हिंदी सक्ती विरोधात चढाओढ! ठाकरेंचे मोर्चे मराठीसाठी की राजकीय शक्ती दाखवण्यासाठी?

  18

मुंबई : एक मुद्दा… पण दोन मोर्चे! आणि दोघंही 'ठाकरे'. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन बंधू एकत्र येतील, असं काही जणांना वाटत होतं. पण झालं उलटंच. दोघांनी आपापल्या नेतृत्वात, एकाच विषयावर, अवघ्या दोन दिवसाच्या फरकाने मोर्चे जाहीर केलेत. विषय आहे हिंदी सक्ती विरोधात आणि त्रिभाषा धोरणा विरोधात आवाज उठवायचा. पण हे खरंच केवळ भाषेच्या प्रश्नासाठी आहे का, की ठाकरे विरुद्ध ठाकरे यांची राजकीय शक्ती प्रदर्शनाची चढाओढ सुरू आहे?


राज्यात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन बंधू एकत्र येणार का, यावरून जोरदार चर्चा सुरू असतानाच, आता या दोघांनीही आपल्याच नेतृत्वात मोर्चे काढणार असल्याचे जाहीर करून राजकीय वर्तुळात नवा ट्विस्ट आणलाय. हिंदी सक्ती विरोधात राज ठाकरे शनिवारी (५ जुलै) तर उद्धव ठाकरे सोमवारी (७ जुलै)ला मोर्चा काढणार आहेत. विशेष म्हणजे, दोघांनीही सर्वपक्षीय नेत्यांना मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन केलेय.



राज ठाकरे ५ जुलैला गिरगाव चौपाटीवरून मोर्चा काढणार आहेत. त्यांनी स्पष्ट केलंय, कोणताही पक्षाचा झेंडा नसेल, हा फक्त मराठी माणसाचा मोर्चा असेल. शिक्षणमंत्री दादा भुसे भेटून गेले, तरीही राज ठाकरेंनी त्रिभाषा धोरण धुडकावून लावलं. ते म्हणाले – ‘महाराष्ट्राचं मराठीपण हरवतंय, सीबीएसई शाळा वाढतायत, केंद्र मराठीवर दबाव टाकतंय, आणि राज्य सरकार हे निमूटपणे स्वीकारतंय.’ म्हणूनच, हा लढा आहे 'कटाविरुद्ध' आणि मराठीच्या अस्मितेसाठी. पण गंमत अशी, की राज ठाकरेंच्या घोषणेनंतर लगेचच उद्धव ठाकरेंनीही दुसऱ्या दिवशी म्हणजेच ७ जुलैला मोर्चा काढणार असल्याची घोषणा केलीय. त्यातही सर्वपक्षीय नेत्यांना सहभागी होण्याचं आवाहन केलंय.


आता प्रश्न उभा राहतो.. हे दोघं खरंच मराठीसाठी लढतायत, की एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठी वेगळ्या मार्गाने चाललेत? एकाच विषयावर दोन मोर्चे म्हणजे एकवाक्यता नाही की एकमेकांवर अविश्वास? मराठीसाठी असं जर खरंच मनापासून लढायचं असेल, तर या दोघांना एकत्र येण्यास काय अडचण आहे? का अजेंडा मराठीचा नाही, तर मंच आणि माईक आपापला ठेवायचा हेच खरे उद्दिष्ट?


मोर्चा कुणाचाही असो, लढा खराच असेल, तर मराठी जनता त्यात सामील होईल. ठाकरे विरुद्ध ठाकरे – हा खरंच मराठीसाठीचा लढा आहे का? की पुढील निवडणुकांसाठीची सराव मोर्चेबाजी? अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरु आहे.

Comments
Add Comment

राज्यात यापुढे पायाभूत सोयी सुविधेचा प्रकल्प तीन वर्षात पूर्ण करावा – मुख्यमंत्री

बोरिवली ते ठाणे दुहेरी बोगदा प्रकल्पाचा घेतला आढावा मुंबई : राज्यात यापुढे कुठलाही पायाभूत सोयी सुविधेचा

Ramdas Athawale : हिंदी ही राष्ट्रभाषा आहे आणि तिला विरोध करणं योग्य नाही, रामदास आठवलेंची प्रतिक्रिया...

मुंबई : राज्यात शाळांमध्ये त्रिभाषा सूत्र राबण्याचा सरकारने घेतलेला निर्णय वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. याच

Pratap Sarnaik : वाहतूक व्यवसायकांना फायदा होणार ! ई-चलन समस्या सोडवण्यासाठी समिती स्थापन करावी, परिवहन मंत्र्यांचे आदेश...

मुंबई : गेले अनेक वर्षापासून वाहतूक व्यावसायकांना ई-चलन संदर्भात अडचणींचा सामना करावा लागतोय, ही बाब सरकारच्या

Nitin Gadkari : दुचाकी चालकांकडून कोणत्याही टोल घेतला जाणार नाही, नितीन गडकरी यांची सोशल मीडियावरती पोस्ट...

मुंबई : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने १५ जलै २०२५ पासून दुचाकी वाहन चालकांकडून टोल वसूल करण्यात येईल. अशा

आदिवासी समाजाला अतिरिक्त आरक्षण ? मुख्यमंत्र्यांना पाठवणार प्रस्ताव...

मुंबई : राज्यात काही जिल्ह्यांमध्ये आदिवासी समाजाची संख्या जास्त आहे.  आदिवासी समाजातील तरुणांना नोकऱ्यांमध्ये

Devendra Fadanvis 'आम्ही सर्व जनतेचे सेवक', लोणीकरांच्या वादग्रस्त वक्तव्यावर मुख्यमंत्र्यांची स्पष्ट भूमिका...

मुंबई : भाजपचे आमदार बबनराव लोणीकर यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यामुळे त्यांच्या विधानावरुन अडचणीत वाढ