मनमाडकरांना लवकरच मिळणार रोज पाणी

करंजवण योजना पूर्ण; आ. कांदे यांच्याकडून पाहणी


मनमाड : चार दशकांपासून पाणी टंचाईच्या तीव्र झळा सोसत असलेल्या मनमाड शहरासाठी वरदान ठरलेल्या करंजवण- मनमाड थेट जलवाहिनी पाणी पुरवठा योजनेचे काम अंतिम टप्प्यात आले असून, नांदगाव मतदार संघाचे आमदार सुहास कांदे यांनी करंजवण योजनेच्या जल शुद्धीकरण केंद्राला भेट देऊन पाहणी केली. सुमारे साडेचारशे कोटी रुपये खर्च करून हे काम पूर्णत्वास आले असून, शहराला २४ तास पाणीपुरवठा होणार आहे.

मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते लवकरच लोकार्पण


लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत योजनेचे लोकार्पण होणार आहे.
मनमाडकरांना कित्येक दशकापासून होणारा त्रास लवकरच दूर होणार असून करंजवण पाणी पुरवठा योजना ही पूर्णत्वास गेली आहे. मायभगिनींच्या डोक्यावरचा हंडा उतरवून मनमाडकरांसाठी पाण्याचा प्रश्न मार्गी लावून मला पुण्य मिळाले आहे. ही योजना मनमाडकरांच्या सार्थ पाठिंब्याने पूर्ण झाली आहे.
- सुहास कांदे, आमदार
Comments
Add Comment

NCP Merger: शरद पवार गटाच्या साप्ताहिकातून मोठा दावा, राष्ट्रवादीच्या विलिनीकरणानंतर आम्ही पक्षाचं नेतृत्व अजित पवारांकडे...

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य विलिनीकरणाबाबत सुरू असलेल्या चर्चांना पुन्हा एकदा वेग आला असतानाच,

Pune: बांगलादेशच्या झेंड्यावरून फूड स्टॉल्सची तोडफोड; पुण्यातील MIT कॉलेजमध्ये राडा

पुणे: पुण्यातील कोथरुड येथील एमआयटी महाविद्यालयात आयोजित वर्ल्ड कल्चरल फेस्टिवलमध्ये मोठा राडा झाला आहे. फूड

राज्यात हवामानात बदलाचे संकेत; फेब्रुवारीत 'या दिवशी' काही भागांत कोसळणार पावसाच्या सरी

मुंबई : फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात कोरडे वातावरण राहिल्यानंतर आता राज्यात हवामानाची घडी बदलताना दिसत आहे.

Nashik MNS Protest: शिक्षकाने मराठी बोलण्यास विरोध केल्याने मनसे कार्यकर्त्यांचा राडा

नाशिक: नाशिकमध्ये मराठीच्या मुद्द्यावरून वातावरण तापलं आहे. एका प्रसिद्ध कोचिंग क्लासमध्ये मनसे

65th Maharashtra State Art Exhibition: सांगलीत रंगणार ६५ वे महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शन; ज्येष्ठ कलावंत जी. एस. माजगावकर यांचा होणार सन्मान

मुंबई: कला संचालनालयामार्फत आयोजित ‘६५ वे महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शन (विद्यार्थी विभाग)’ यंदा सांगली येथे

Navnath Ban: काँग्रेसची गुलामगिरी करणाऱ्या राऊतांनी स्वाभिमानाची भाषा करू नये; नवनाथ बन यांचा घणाघात

मुंबई: वंदनीय बाळासाहेब ठाकरेंचे हिंदुत्वाचे विचार विसरून काँग्रेसची गुलामगिरी करणाऱ्या राऊतांनी