हिंदी सक्ती विरोधात चढाओढ! ठाकरेंचे मोर्चे मराठीसाठी की राजकीय शक्ती दाखवण्यासाठी?

मुंबई : एक मुद्दा… पण दोन मोर्चे! आणि दोघंही 'ठाकरे'. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन बंधू एकत्र येतील, असं काही जणांना वाटत होतं. पण झालं उलटंच. दोघांनी आपापल्या नेतृत्वात, एकाच विषयावर, अवघ्या दोन दिवसाच्या फरकाने मोर्चे जाहीर केलेत. विषय आहे हिंदी सक्ती विरोधात आणि त्रिभाषा धोरणा विरोधात आवाज उठवायचा. पण हे खरंच केवळ भाषेच्या प्रश्नासाठी आहे का, की ठाकरे विरुद्ध ठाकरे यांची राजकीय शक्ती प्रदर्शनाची चढाओढ सुरू आहे?


राज्यात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन बंधू एकत्र येणार का, यावरून जोरदार चर्चा सुरू असतानाच, आता या दोघांनीही आपल्याच नेतृत्वात मोर्चे काढणार असल्याचे जाहीर करून राजकीय वर्तुळात नवा ट्विस्ट आणलाय. हिंदी सक्ती विरोधात राज ठाकरे शनिवारी (५ जुलै) तर उद्धव ठाकरे सोमवारी (७ जुलै)ला मोर्चा काढणार आहेत. विशेष म्हणजे, दोघांनीही सर्वपक्षीय नेत्यांना मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन केलेय.



राज ठाकरे ५ जुलैला गिरगाव चौपाटीवरून मोर्चा काढणार आहेत. त्यांनी स्पष्ट केलंय, कोणताही पक्षाचा झेंडा नसेल, हा फक्त मराठी माणसाचा मोर्चा असेल. शिक्षणमंत्री दादा भुसे भेटून गेले, तरीही राज ठाकरेंनी त्रिभाषा धोरण धुडकावून लावलं. ते म्हणाले – ‘महाराष्ट्राचं मराठीपण हरवतंय, सीबीएसई शाळा वाढतायत, केंद्र मराठीवर दबाव टाकतंय, आणि राज्य सरकार हे निमूटपणे स्वीकारतंय.’ म्हणूनच, हा लढा आहे 'कटाविरुद्ध' आणि मराठीच्या अस्मितेसाठी. पण गंमत अशी, की राज ठाकरेंच्या घोषणेनंतर लगेचच उद्धव ठाकरेंनीही दुसऱ्या दिवशी म्हणजेच ७ जुलैला मोर्चा काढणार असल्याची घोषणा केलीय. त्यातही सर्वपक्षीय नेत्यांना सहभागी होण्याचं आवाहन केलंय.


आता प्रश्न उभा राहतो.. हे दोघं खरंच मराठीसाठी लढतायत, की एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठी वेगळ्या मार्गाने चाललेत? एकाच विषयावर दोन मोर्चे म्हणजे एकवाक्यता नाही की एकमेकांवर अविश्वास? मराठीसाठी असं जर खरंच मनापासून लढायचं असेल, तर या दोघांना एकत्र येण्यास काय अडचण आहे? का अजेंडा मराठीचा नाही, तर मंच आणि माईक आपापला ठेवायचा हेच खरे उद्दिष्ट?


मोर्चा कुणाचाही असो, लढा खराच असेल, तर मराठी जनता त्यात सामील होईल. ठाकरे विरुद्ध ठाकरे – हा खरंच मराठीसाठीचा लढा आहे का? की पुढील निवडणुकांसाठीची सराव मोर्चेबाजी? अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरु आहे.

Comments
Add Comment

मुंबई मेट्रोच्या वेळापत्रकात ८ एप्रिलपासून बदल; लाईन ९ व २ बी सेवेत, प्रवाशांसाठी अधिक सुलभ व जलद सेवा

मुंबई: मुंबई महानगर प्रदेशातील मेट्रो जाळ्याच्या विस्ताराच्या पार्श्वभूमीवर, मुंबई महानगर प्रदेश विकास

Sunetra Pawar: 'बारामती हा केवळ मतदारसंघ नसून दादांचा श्वास होता आणि त्या श्वासाशी नाळ जुळलेली प्रत्येक व्यक्ती माझ्यासाठी महत्त्वाची'

बारामती: बारामती हा केवळ मतदारसंघ नसून दादांचा श्वास होता आणि त्या श्वासाशी नाळ जुळलेली प्रत्येक व्यक्ती

Chandrashekhar Bawankule: अजित दादांची सावली आता बारामतीत सुनेत्रा माऊली; बावनकुळेंनी जागवल्या ३२ वर्षांच्या ऋणानुबंधांच्या आठवणी

बारामती: "ज्यांच्या शब्दाला महाराष्ट्राच्या राजकारणात चांद्यापासून बांद्यापर्यंत वजन होतं, ज्यांनी उभं आयुष्य

मुंबईतील पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीमध्ये रंगणार चित्रपट महोत्सव

मुंबई: राज्य शासनाचा अधिकृत ‘चित्रपताका’ चित्रपट महोत्सव यंदा १२ ते १५ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत पु. ल. देशपांडे

Goregaon News : गोरेगावात शोभायात्रेदरम्यान दोन गट भिडले; पोलिसांचा लाठीचार्ज, ८ जणांना अटक

मुंबई : काल गोरेगाव पूर्व येथील संतोष नगर परिसरात शोभायात्रेदरम्यान दोन गटांमध्ये अचानक उसळलेल्या वादाने हिंसक

उपनगरांचा 'वेग' वाढणार!

 'मेट्रो ९' आणि '२-बी'चे लोकार्पण; ठाणे-बोरिवली अंतर आता काही मिनिटांवर मुंबई : मुंबईच्या दळणवळण व्यवस्थेचा