सर्वांना आतुरता

Ashish Shelar : "विठ्ठलाला घेरणाऱ्या बडव्यांशी आता गळ्यात गळे का?"; आशिष शेलारांचा राज-उद्धव युतीवर जहरी प्रहार!

शेलारांचा 'लाव रे तो व्हिडिओ' स्टाईलने पलटवार मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या आगामी रणसंग्रामासाठी राजकीय