हिंदी सक्ती विरोधात चढाओढ! ठाकरेंचे मोर्चे मराठीसाठी की राजकीय शक्ती दाखवण्यासाठी?

मुंबई : एक मुद्दा… पण दोन मोर्चे! आणि दोघंही 'ठाकरे'. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन बंधू एकत्र येतील, असं काही जणांना वाटत होतं. पण झालं उलटंच. दोघांनी आपापल्या नेतृत्वात, एकाच विषयावर, अवघ्या दोन दिवसाच्या फरकाने मोर्चे जाहीर केलेत. विषय आहे हिंदी सक्ती विरोधात आणि त्रिभाषा धोरणा विरोधात आवाज उठवायचा. पण हे खरंच केवळ भाषेच्या प्रश्नासाठी आहे का, की ठाकरे विरुद्ध ठाकरे यांची राजकीय शक्ती प्रदर्शनाची चढाओढ सुरू आहे?


राज्यात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन बंधू एकत्र येणार का, यावरून जोरदार चर्चा सुरू असतानाच, आता या दोघांनीही आपल्याच नेतृत्वात मोर्चे काढणार असल्याचे जाहीर करून राजकीय वर्तुळात नवा ट्विस्ट आणलाय. हिंदी सक्ती विरोधात राज ठाकरे शनिवारी (५ जुलै) तर उद्धव ठाकरे सोमवारी (७ जुलै)ला मोर्चा काढणार आहेत. विशेष म्हणजे, दोघांनीही सर्वपक्षीय नेत्यांना मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन केलेय.



राज ठाकरे ५ जुलैला गिरगाव चौपाटीवरून मोर्चा काढणार आहेत. त्यांनी स्पष्ट केलंय, कोणताही पक्षाचा झेंडा नसेल, हा फक्त मराठी माणसाचा मोर्चा असेल. शिक्षणमंत्री दादा भुसे भेटून गेले, तरीही राज ठाकरेंनी त्रिभाषा धोरण धुडकावून लावलं. ते म्हणाले – ‘महाराष्ट्राचं मराठीपण हरवतंय, सीबीएसई शाळा वाढतायत, केंद्र मराठीवर दबाव टाकतंय, आणि राज्य सरकार हे निमूटपणे स्वीकारतंय.’ म्हणूनच, हा लढा आहे 'कटाविरुद्ध' आणि मराठीच्या अस्मितेसाठी. पण गंमत अशी, की राज ठाकरेंच्या घोषणेनंतर लगेचच उद्धव ठाकरेंनीही दुसऱ्या दिवशी म्हणजेच ७ जुलैला मोर्चा काढणार असल्याची घोषणा केलीय. त्यातही सर्वपक्षीय नेत्यांना सहभागी होण्याचं आवाहन केलंय.


आता प्रश्न उभा राहतो.. हे दोघं खरंच मराठीसाठी लढतायत, की एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठी वेगळ्या मार्गाने चाललेत? एकाच विषयावर दोन मोर्चे म्हणजे एकवाक्यता नाही की एकमेकांवर अविश्वास? मराठीसाठी असं जर खरंच मनापासून लढायचं असेल, तर या दोघांना एकत्र येण्यास काय अडचण आहे? का अजेंडा मराठीचा नाही, तर मंच आणि माईक आपापला ठेवायचा हेच खरे उद्दिष्ट?


मोर्चा कुणाचाही असो, लढा खराच असेल, तर मराठी जनता त्यात सामील होईल. ठाकरे विरुद्ध ठाकरे – हा खरंच मराठीसाठीचा लढा आहे का? की पुढील निवडणुकांसाठीची सराव मोर्चेबाजी? अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरु आहे.

Comments
Add Comment

मतदानाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत वाहतूक नियोजनात बदल; काही मार्गांवर प्रवेश मर्यादित

मुंबई : राज्यातील महानगरपालिका निवडणुकांसाठी उद्या मतदान होणार असून, या प्रक्रियेच्या सुरळीत अंमलबजावणीसाठी

BMC Election 2026 : महापालिका निकाल प्रक्रियेत बदल; मुंबईत मतमोजणीसाठी नव्या नियमांची अंमलबजावणी

मुंबई : राज्यात महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. १५ जानेवारी रोजी मतदान

Viral Video :चालत्या बाईकवर 'हायव्होल्टेज' ड्रामा!...लोक पाहत राहिलीत..!

मुंबई: सोशल मीडियावर दररोज हजारो व्हिडीओ व्हायरल होत असतात, पण सध्या एका अशा व्हिडीओने धुमाकूळ घातला आहे जो पाहून

BMC Election Results : २२७ वॉर्डांचे निकाल एकाच वेळी नाहीत, टप्प्याटप्प्याने मतमोजणी

मुंबई : राज्यभरात महापालिका निवडणुकांचे वातावरण चांगलेच तापले असून, मुंबई महापालिकेच्या (BMC) निकालांकडे संपूर्ण

Mumbai : किरकोळ वादातून मारामरी,रागाच्या भरात मित्रानेच घेतला...नक्की काय घडलं ?

Mumbai :मुंबईतील एका परिसरात अत्यंत संतापजनक घटना घडली असून, बोलता बोलता वाद झाल्याने एका तरुणावर त्याच्याच

BMC Election 2026 : ६६ नगरसेवकांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा, मनसेची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली; याचिकाकर्त्यांना सुनावले खडेबोल

मुंबई : राज्यातील महानगरपालिका निवडणुकीत ६६ नगरसेवकांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला असून, याविरोधात