Himachal Pradesh: हिमाचलमध्ये ढगफुटी झाल्याने हाहाकार! अचानक आलेल्या पुराने २ जणांचा मृत्यू, २० जण गेले वाहून

मंडी: हिमाचल प्रदेशात बुधवारी ढगफुटी झाल्याने अचानक पूर आला आणि मुसळधार पावसामुळे २ जणांचा मृत्यू झाला. तर २० जण वाहून गेल्याची शक्यता आहे. कांगडा जिल्ह्याच्या मनुनी खड्ड येथून दोन मृतदेह हाती घेण्यात आले. तर इंदिरा प्रियदर्शिनी जलविद्युत परियोजनेच्या ठिकाणी एका कामगार कॉलनीत राहणाऱे १५ ते २० जण वाहून गेल्याची शक्यता आहे.


अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, पावसामुळे या परियोजनेचे काम थांबवण्यात आले होते. त्यामुळे कामगार या जवळच्या ठिकाणी आराम करत होते. तेव्हा मनुनी खड्ड आणि जवळच्या नाल्यातील पाणी वाढले आणि हे कामगार वाहून गेले.


कुल्लूमध्येही अनेक ठिकाणी पुरामुळे उद्ध्वस्त झाल्याचे चित्र दिसत आहे. एका व्हिडिओमध्ये एक वाहन चिखलातील पाण्यात वाहताना दिसत आहे. राज्यातील अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. यामुळे अनेक ठिकाणी पाण्याची पातळी उंचावली.


 

Comments
Add Comment

Air Ticket Refund Rules: विमान प्रवाशांसाठी आनंदाची बातमी; आतापासून तिकिट रद्द केल्यास परतावा..., जाणून घ्या नवीन नियम

मुंबई: देशातील विमान प्रवाशांच्या वाढत्या तक्रारींची दखल घेत नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) विमान

फ्लाइट तिकीट रद्द करण्यावर आता शुल्क लागणार नाही; डीजीसीएने केला रिफंड नियमांमध्ये मोठा बदल

नवी दिल्ली :  विमान प्रवाशांसाठी दिलासा देणारी बातमी आहे. आता विमान प्रवाशांना प्रवासी बुकिंगच्या ४८ तासांच्या

R. Nallakannu : तामिळनाडूतील सीपीआय नेते स्वातंत्र्यसैनिक नल्लाकन्नू यांचे १०१ व्या वर्षी निधन

स्वातंत्र्यसैनिक आणि तामिळनाडूमधील भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे (सीपीआय) ज्येष्ठ नेते आर. नल्लाकन्नू यांचे

PM Modi Israel Visit : इस्रायलच्या संसदेकडून पंतप्रधान मोदींचा सर्वोच्च बहुमान

- हा बहुमान मिळणारे ठरले पहिले भारतीय पंतप्रधान तेल अवीव : पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवार २५ फेब्रुवारी रोजी

Odisha News : भ्रष्टाचाराविरोधी मोठी कारवाई! खाण अधिकाऱ्याच्या घरातून तब्बल ४ कोटींची रोकड जप्त

ओडिशा : भ्रष्टाचाराविरोधातील कारवायांमध्ये ओडिशा राज्यात मोठी धडक कारवाई समोर आली आहे. ओडिशा दक्षता विभागाने

केंद्र सरकारचा मोठा निर्णय; घरमालक-भाडेकरूंसाठी 'हे' नवे नियम लागू

नवी दिल्ली : कर वजावटीत पारदर्शकता वाढवण्यासाठी आणि बनावट दावे रोखण्यासाठी केंद्र सरकारने प्राप्तिकर