हिंदी सक्ती विरोधात चढाओढ! ठाकरेंचे मोर्चे मराठीसाठी की राजकीय शक्ती दाखवण्यासाठी?

मुंबई : एक मुद्दा… पण दोन मोर्चे! आणि दोघंही 'ठाकरे'. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन बंधू एकत्र येतील, असं काही जणांना वाटत होतं. पण झालं उलटंच. दोघांनी आपापल्या नेतृत्वात, एकाच विषयावर, अवघ्या दोन दिवसाच्या फरकाने मोर्चे जाहीर केलेत. विषय आहे हिंदी सक्ती विरोधात आणि त्रिभाषा धोरणा विरोधात आवाज उठवायचा. पण हे खरंच केवळ भाषेच्या प्रश्नासाठी आहे का, की ठाकरे विरुद्ध ठाकरे यांची राजकीय शक्ती प्रदर्शनाची चढाओढ सुरू आहे?


राज्यात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन बंधू एकत्र येणार का, यावरून जोरदार चर्चा सुरू असतानाच, आता या दोघांनीही आपल्याच नेतृत्वात मोर्चे काढणार असल्याचे जाहीर करून राजकीय वर्तुळात नवा ट्विस्ट आणलाय. हिंदी सक्ती विरोधात राज ठाकरे शनिवारी (५ जुलै) तर उद्धव ठाकरे सोमवारी (७ जुलै)ला मोर्चा काढणार आहेत. विशेष म्हणजे, दोघांनीही सर्वपक्षीय नेत्यांना मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन केलेय.



राज ठाकरे ५ जुलैला गिरगाव चौपाटीवरून मोर्चा काढणार आहेत. त्यांनी स्पष्ट केलंय, कोणताही पक्षाचा झेंडा नसेल, हा फक्त मराठी माणसाचा मोर्चा असेल. शिक्षणमंत्री दादा भुसे भेटून गेले, तरीही राज ठाकरेंनी त्रिभाषा धोरण धुडकावून लावलं. ते म्हणाले – ‘महाराष्ट्राचं मराठीपण हरवतंय, सीबीएसई शाळा वाढतायत, केंद्र मराठीवर दबाव टाकतंय, आणि राज्य सरकार हे निमूटपणे स्वीकारतंय.’ म्हणूनच, हा लढा आहे 'कटाविरुद्ध' आणि मराठीच्या अस्मितेसाठी. पण गंमत अशी, की राज ठाकरेंच्या घोषणेनंतर लगेचच उद्धव ठाकरेंनीही दुसऱ्या दिवशी म्हणजेच ७ जुलैला मोर्चा काढणार असल्याची घोषणा केलीय. त्यातही सर्वपक्षीय नेत्यांना सहभागी होण्याचं आवाहन केलंय.


आता प्रश्न उभा राहतो.. हे दोघं खरंच मराठीसाठी लढतायत, की एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठी वेगळ्या मार्गाने चाललेत? एकाच विषयावर दोन मोर्चे म्हणजे एकवाक्यता नाही की एकमेकांवर अविश्वास? मराठीसाठी असं जर खरंच मनापासून लढायचं असेल, तर या दोघांना एकत्र येण्यास काय अडचण आहे? का अजेंडा मराठीचा नाही, तर मंच आणि माईक आपापला ठेवायचा हेच खरे उद्दिष्ट?


मोर्चा कुणाचाही असो, लढा खराच असेल, तर मराठी जनता त्यात सामील होईल. ठाकरे विरुद्ध ठाकरे – हा खरंच मराठीसाठीचा लढा आहे का? की पुढील निवडणुकांसाठीची सराव मोर्चेबाजी? अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरु आहे.

Comments
Add Comment

DCM Eknath Shinde : उपमुख्यमंत्री शिंदेंनी केली मिसिंग लिंकच्या कामाची पाहणी, महाराष्ट्र दिनी होणार उद्घाटन; मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील घाटाला मिळणार बायपास

मुंबई : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाला पूर्णतः ‘ऍक्सेस कंट्रोल’ बनवणाऱ्या महत्त्वाच्या ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे

HSC RESULT : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल कधी जाहीर होणार ?

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल कधी जाहीर होणार ? हा प्रश्न

MSRTC : 'आपली बस, आपली सेवा'; एसटी महामंडळाची नवी मोहीम

मुंबई : महाराष्ट्राच्या जीवनाशी नाळ जोडलेली लालपरी आता नव्या उमेदीनं, नव्या शिस्तीनं आणि नव्या संवेदनशीलतेनं

New Rule For Hotel : हॉटेलच्या मेन्युकार्डवर ‘पनीर’ किंवा ‘चीज ॲनालॉग’चा वापराचा उल्लेख बंधनकारक

मुंबई : पनीरच्या नावाखाली चीज ॲनालॉगचा वापर होत असल्याबाबतच्या तक्रारीनंतर अन्न व औषध प्रशासन विभागाच्या नवीन

Sanjay Nirupam : निरुपम यांच्या कारची हवा काढणाऱ्यांना जामीन मंजूर

मुंबई : शिवसेनेचे संजय निरुपम दहिसरमध्ये रिक्षा - टॅक्सी चालकांशी संवाद साधण्यासाठी गेले होते. त्यावेळी

Maharashtra Weather : राज्यात उष्णतेचा कहर; ६ जिल्ह्यांना उष्णतेचा, तर १० जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट

मुंबई : महाराष्ट्राचं हवामान बिघडलय आणि याचा फटका सर्वांनाच बसतो आहे. राज्यावर दुहेरी संकट आल्याचं चित्र