Nitin Gadkari : दुचाकी चालकांकडून कोणत्याही टोल घेतला जाणार नाही, नितीन गडकरी यांची सोशल मीडियावरती पोस्ट...

मुंबई : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने १५ जलै २०२५ पासून दुचाकी वाहन चालकांकडून टोल वसूल करण्यात येईल. अशा प्रसारमाध्यमात बातम्या गेल्या काही दिवसांपासून झळकत होत्या. त्यामुळे दुचाकी वाहनचालक संभ्रमात पडलेले आहेत. मात्र केवळ या बातम्या अफवा असून दुचाकी चालकांकडून कोणत्याही प्रकारे टोल घेतला जाणार नाही, असे केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सोशल मीडियावरती पोस्ट केली.त्यामुळे दुचाकीस्वार करणाऱ्या वाहनचालकांनी आनंद व्यक्त केला आहे.





दुचाकीस्वारकडून दोन हजार रुपये दंड आकारण्यात येणार


एनएचएआयच्या नवीन माहितीनुसार दुचाकी वाहनांना राष्ट्रीय महामार्गावर धावण्यासाठी टोल भरावा लागेल. ज्या दुचाकीस्वाराने टोल भरण्यास टाळाटाळ केली किंवा फास्टॅग वापरला नाही तर दुचाकीस्वारकडून दोन हजारांचा दंड आकरण्यात येईल, अशा बातम्या प्रसारमाध्यमांमध्ये दाखवण्यात आलेले होते. अशा बातम्यांवर विश्वास ठेऊ नका, असं नितीन गडकरी यांनी आपल्या सोशल मीडियाच्या पोस्ट मध्ये म्हटलं आहे.


मी माध्यमांचा निषेध करतो


नितीन गडकरी म्हणाले की, "काही माध्यमांद्वारे राष्ट्रीय महामार्गांवर दुचाकी वाहनांकडून टोल वसूल केला जाणार आहे, अशा दिशाभूल करणाऱ्या बातम्या पसरवल्या जात आहेत. परंतु, असा कोणताही निर्णय झाला नाही. दुचाकी वाहनांना टोल शुल्कातून सूट देण्यात आली. सत्य जाणून न घेता दिशाभूल करणाऱ्या बातम्या पसरवू नयेत. मी अशा माध्यमांचा निषेध करतो."


 

 

 

 

 

 

 
Comments
Add Comment

Smruti Mandhana And Palash muchhal : स्मृती मानधना–पलाश मुच्छल पुन्हा एकत्र? बांद्र्यातील 'त्या' व्हिडिओने चर्चांना उधाण

मुंबई : भारतीय महिला क्रिकेटपटू स्मृती मानधना आणि संगीतकार पलाश मुच्छल यांच्या नात्याबाबत पुन्हा एकदा चर्चांना

Ramdas Athawale : केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी घेतली राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांची भेट

मुंबई : महाराष्ट्राचे राज्यपाल महामहीम जिष्णू देव वर्मा यांची रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय

Bhondubaba Ashok Kharat : भोंदू खरातविरोधात तक्रारींचा महापूर, लैंगिक शोषणाचे आणखी ११ आरोप

मुंबई : वासनांध अशोक खरात प्रकरण दिवसेंदिवस अधिक गंभीर होत असून, तक्रारींची संख्या सातत्याने वाढताना दिसत आहे.

Bmc News, Andheri Subway : अंधेरी सब वे मधील पावसाचे तुंबणारे पाणी,  महापौरांनी  रेल्वेशी समन्वय राखून गती देण्याचे महापालिकेला दिले निर्देश

मुंबई : अंधेरी भूयारी मार्ग हा अतिसखल परिसर असल्याने पावसाळ्यात पाणी साचून वाहतुकीला अडथळा होतो. त्यावर

Bmc News : मुंबईत यापूर्वी खरेदी केलेल्या कचरा पेट्या गेल्या कुठे? महापालिका प्रशासनावर स्थायी समितीची प्रश्नांची सरबती

खासगी कंत्राटदार कचरा पेट्या देणार तर अधिक पेट्यांची खरेदी कशाला? पेट्या खरेदीचा प्रस्ताव अध्यक्षांनी ठेवला

Mankhurd News : मानखुर्दमधील १४०० अनधिकृत झोपड्या जमीनदोस्त

बॉम्बे सोप फॅक्टरीच्या जागेवरील अतिक्रमणाचा डाव हाणून पडला महानगरपालिका आणि उपनगरे जिल्हाधिकारी कार्यालय