राज्यातील सार्वजनिक ठिकाणी सीसीटीव्हीसंदर्भात नवे धोरण आणणार

  29

मुंबई (प्रतिनिधी) : सार्वजनिक ठिकाणी सीसीटीव्ही बसवण्यासंदर्भात सर्व शासकीय यंत्रणांमध्ये समन्वय साधून, पोलीस विभागाच्या माध्यमातून सचिव पातळीवर एक समिती स्थापन करून धोरण तयार करण्यात येणार असल्याचे गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी सांगितले.


सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार सिद्धार्थ शिरोळे, गृह विभागाचे प्रधान सचिव अनुप कुमार सिंह यांच्यासह नगर विकास व गृह विभागाचे मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


राज्यात वेगवेगळ्या शासकीय यंत्रणांनी आपापल्या स्तरावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले असले तरी यामध्ये एकसंधपणा नसल्यामुळे सर्व शासकीय यंत्रणांमध्ये समन्वय साधून, पोलीस विभागाच्या माध्यमातून सचिव पातळीवर समिती स्थापन करून सार्वजनिक ठिकाणी सीसीटीव्ही बसवण्याचे धोरण मुख्यमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात येईल, असे गृहराज्यमंत्री कदम यांनी सांगितले.


राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा स्तर उंचावण्यासाठी तसेच नागरिकांच्या सुरक्षेसाठी सार्वजनिक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यातील कायदा-सुव्यवस्था राखण्यात सीसीटीव्ही कॅमेरे उपयुक्त ठरत असून, त्यांचा वापर गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रभावी ठरत आहे. त्यामुळे यापुढे सार्वजनिक सीसीटीव्ही सर्व ठिकाणी लावणे बंधनकारक करण्यासाठी नियोजन केले जात असल्याचे श्री. कदम यांनी स्पष्ट केले.


नवीन धोरणानुसार कोणती यंत्रणा कोणत्या प्रकारचे सीसीटीव्ही बसवेल, त्यांचा देखभाल खर्च, फुटेज, यासारखे अनेक महत्त्वाचे मुद्दे निश्चित केले जाणार आहेत. सार्वजनिक ठिकाणची सुरक्षा ही केवळ पोलिसांची जबाबदारी नसून, ती संपूर्ण प्रशासनाची सामूहिक जबाबदारी आहे, असेही कदम यांनी यावेळी नमूद केले.

Comments
Add Comment

Maharashtra Assembly Monsoon Session 2025 : पावसाळी अधिवेशनाचा मुहूर्त ठरला, हिंदी सक्ती, शक्तीपीठ या मुद्द्यावरुन वातावरण पेटणार; कधी होणार अधिवेशन? जाणून घ्या...

मुंबई : यंदाच्या राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा मुहूर्त ठरलेला आहे. येत्या ३० जून ते १८ जुलै या काळात

ऊर्जा विभागाच्या कामकाजाचा बोर्डीकर यांनी घेतला आढावा

मुंबई  : राज्यातील शेतकऱ्यांच्या मागणीनुसार सौर ऊर्जा पंपाची मागणी पूर्ण करावी. महावितरण, महाजनको आणि

केबल-स्टे ब्रीज तयारीचा महानगर आयुक्तांनी घेतला आढावा

पावसाळ्यात पूल सुरू करणार : संजय मुखर्जी मुंबई : सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोड (एससीएलआर) विस्तार प्रकल्पस्थळास

लालबाग पुलावरील गळती आता कायमचीच थांबली

खराब पर्जन्य जलवाहिन्या मनपाच्या वतीने बदलण्यात आल्या मुंबई: लालबाग उड्डाणपूलावर मागील काही दिवसांपासून

पश्चिम रेल्वेकडून दोन विशेष गाड्या उकई सोनगड स्थानकावर थांबणार

मुंबई  : प्रवाशांच्या सोयीसाठी, पश्चिम रेल्वे चालवण्यात येणाऱ्या उधना-मिरज आषाढी एकादशी विशेष गाडीला उकाई सोनगड

औद्योगिक उत्कर्षाकडे महाराष्ट्राची यशस्वी वाटचाल!

‘एमआयडीसी’ आयोजित ‘महाराष्ट्र उद्योग संवाद’ कार्यक्रमाचे बीकेसी येथे उद्घाटन मुंबई  : जगाच्या अनेक भागांत