मनमाडकरांना लवकरच मिळणार रोज पाणी

  53

करंजवण योजना पूर्ण; आ. कांदे यांच्याकडून पाहणी


मनमाड : चार दशकांपासून पाणी टंचाईच्या तीव्र झळा सोसत असलेल्या मनमाड शहरासाठी वरदान ठरलेल्या करंजवण- मनमाड थेट जलवाहिनी पाणी पुरवठा योजनेचे काम अंतिम टप्प्यात आले असून, नांदगाव मतदार संघाचे आमदार सुहास कांदे यांनी करंजवण योजनेच्या जल शुद्धीकरण केंद्राला भेट देऊन पाहणी केली. सुमारे साडेचारशे कोटी रुपये खर्च करून हे काम पूर्णत्वास आले असून, शहराला २४ तास पाणीपुरवठा होणार आहे.

मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते लवकरच लोकार्पण


लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत योजनेचे लोकार्पण होणार आहे.
मनमाडकरांना कित्येक दशकापासून होणारा त्रास लवकरच दूर होणार असून करंजवण पाणी पुरवठा योजना ही पूर्णत्वास गेली आहे. मायभगिनींच्या डोक्यावरचा हंडा उतरवून मनमाडकरांसाठी पाण्याचा प्रश्न मार्गी लावून मला पुण्य मिळाले आहे. ही योजना मनमाडकरांच्या सार्थ पाठिंब्याने पूर्ण झाली आहे.
- सुहास कांदे, आमदार
Comments
Add Comment

मनोज जरांगे विरुद्ध आक्षेपार्ह पोस्ट केल्याबद्दल समर्थकांनी युट्यूबरला काळं फासलं, कपडे फाडले

छत्रपती संभाजी नगर: मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्यावर आक्षेपार्ह पोस्ट केल्याबद्दल समर्थकांनी एका

रत्नागिरी : पोटच्या मुलाकडून आईचा सुरीने गळा कापून खून

रत्नागिरी : पोटच्या मुलानेच आपल्या आईचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना आज (दि. २६ ऑगस्ट) पहाटे उघडकीस आली. या

Ganeshostav 2025: गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांची गर्दी

रत्नागिरी : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणातील चाकरमानी मोठ्या प्रमाणावर गावात दाखल झाले आहेत. त्यामुळे

पुण्यात मानाच्या गणपतींच्या मिरवणुकांची जय्यत तयारी : प्राणप्रतिष्ठा आणि मिरवणुकांचे वेळापत्रक जाहीर

पुणे : लाडक्या गणरायाच्या आगमनासाठी आता फक्त काही तास उरले आहेत. बुधवारी देशभरात गणरायाचे आगमन मोठ्या उत्साहात

मुंबईत आंदोलन करण्यास मनोज जरांगे पाटील यांना न्यायालयाची मनाई

मराठा आरक्षणप्रश्नी मनोज जरांगे पाटील यांना आझाद मैदान येथे उपोषण करण्यास हायकोर्टाने मनाई केली आहे. मराठा

मुख्यमंत्री फडणवीसांच्या ओएसडीने घेतली मनोज जरांगेंची भेट, मोर्चाची तारीख पुढे ढकलण्याची शक्यता

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आंदोलनाची हाक दिली आहे. या आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी राज्य