ठाण्यात बॅनरबाजीचा झगमगाट

माजी नगरसेवकांच्या प्रचारातून निष्ठावान कार्यकर्त्यांमध्ये नाराजी


ठाणे : गेल्या साडेतीन वर्षांपासून ठाणे महापालिकेमध्ये कोणताही अधिकृत नगरसेवक नसतानाही महापालिका प्रशासनाचा कारभार सुरळीतपणे सुरू आहे. मात्र निवडणुका न झालेल्या काळात देखील अनेक माजी नगरसेवक आणि राजकीय पदाधिकारी ‘आमच्याच प्रयत्नातून काम’ झाल्याचा दावा करत ठिकठिकाणी बॅनर लावून प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. यामुळे शहरात बॅनरबाजीचा अक्षरशः सुळसुळाट झाला आहे.


माजी नगरसेवकांनी लावलेल्या या बॅनर्सवर सार्वजनिक कामांचे श्रेय स्वतःकडे वळवण्याचा स्पष्ट प्रयत्न दिसून येतो. ‘पाणी योजना पूर्ण – आमच्या प्रयत्नातून’, ‘रस्ता काँक्रीटीकरण – आमच्या पाठपुराव्याचा परिणाम’, अशा आशयाचे बॅनर्स नागरिकांच्या नजरेस पडत आहेत. विशेष म्हणजे, या बॅनर्समध्ये महापालिका प्रशासनाचा उल्लेखही नसतो, जणू सर्व निर्णय हे त्यांच्या 'सांगण्यावरूनच' झाले आहेत, असा त्याचा आभास निर्माण केला जातो.


मात्र या बॅनरबाजीमुळे संबंधित पक्षातील निष्ठावंत कार्यकर्ते मात्र दुखावले जात आहेत. ‘नगरसेवक नसतानाही केवळ पुढील निवडणुकीत उमेदवारी हवी म्हणून प्रसिद्धीच्या हव्यासापोटी या प्रकारे एकहाती श्रेय लाटले जात आहे", अशी नाराजी काही कार्यकर्त्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर व्यक्त केली.


ठाणे शहरात कळवा, मुंब्रा, कोपरीपासून ते वागळे इस्टेट आणि घोडबंदर परिसरात अशा प्रकारच्या बॅनर्सचा सुकाळ झाला आहे. महापालिका निवडणुका जवळ येत असल्याने राजकीय इच्छुक मंडळी ‘सक्रिय असल्याचे’ दाखवण्यासाठी नागरी कामांचे श्रेय घेताना दिसत आहेत. मात्र प्रत्यक्षात प्रशासक आणि अधिकारी यांच्या माध्यमातूनच सर्व योजना राबवल्या जात आहेत.


महापालिकेतील सत्ताविरहित कालावधीत नागरिकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने अनेक निर्णय घेतले आहेत.

Comments
Add Comment

Shivsena Latur : लातूरचे माजी मंत्री आणि आमदार विनायकराव पाटील यांचा शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश

मोठ्या नेत्यांसह कार्यकर्त्यांचीही शिवसेनेमध्ये प्रवेशासाठी गर्दी, राज्यभरातून शिवसेनेचा वाढतोय

Eknath Shinde : पंतप्रधान मोदींवर हल्ल्याचे आडाखे बांधून काँग्रेसची देशद्रोही मानसिकता उघडी पडली!

देशातील १४० कोटी जनता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पाठीशी काँग्रेसवर शिंदेंची सडकून टीका ठाणे : अमेरिकेचे

“इंटिग्रेटेड ग्राम विकास मॉडेल”ची मांडणी; उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली खरीप हंगाम आढावा बैठक संपन्न

जिल्ह्यातील १०० तलाव गाळमुक्त करण्याचे उद्दिष्ट्य गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजनेसाठी सामाजिक संस्था आणि

Drugs Case : मीरा रोडमध्ये २३.३ लाख रुपयांचे ड्रग्स जप्त, तिघांना अटक

मीरा रोड : मुंबईलगतच्या मीरा-भाईंदर शहरात पोलिसांनी गेल्या दोन दिवसांत वेगवेगळ्या कारवाईत एकूण तेवीस लाख तीस

Shivshahi Bus Fire : ठाणे स्टेशनवर ‘शिवशाही’ बसला भीषण आग; १५ प्रवासी थोडक्यात बचावले

ठाणे रेल्वे स्टेशन परिसरातील सेटीस ब्रिजवर आज म्हणजेच गुरुवार २३ एप्रिल रोजी ‘शिवशाही’ बसला अचानक भीषण आग

Central Railway : मध्य रेल्वे सलग तिसऱ्या दिवशी ४५ मिनिटे उशिराने; प्रवाशांचे हाल

ठाणे : डोंबिवली स्थानकावर रिकाम्या रेल्वेचा डब्बा घसरला आणि संपूर्ण मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले, त्या